CM Eknath Shinde : आता प्रत्येक तालुक्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, राज्यात 500 दवाखाने सुरु होणार : मुख्यमंत्री
CM Eknath Shinde : राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण 500 ठिकाणी आपला दवाखाना सुरू केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

CM Eknath Shinde : राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (Balasaheb Thackeray Aapla Dawakhana) योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण 500 ठिकाणी आपला दवाखाना सुरु केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
मुंबईत सुरु केलेल्या दवाखान्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
मुंबईपाठोपाठ राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरु होणार आहे. सुमारे 500 ठिकाणी आपला दवाखाना सुरु करण्यात येईल. मुंबईत सुरु केलेल्या दवाखान्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. घराजवळ असलेल्या दवाखान्यामुळे लगेच उपचार मिळायला सुरु झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील ही संकल्पना राज्यातील तालुक्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्र सरकारकडून विविध प्रकल्पांना मंजुरी
केंद्र सरकारने राज्यातील रेल्वेचे प्रकल्प, नगर विकास विभागाचे विविध प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुंबई शहराला आणखी विकसित करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशीष शेलार, भरत गोगावले आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान, काल (9 फेब्रुवारी) झालेल्या 458 रक्तदान शिबीरात सुमारे 7 हजार 200 बॅगांचे संकलन झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. राज्यभरात 1 हजार 835 आरोग्य शिबीरात 2 लाख 12 हजार 505 रुग्णांची तपासणी करण्यात आली. जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानात सुमारे साडेतीन लाख बालकांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती सावंत यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील आपला दवाखान्याचे उद्घाटन
दरम्यान, या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील आपला दवाखान्याचे प्रातिनिधिक स्वरुपात उदघाटन करण्यात आले आहे. यावेळी आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. स्वप्नील लाळे, उपसंचालक डॉ.विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ विजय बाविस्कर, उपसंचालक कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या:
Majha Maharashtra Majha Vision : मुख्यमंत्री व्हायचं हे कधी मनात आलं? एकनाथ शिंदे हसले, म्हणाले....
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
