एक्स्प्लोर

Maharashtra Rain : पुढचे तीन दिवस कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा; राज्य आपत्कालीन केंद्राचे आवाहन

Maharashtra Weather Update : प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 24x7 कार्यरत ठेवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोकण (Konkan), मराठवाडा (Marathwada) आणि मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) या भागात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी (Heavy Rainfall) होण्याची शक्यता वर्तवली आहे. या दरम्यान नागरिकांनी खबरदारी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराचा (Urban Flood) धोका असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सांगितले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Update : प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तयारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. घाट परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता असून फ्लॅश फ्लडचा (Flash Flood) धोका आहे. नद्यांच्या प्रवाहावर लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी, असेही सांगितले आहे.

Disaster Management Control Room : नियंत्रण कक्ष आणि पायाभूत सुविधा

प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष 24x7 कार्यरत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरी सखल भागात पाणी उपसा पंप, जुन्या धोकादायक इमारतींसाठी सुरक्षा उपाय, वीज व रस्ते दुरुस्ती पथक तैनात करण्यासही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मध्यम धरणांचा साठा व विसर्ग नियमित तपासण्यास सांगितले आहे.

संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने  आपत्ती पूर्व सूचना SMS, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात याव्यात. नागरिकांनीही सतर्कता बाळगावी अशा सूचना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.

नागरिकांसाठी सूचना

नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, धोकादायक व पूरप्रवण भाग टाळावेत, वीज पडत असताना झाडाखाली थांबू नये, पूरस्थितीत नदी-नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे. आपत्तीच्या परिस्थितीत स्थानिक निवारा केंद्रांचा वापर करावा आणि अनावश्यक प्रवास व पर्यटन टाळावे.

Maharashtra Emergency Numbers : आपत्कालीन संपर्क क्रमांक

धाराशीव: 02472-227301

बीड: 02442-299299

परभणी: 02452-226400

लातूर: 02382-220204

रत्नागिरी: 7057222233

सिंधुदुर्ग: 02362-228847

पुणे: 9370960061

सोलापूर: 0217-2731012

अहमदनगर: 0241-2323844

नांदेड: 02462-235077

रायगड: 8275152363

पालघर: 02525-297474

ठाणे: 9372338827

सातारा: 02162-232349

मुंबई (शहर व उपनगर): 1916 / 022-69403344

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (24x7) संपर्क क्रमांक:

022-22027990

022-22794229

022-22023039

9321587143

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget