एक्स्प्लोर

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात अयोध्या कनेक्शन काय?

Maharashtra Politics : शिंदे गट आणि ठाकरे गट असे शिवसेना दोन गटामध्ये विभागली गेली आहे. दोन्ही नेत्यांचं राजकारण हिंदुत्वावर आहे. खरा हिंदुत्ववादी कोण आहे?

Maharashtra Politics : नोव्हेंबरमध्ये अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिवसेनेतून फारकत घेतल्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील राजकारणातील स्वत:चे अस्तित्व आणखी भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट असे शिवसेना दोन गटामध्ये विभागली गेली आहे. दोन्ही नेत्यांचं राजकारण हिंदुत्वावर आहे. खरा हिंदुत्ववादी कोण आहे? यावरुन मागील काही दिवसांपासून नेहमीच दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत होत आहेत. एकनाथ शिंदेंचा हा अयोध्या दौरा त्याचाच एक भाग आहे, या दौऱ्यातून  शिंदे आपली हिंदुत्ववादी प्रतिमा आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न करतील. 

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असेल. शिवसेनेतून बंडखोरी करण्याआधी काही दिवस आदित्य ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाताना मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर निघालेल्या आमदारांनाही सोबत घेऊन जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कारण, शिंदे यांचा हा अयोध्या दौरा राजकीय रणनितीचा एक भाग असल्याचं म्हटलेय जातेय. 

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत जूनमध्ये बंड केलं होतं. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटांमध्ये शिवसेना विभागली गेली. दोन्ही नेत्यांकडून स्वत: ला हिंदुत्ववादी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय.  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपासून बंडखोरी केल्यानंतर अनेक कारणं सांगितलं. त्यापैकीच एक कारण उद्धव ठाकरे हिंदुत्ववादापासून दुरावले आहेत, हे एक आहे. 2019 मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या पक्षासोबत युती केली. तसेच भाजपसोबतची युती तोडली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मागील तीन दशकांपासून शिवसेना आणि भाजप एकत्र होते. आता एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जात आपली शिवसेनेचा खरी हिंदुत्ववादी असल्याचं दाखवतील, यात शंकाच नाही.  

शिवसेना पक्षाची ओळख कट्टर हिंदुत्ववादी पक्ष अशीच आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हटले जाते. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी तडजोड केल्याचं एकनाथ शिंदेंकडून वारंवार भासवलं जात आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारस असतील, पण आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचं शिंदेंकडून वारंवार सांगण्यात येत आहे. 2019 च्या आधी हिंदुत्ववादावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला होता. भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह अयोध्या दौराही केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असतानाही आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. हिंदुत्ववादी प्रतिमा कायम असल्याचं सांगण्यासाठी अदित्य ठाकरेंचा हा दौरा होता. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या अयोध्या दौऱ्याशिवाय मुंबईतील भाषणातही अयोध्याचा उल्लेख  करण्यात आला आहे. जून 2022 मध्ये एका भाषणादरम्यान भाजपचे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, 1992 मध्ये अयोध्यामधील बाबरी मस्जिद पाडताना उपस्थित होते. फडणवीस यांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं.  

अयोध्या दौऱ्यावर जाण्याची तयारी आणि इच्छा मनसे प्रमुख राज ठाकरे यांचाही आहे. कारण मागील काही दिवसांपासून राज ठाकरेंचं राजकारणही हिंदुत्ववादावर चाललं आहे. मराठी मुद्द्यावरुन राजकारण प्रवेश करणाऱ्या राज ठाकरेंनी 2020 मध्ये हिंदुत्वचा मुद्दा घेतला. पक्षाचा झेंडाही त्यांनी भगवा केला. यावेळी बोलताना हिंदुत्व आपल्या डीएनएमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. राज ठाकरेंना हिंदू जननायक असे म्हटले जाऊ लागलेय. राज ठाकरे यांनी भोंग्यावरुनही आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याचवेळी लवकरच अयोध्याला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी उत्तर प्रदेशचे भाजप खासदार  बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. जोपर्यंत मुंबईतील उत्तर भारतीयांची राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्यात पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका  बृजभूषण शरण सिंह यांनी घेतली होतील.  बृजभूषण शरण सिंह यांच्या भूमिकेमुळे राज ठाकेंना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. 

1989 मध्ये दोन खासदार असणाऱ्या भाजपनं अयोध्यामधील राम जन्मभूमिचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरुनच त्यांनी आपलं राजकारण पुढे चालू ठेवलं. सध्या भाजपचे 303 खासदार आहे. अयोध्यावरुन राजकारण करणाऱ्या पक्षात आता फक्त भाजप हा एकमेव पक्ष राहिलेला नाही. मुंबईपासून अयोध्या 1500 किमी दूर आहे तरीही मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अयोध्या आणि प्रभू श्रीराम या नावांचीच चर्चा आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget