Maharashtra Breaking News 25 June 2022 : राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 25 Jun 2022 04:05 PM
पालघरमध्ये उत्पादन शुल्क विभागाने दमण बनावटीच्या दारुसह 80 लाखांचा मुद्देमाल पकडला

एकीकडे राज्यात राजकीय धुरळा सुरु असताना दुसरीकडे मात्र मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरुन दमण बनावटीची अवैद्य दारु महाराष्ट्रात आणली जात असल्याचे उघड झालं आहे. दमणवरुन मुंबईकडे तब्बल 80 लाख रुपयांची दमन बनावटीची दारु घेऊन जाणारा कंटेनर पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतला आहे. दमण बनावटीची दारु मुंबई, ठाणे अशा महानगरांमध्ये नेऊन दाम दुप्पट किमतीने विकली जाते. एक कंटेनर पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले असले तरी असे दिवसागणिक कित्येक कंटेनर हे दमण गुजरात मार्गे मुंबईत आणि ठाण्यात दाखल होतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज केलेल्या कारवाईत मुद्देमालासह तब्बल 80 लाख रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे.

Raigad: शिवसेनेच्या माजी नगरसेवक प्रसाद सावंत यांच्यावर अज्ञातांनी केला हल्ला

माथेरान येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रसाद सावंत यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. या हेलखोरांनी कर्जतनजीक प्रसाद सावंत यांच्या गाडीची तोडफोड केल्याचं सांगितलं जात आहे. सावंत यांच्यावर 10 ते 15 लोकांनी हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रसाद सावंत यांना कर्जत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाण्याच्या प्रवाहात बैलगाडी उलटून महिलेसह मुलीचा मृत्यू, नांदगाव तालुक्यातील घटना

नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र या मुसळधार पावसात महिलेसह दोन मुली बैलगाडीने घरी परतत असताना बैलगाडी उलटून तिघीही वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोघींचा मृत्यू झाला असून एका मुलीचा शोध सुरु आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा



वारीत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी केला हात साफ

संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या दोन्ही पालख्या पुण्याहून पंढरपूरकडे रवाना झाल्या. करोनानंतरचा हा पहिलाच पालखी सोहळा असल्याने यंदा वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनी वारकरी भाविकांचे मंगळसूत्र व इतर मौल्यवान वस्तूंची चोरी केली आहे. अशाच काही गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस वारकऱ्यांसोबत फिरत होते. त्यात पोलिसांना काही जणांना पकडण्यात यश मिळविले  आहे आणि सोन्याचे दागिने देखील जप्त केले आहेत. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

Jalna News: जालना पोलिसांची मोठी कारवाई; एकाचवेळी 9 तलवारी जप्त

Jalna Crime News: जालना पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. जालना शहरातील वाल्मिक नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या ताब्यातून तब्बल 9 तलवारी जप्त केल्या आहेत. एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या लोखंडी संदुकामध्ये या तलवारी लपवून ठेवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी शेख कलीम शेख शरीफ नावाच्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर त्याने आपल्या एका मित्राच्या मदतीने या तलवारी खरेदी केल्याची कबुली दिली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. राज ठाकरे यांच्यावर 20 जून रोजी लिलावती रुग्णालयात हिप बोनची शस्त्रक्रिया झाली. राज यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत आपल्याला डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे मेट्रो विस्तरणार

पीएमआरडीए (PMRDA) आणि ‘महामेट्रो’कडून सुमारे 43 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23 किलोमीटर लांबीच्या मार्गासह एकूण 66 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे शहरात निर्माण होणार आहे. त्यामध्ये खडकवासला ते स्वारगेट, हडसपर ते सासवड आणि स्वारगेट ते रेसकोर्स या मार्गांचा समावेश आहे.


 सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

गेल्या 24 तासात आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळं 10 जणांचा मृत्यू

आसाम (Assam) राज्यात पुरानं हाहाकार घातला आहे. पुराच्या पाण्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं लाखो लोक बेघर झाले आहेत. जवळपसा 45 लाखाहून अधिक नागरिकांना या पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. तसेच मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी भूस्खलन देखील झालं आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात या पुरामुळं आणि भूस्खलन झाल्यामुळं आसाममध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं आत्तापर्यंत मृत्यूचा आकडा हा 117 वर पोहोचला आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

लवकरच 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लसीकरण

देशात लवकरच 7 ते 11 वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणाला (Child Vaccination) सुरुवात होण्याची शक्यता आहे. सरकारने औषध नियामक मंडळाकडे 7 ते 11 वयोगटातील मुलांच्या लसीकरणात कोवोवॅक्स (Covovax) कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने DCGI  कोवोवॅक्स लसीच्या आपात्कालीन वापराला मान्यता देण्याची शिफारस केली आहे. अंतिम मंजुरीसाठी अहवाल भारतीय औषध नियामक मंडळाकडे (DCGI) पाठवण्यात आला आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा


 

शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली, शिंदे गटाचं चर्चेसाठी एक शिष्टमंडळ तयार होणार

- शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली, शिंदे गटाचं चर्चेसाठी एक शिष्टमंडळ तयार होणार...


- शिष्टमंडळात शंभूराज देसाई,दादा भुसे,भरत गोगावले,बच्चू कडू यांचा समावेश असण्याची शक्यता


- शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळात प्रवक्तेपद देखील असणार..


- आज दुपारी दोनच्या सुमारास एक बैठक देखील या सगळ्या आमदारांची होणार आहे...

बंडखोर एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी?आज दुपारी 1 वाजता शिवसेना भवनात शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी

बंडखोर एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी?आज दुपारी 1 वाजता शिवसेना भवनात शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी


शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेणार ?


आज दुपारी 1 वाजता शिवसेना भवनात शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी


पक्षाच्या घटनेतही काही बदल केले जाण्याची शक्यता

राहुल गांधींच्या वायनाडमधील कार्यालयाची तोडफोड






शिवसैनिक रस्त्यावर येण्याची शक्यता, महाराष्ट्रात हाय अलर्ट






शिवसेनेच्या कार्यकारिणीची आज बैठक

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी बंडखोरांना थेट आव्हान दिलं आहे. आज दुपारी एक वाजता त्यांनी शिवसेना कार्य़कारिणीची बैठक बोलावली आहे. 




 



 

 16 बंडखोरांना अपात्रतेची नोटीस, सोमवारपर्यंत वेळ

बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशा आशयाची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत माडण्यासाठी सागण्यात आलं असून त्यांनी मत मांडलं नाही तर त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे.  त्यामुळे बंडखोरांना आता शिवसेनेचं कवच सोडावं लागणार आहे. उद्यापासून सर्वांना नोटिसा जातील आणि त्यांना सोमवार पर्यंत वेळ देण्यात येईल, यावर त्यांना उत्तर द्यायचं आहे असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. 


या बंडखोर आमदारांना परत पक्षात घ्यायचं का नाही ते आता उद्धव ठाकरे ठरवतील असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं. या आमदारांचा एक वेगळा गट होऊ शकत नाही, त्यांना भाजपमध्ये विलिनीकरण करावं लागेल. मग ते कट्टर शिवसैनिक आहेत ही जी काही डॉयलॉगबाजी ते करत होते ती बंद होईल असंही अरविंद सावंत म्हणाले. 


पार्श्वभूमी


Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 


16 बंडखोरांना अपात्रतेची नोटीस, सोमवारपर्यंत वेळ
बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशा आशयाची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत माडण्यासाठी सागण्यात आलं असून त्यांनी मत मांडलं नाही तर त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे.  त्यामुळे बंडखोरांना आता शिवसेनेचं कवच सोडावं लागणार आहे. उद्यापासून सर्वांना नोटिसा जातील आणि त्यांना सोमवार पर्यंत वेळ देण्यात येईल, यावर त्यांना उत्तर द्यायचं आहे असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. 


या बंडखोर आमदारांना परत पक्षात घ्यायचं का नाही ते आता उद्धव ठाकरे ठरवतील असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं. या आमदारांचा एक वेगळा गट होऊ शकत नाही, त्यांना भाजपमध्ये विलिनीकरण करावं लागेल. मग ते कट्टर शिवसैनिक आहेत ही जी काही डॉयलॉगबाजी ते करत होते ती बंद होईल असंही अरविंद सावंत म्हणाले. 


शिवसेनेच्या कार्यकारिणीची आज बैठक
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी बंडखोरांना थेट आव्हान दिलं आहे. आज दुपारी एक वाजता त्यांनी शिवसेना कार्य़कारिणीची बैठक बोलावली आहे. 


शिवसैनिक रस्त्यावर येण्याची शक्यता, महाराष्ट्रात हाय अलर्ट
मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र राज्यातीलही सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे विशेष आदेश दिले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गोंधळ घालू शकतात, असा अलर्ट त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये आणि शांतता राखावी यासाठी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


राहुल गांधींच्या वायनाडमधील कार्यालयाची तोडफोड
शुक्रवारी केरळमधील वायनाडमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. भारतीय युवक काँग्रेसने एका ट्वीटमध्ये आरोप केला आहे की एसएफआयचे झेंडे धरलेल्या काही गुंडांनी राहुल गांधींच्या वायनाड कार्यालयाच्या भिंतीवर चढून कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याच दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत. 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.