एक्स्प्लोर

संगणक परिचालकांचा संप, 'ते' 5 हजार 331 रुपये नेमके जातात कोणाच्या खिशात? CSCSPV कंपनीवर होतोय आरोप

संगणक परिचालकांचे (Computer Operator) विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा सहावा दिवस आहे.

Computer Operator Agitation : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये (Gram panchayat) असलेल्या संगणक परिचालकांचे (Computer Operator) विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरु आहे. 17 नोव्हेंबरपासून या परिचालकांचे हे आंदोलन सुरु आहे. अद्याप याबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक (Computer Operator) हे स्वतंत्र पद निर्माण करुन नियुक्ती मिळावी. तसेच किमान वेतन देण्यात यावं अशा मागण्या संगणक परिचालकांन केल्या आहेत. तसेच CSCSPV या कंपनीकडून पिळवणूक होत असल्याचे मत संगणक परिचालकांनी व्यक्त केलं आहे

दरम्यान,  CSCSPV या कंपनीकडून नेमकी पिळवणूक होते कशी? याबबतची माहिती स्वत: संगणक परिचालकांनी दिली आहे. संगणक परिचालकांनी ठेरलेला पगार हा 7 हजार रुपये आहे. पण प्रत्यक्षात वित्त आयोगाकडून 12 हजार 1331 रुपये ग्रामपंचायतीला पाठवले जातात. ग्रामपंचायत हा निधी CSCSPV या कंपनीकडे पाठवते. कंपनी या निधीतून फक्त 7 हजार रुपये संगणक परिचालकांनी देते. तर बाकीचे 5 हजार 331 रुपये स्टेशनरीच्या नावाखाली CSCSPV ही कंपनी कट करत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी एबीपी माझाला दिली आहे. प्रत्यक्षात कागदांची एक रिम, एक टोनर महिन्याला ग्रामपंचायतीसाठी लागतो. हा खर्च CSCSPV ही कंपनी करत नाही. स्टेशनरीचा खर्च ही ग्रामपंचायत करत असल्याचे सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले. त्यामुळं CSCSPV या कंपनीने 5 हजार 331 रुपये कट करण्याचे कारण काय? ते पैसे संगण परिचालकांनी द्यावे असे मुंडे म्हणाले. 

संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन, ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प 

महाराष्ट्र राज्यातील 27000 हजार संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. याचा मोठा परिणाम ग्रामपंचायतीच्या कारभारावर होत असल्याचं दिसत आहे. ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान नेमकं प्रकरण काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालकाची (Computer Operator) नेमणूक करण्यात आली आहे. या परिचालकांच्या पगाराचे पैसे वित्त आयोग ग्रमपंचायतीकडे पाठवते. परिचालकांनी 7 हजार रुपयांचे वेतन दिले जाते. वित्त आयोग ग्रामपंचायतीकडे 12 हजार 331 हजार रुपये पाठवते. ग्रामपंचायत हे पैसे CSCSPV कंपनीकडे पाठवते. CSCSPV ही कंपनी संगणक परिचालकांना 7 हजार रुपये देते. उरलेले 5 हजार 331 रुपये स्टेशनरीच्या नावाखाली कट करते. मग हे पैसे नेमके जातात कोणाच्या खिशात? असा सवाल उपस्थित केला जातोय. 

संगणक परिचालक स्वतंत्र पद म्हणून नियुक्त करावं

दरम्यान, ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक (Computer Operator) हे स्वतंत्र पद निर्माण करुन नियुक्ती मिळावी. तसेच किमान वेतन देण्यात यावं अशा मागण्या संगणक परिचालकांन केल्या आहेत. मागील 12 वर्षापासुन ग्रामपंचायत (Gram panchayat) स्तरावर ग्रामविकास विभागानं नेमून दिलेले काम संगणक परिचालक प्रमाणिकपणे करत आहेत. ग्रामीण भागातील सुमारे सात कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य संगणक परिचालक अविरतपणे करत असल्याचे परिचालकांनी सांगितले. 

नेमक्या मागण्या काय?

1)  ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधाची फाईल वित्त विभागास त्वरित पाठवून, संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देणे
2)  संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मिळेपर्यंत 20000 रुपये मासिक मानधन द्यावे 
3) नव्याने सुरू केलेली चुकीची टार्गेट सिस्टिम  रद्द करावी 
4) पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या जुन्या संगणक परिचालकांना नियुक्ती देणे . त्यांची नियुक्ती झाली आहे त्यांना मागील सात महिन्यापासून मानधन मिळाले नाही, त्यांना त्वरित मानधन अदा करणे
5) परिचालकांचा कारभार ग्रामपंचायतीच्या अंतर्गत घ्यावा  

अशा प्रमुख मागण्या यावेळी संगणक परिचालकांनी केल्या आहेत. आता जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत परिचालकांनी संप मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे. आमचे वेतन आम्हाला मिळावं असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

आम्हीच काय पाप केलं ? संगणक परिचालकांचा सवाल, आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन;  ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
RTE Admission : आरटीई अंतर्गत दुर्बल घटकांच्या 25 टक्के जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
आरटीई अंतर्गत दुर्बल घटकांच्या 25 टक्के जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget