एक्स्प्लोर

Bhagat Singh Koshyari : उद्धव ठाकरे संत प्रवृतीचे पण ट्रॅपमध्ये अकडले: भगतसिंह कोश्यारी

Bhagat Singh Koshyari : कुणाचा ट्रॅप होता?, हे मला माहिती नाही, डोक्यानं विचार केला असता तर असं झालं नसतं असं राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

Bhagat Singh Koshyari On Uddhav Thackeray :  उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीची व्यक्ती आहे, पण ते ट्रॅपमध्ये अडकले असं वक्तव्य महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. एबीपी माझाला दिलेल्या exclusive मुलाखतीत भगत सिंह कोश्यारी यांनी अनेक खळबळजनक वक्तव्यं आणि दावे केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी आपलं मत मांडले. त्याशिवाय पहाटेचा शपथविधी, 12 आमदारांची नियुक्ती आणि बऱ्याच मुद्द्यांवर राज्यपालांनी भाष्य केलं. 

उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीची व्यक्ती आहे, पण ते ट्रॅपमध्ये अडकले. उद्धव ठाकरेंना राजकारण किती कळतं, हे मी नाही सांगू शकत नाही. कुणाचा ट्रॅप होता?, हे मला माहिती नाही. डोक्यानं विचार केला असता तर असं झालं नसतं, असे कोश्यारी म्हणाले. 

आदित्य ठाकरे मुलासारखा -
माझे कुणाशीही संबंध खराब झाले नाहीत.  भुजबळ, अजित पवार सर्वांशी संबंध चांगले आहेत. आदित्य ठाकरे तर मला माझ्या मुलासारखे आहेत. मी चांगल्या-वाईटासाठी काम करत नाही. मी कामासाठी काम करतो, असे कोश्यारी म्हणाले. जिथे त्यांची चूक झाली तिथे मी बोललो. महाराजांबाबत दुसऱ्या दिवशीच स्पष्टीकरण दिलं. मी लगेच निर्णय घेतला तर अडचण, मी निर्णय लगेच नाही घेतला तरी अडचण, असे कोश्यारी म्हणाले. 

12 आमदारांवर काय म्हणाले?
जातानाही मी 12 आमदारांचं पत्र मंजूर केलं नसतं, राज्यपाल पदाची काही प्रतिष्ठा नाही का? मविआची किती बिलं मंजूर केली. 12 आमदारांच्या पत्राबाबत मविआकडून धमकी देण्यात आली. नावं 15 दिवसात मंजूर करण्याची धमकी दिली होती. मला धमकी दिली तर कसं मी मंजूर करणार असे राज्यपाल म्हणाले.  मला कोणत्याही नावावर आक्षेप नव्हता. माझा आक्षेप पत्रातील भाषेवर होता. काहींना नंतर विधानपरिषद, राज्यसभेवर पाठवलं. पत्रातील नावं सातत्यानं बदलली गेली. राज्यपालपदाच्या प्रतिष्ठेला मविआनं ठेच पोहोचवली, असा आरोप कोश्यारींनी केला. 

महाविकस आघाडी दावा करत होती की, राज्यपालांनी इतकी घाई का केली? आम्हाला का नाही संधी दिली, असा प्रश्न भगतसिंह कोश्यारी यांना केला असता ते म्हणाले आहेत की, ''माझ्याकडे जेव्हा त्यांच्याच पक्षाचा एक प्रमुख नेता (अजित पवार) येऊन याबद्दल बोलतो. तर मला असं वाटतं यानंतर त्यांना (महाविकास आघाडीला) बोलण्याचा कोणताच अधिकार राहत नाही. तुम्ही मला सांगत आहात (मविआ), ती व्यक्ती जर इतकी महत्वाची नसती, मग त्यांनी का त्या व्यक्तीला इतकं महत्व दिलं? त्याला उपमुख्यमंत्री बनवलं?,'' 

आणखी वाचा :

Bhagat Singh Koshyari On Fadnavis-Pawar Swearing: पहाटेच्या शपथविधीवर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाले..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
Embed widget