एक्स्प्लोर

फडणवीस-पवार यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी 14 दिवसांचा वेळ?

सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरुममध्ये मुकुल रोहतगी यांच्या युक्तिवादानंतर राज्यातील भाजपचे नेते राज्यपालांनी 30 नोव्हेंबर ही तारीख दिलीच नसल्याचा दावा करत आहेत. राज्यपालांनी कोणतीही निश्चित तारीख दिलेलीच नाही. 30 नोव्हेंबर ही तारीख प्रसारमाध्यमांमध्ये कुठून आली हे कळायला मार्ग नाही असं भाजप नेते आता सांगत आहेत.

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारने 23 नोव्हेंबर रोजी शपथ घेतली खरी पण बहुमत कधीपर्यंत सिद्ध करायचं यासाठी काही मुदतच दिलेली नाही. कोणत्याही विधीमंडळ पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची शपथ दिल्यानंतर राज्यपाल बहुमत सिद्ध करण्यासाठी निश्चित वेळ देतात. साधारणपणे हा अवधी 14 दिवसांचा असतो. मात्र काही प्रकरणात राज्यपाल त्यापूर्वीही बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देऊ शकतात. राज्यपालांनी फडणवीस-पवार सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरची दिलेली वेळ हा समज कुठून पसरला ते कळायला मार्ग नाही. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र आज भाजपचे कोणीच नेते राज्यपाल किंवा राजभवनाकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी निश्चित मुदत दिलेली नसल्याचा दावा करत आहेत. काही नेत्यांनी 30 नोव्हेंबर ही वेळ राजभवनाच्या अधिकृत सूत्रांकडून नाही तर प्रसारमाध्यमातील बातम्यांनुसार सांगितली गेल्याचा दावा केला आहे. आज सुप्रीम कोर्टातील सुनावणी दरम्यान, भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांनी याबाबत पहिल्यांदा स्पष्ट खुलासा केला. राज्यपालांनी फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी 14 दिवसांचा वेळ नियमानुसार दिल्याचा दावा युक्तिवादादरम्यान केला. आता विरोधीपक्षाचे वकील तीन-चार दिवसात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत आहेत, एवढंच नाही तर ते असे आदेश माननीय न्यायालयाने द्यावेत अशीही मागणी करत आहेत. थोडक्यात सर्वोच्च न्यायालयानेच विधानसभा अध्यक्षाची भूमिका बजावावी आणि सर्व निर्णय घ्यावेत अशी ही मागणी आहे. जर राज्यपालांच्या आदेशात काहीच बेकायदेशीर नसेल तर सर्वोच्च न्यायालय अशी भूमिका कशी काय घेऊ शकतं. कोर्टाने विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप करु नये असा युक्तिवादही त्यांनी केला. मुकुल रोहतगी यांच्या या युक्तिवादात राज्यपालांनी फडणवीस-पवार सरकारला 14 दिवसांची वेळ दिल्याचा खुलासा झाला. फडणवीस-पवार सरकारला राज्यपालांनी शनिवारी 23 तारखेला सकाळी आठ वाजता शपथ दिली. तेव्हापासून 14 दिवस म्हणजे 6 डिसेंबरपूर्वी नव्या सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. मात्र सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली 14 दिवसांची मुदत योग्य आहे की सर्वोच्च न्यायालय उद्या त्यामध्ये काही बदल करतं ते पाहावं लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरुममध्ये मुकुल रोहतगी यांच्या युक्तिवादानंतर राज्यातील भाजपचे नेते राज्यपालांनी 30 नोव्हेंबर ही तारीख दिलीच नसल्याचा दावा करत आहेत. राज्यपालांनी कोणतीही निश्चित तारीख दिलेलीच नाही. 30 नोव्हेंबर ही तारीख प्रसारमाध्यमांमध्ये कुठून आली हे कळायला मार्ग नाही असं भाजप नेते आता सांगत आहेत. माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी राजयपालांकडून अशी काही मुदत दिलेली नसल्याचा दावा केला तर चंद्रकांत पाटील यांनी अशा काही मुदतीबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचा दावा केला. या मुदतीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच माहिती असेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. आपण आता मंत्री नसल्यामुळे आपल्याला त्याविषयी काहीच कल्पना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आलं की कोर्टातील रेकॉर्डवर आज जी तारीख देण्यात आली तीच तारीख असणार, मुख्यमंत्री कार्यालयाला या तारखेविषयी काही माहिती नाही, असंही मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केलं. राजभवनाच्या वतीनेही नव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिल्यानंतर त्यांनी कधीपर्यंत बहुमत सिद्ध करायचंय ते सांगितलंच नाही. राजभवनाच्या वतीने जारी होणाऱ्या प्रसिद्धी पत्रकात या मुदतीचा समावेश असतो. पण यावेळी त्याबाबत काहीच माहिती नव्हती. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना सांगितलं की राज्यपाल देतील त्या मुदतीत आपण सभागृहात बहुमत सिद्ध करु, मात्र निश्चित तारखेविषयी त्यांच्या निवेदनात काहीच उल्लेख नव्हता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget