एक्स्प्लोर

सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे केव्हाच रद्दीत विकले : एकनाथ खडसे

'सर्वांना एकत्र घेऊन लढले असते तर आणखी 25 जागा वाढल्या असत्या; जेष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्याचं कारण काय?', असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींवर आपल्याला अनेक प्रतिक्रीया पाहायला मिळतात. अशातच भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. 'सर्वांना एकत्र घेऊन लढले असते तर आणखी 25 जागा वाढल्या असत्या; जेष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्याचं कारण काय?' असं एकनाथ खडसे विधीमंडळ परिसरात माध्यामांशी बोलताना म्हणाले. तसेच सिंचन घोटाळ्याचे जे बैलगाडीभर पुरावे होते, ते आम्ही केव्हाच रद्दीत विकले आहेत, कारण त्यावेळी रद्दीचा भाव जास्त होता, असं खडसे म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ :  सिंचन घोटाळ्यांचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले : एकनाथ खडसे

'2014 ला भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत सामुहिक निर्णय घेतला. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता असल्यामुळे त्या निर्णयाची घोषणा केली. हा निर्णय माझा वैयक्तिक नसून तो पक्षाचा होता. त्या निर्णयाच्या अनुषंगाने  जे काही चित्र महाराष्ट्रात उभं राहिलं ते आपण सर्वांनी पाहिलंच. त्यानंतर ही चूक दुरूस्त करण्याचाही प्रयत्न झाला आणि सहा महिन्यानंतर पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आली. त्यानंतर गेले साडेचार वर्ष युतीच्या माध्यमातून सरकार चालवलं. 2019मध्येही महायुतीला याठिकाणी मतदान करण्यात आलं असून जनतेनं स्पष्ट बहुमतही दिलं होतं. पण दुर्दैवानं मुख्यमंत्रीपद कोणाला? आणि किती वर्षांसाठी? या कारणामुळे भाजप आणि शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे गेल्या महिन्याभरात ज्या घडामोडी झाल्या त्या आपण पाहिल्याच आहेत. स्पष्ट बहुमत असूनही महायुतीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही.' असं एकनाथ खडे बोलताना म्हणाले.

Maharashtra Govt Formation | उद्धव ठाकरे शपथविधीसाठी राज ठाकरेंना निमंत्रण देण्याची शक्यता

'माझं स्पष्ट मत आहे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मी, आमच्यासारख्यांना घेऊन निवडणूक लढली असती, तर 25 जागा वाढल्या असत्या. पक्ष कधीच चूकत नाही. ज्यांच्या हातात धुरा दिलेली असते, त्यांचा निर्णय चुकू शकतो.' असं म्हणत एकनाथ खडसेंनी थेट भाजप नेतृत्त्वावर निशाणा साधला. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, 'जेष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्याचं कारण काय? हा प्रश्न मी वरिष्ठांपासून सर्वांना वारंवार विचारला. माझी राजकारणातील 40 ते 42 वर्षांची तपश्चर्या आहे, माझा अधिकार होता. कठीण कालखंडामध्ये आम्ही पक्ष उभा केला आहे. त्यामुळे पक्षाचा विरोधात आम्ही जाऊ शकत नाही. या पक्षाच्या यशासाठीच आम्ही प्रयत्न केले असते. दुर्दैवाने ज्या लोकांनी या पक्षाच्या विकासासाठी मदत केली, अशा लोकांनाही बाजूला ठेवल्याचा या निवडणुकीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं.'

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget