एक्स्प्लोर

Maharashtra weather update:महाराष्ट्र कुडकुडणार! ईशान्येकडून गार वाऱ्यांचे प्रवाह, पुढील 2 दिवसात कुठवर जाणार तापमान?

गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा हा गारवा मुख्यतः वाऱ्यांच्या दिशेमुळे निर्माण झाला असून, त्यामुळे सकाळ-रात्री कडाक्याची थंडी आणि दुपारी तुलनेने उष्णता असं मिश्र स्वरूप आहे.

Maharashtra weather update: नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागलाय . हवेत चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. किमान तापमानाच्या पाऱ्यात बदल होतायत. राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांपासून मराठवाड्यापर्यंत पुढील काही दिवसांत तापमानात लक्षणीय घसरण होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ईशान्येकडून सतत येणाऱ्या गार हवेमुळे बहुतेक भागात थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईतही पुढील दोन-तीन दिवसांत तापमानात घट जाणवेल असं वर्तवण्यात आलं आहे. (Temperature Drop)

Weather Update: तापमान घसरण्याची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जळगावात गेल्या 4 दिवसांपासून हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. किमान तापमान 9 ते 10 अंश सेल्सिअसवर नोंदवले जात आहे. परिसरात शनिवारपासून थंडी वाढेल आणि हा प्रवाह सोमवारपर्यंत कायम राहू शकतो असा अंदाज आहे. नाशिक, धुळे तसेच नंदुरबार येथे रविवारीसह सोमवारी अधिक गारवा वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील या बदलाचा प्रभाव किनारपट्टीच्या वरच्या भागातही होणार असून, 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान तापमान सुमारे 17 अंशांपर्यंत घसरू शकेल.

शनिवारी जळगावमध्ये राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान नोंदले गेले. सामान्य तापमानाच्या बरेच खाली होते. नाशिकमध्येही सकाळचा पारा दहाच्या आसपास स्थिरावला. वाऱ्यांची दिशा बदलल्याने कोकण किनाऱ्यावरही गारवा वाढताना दिसला; डहाणू येथे सकाळच्या तापमानात ठळक घट दिसून आली. मुंबईत सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही भागांत साधारणपणे नेहमीपेक्षा कमी किमान तापमान नोंदवले गेले. काही जिल्ह्यांमध्ये वेगाने तापमान घसरत आहे. गेल्या 24 तासात काही जिल्ह्यांमध्ये 5 ते 6 अंशांनी तापमान घसरले.

कोकण व गोवा

दहाणू – 17.8°C

गोवा (पणजी) – 20.8°C

हरनई – 21.6°C

मुंबई (कुलाबा) – 22.6°C

मुंबई (सांताक्रूझ) – 18.0°C

रत्नागिरी – 19.7°C

मध्य महाराष्ट्र

अहिल्यानगर – 9.5°C

जळगाव – 8.7°C

जेऊर – 9.0°C

कोल्हापूर – 15.8°C

महाबळेश्वर – 12.0°C

नाशिक – 10.3°C

पुणे – 11.2°C

सांगली – 14.2°C

सातारा – 12.0°C

सोलापूर – 15.4°C

मराठवाडा

छ. संभाजीनगर – 12.6°C

नांदेड – 11.3°C

धाराशिव – 13.3°C

परभणी – 11.7°C

विदर्भ

अकोला – 13.0°C

अमरावती – 12.7°C

ब्रह्मपुरी – 14.3°C

बुलढाणा – 13.4°C

चंद्रपूर – 13.6°C

नागपूर – 12.0°C

वर्धा – 12.9°C

यवतमाळ – 10.8°C

दिवसाच्या उष्णतेत मात्र फरक नाही

दिवसा मात्र ईशान्येकडील थंड प्रवाहाचा परिणाम अजून प्रकर्षाने दिसत नसल्याने अनेक भागांत तापमान नेहमीसारखेच राहिले. रत्नागिरीत दुपारी उष्णतेचा पारा 34 अंशांच्या पुढे गेला. मुंबईतही दुपारच्या वेळी 33 अंशांच्या आसपास तापमान नोंदले गेले. जळगावात सकाळ थंड असूनही दुपारी तापमान 30 अंशांवर पोहोचले. सध्या तरी दिवसाच्या तापमानात मोठ्या चढ-उतारांची शक्यता नाही. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा हा गारवा मुख्यतः वाऱ्यांच्या दिशेमुळे निर्माण झाला असून, त्यामुळे सकाळ-रात्री कडाक्याची थंडी आणि दुपारी तुलनेने उष्णता असं मिश्र स्वरूप देशाच्या या भागात काही काळ कायम राहण्याचा अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget