एक्स्प्लोर

बहुमत नसताना फडणवीसांनी शपथ घ्यायला नको होती : एकनाथ खडसे

विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा? या विषयावरून शिवसेना आणि भाजपा मध्ये युती होऊ शकली नाही आणि त्यानंतर सर्वच पक्ष सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष आघाडी करीत असल्याचं पाहायला मिळाले. तर भाजप आणि राष्ट्रवादी सोबत जात असल्याने अनाकलनीय असं राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा पाहायला मिळालं आहे.

मुंबई : आपल्याकडून बहुमत सिद्ध होत नसल्याचे लक्षात आल्यावर पहिल्यांदा अजित पवार यांनी आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने आणि सामाजिकदृष्ट्या योग्य तर नाहीच शिवाय ही नामुष्की असल्याचं मत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्याभरापासून सत्तेसाठीचे सर्वच पक्षांकडून जाणाऱ्या तडजोडीमुळे जनता आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे ही खडसे यांनी म्हटलं आहे. मात्र आपल्या जवळ बहुमत नसताना भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आणि अजित पवार यांनी शपथ घ्यायलाच नको होती . मात्र या घटनेवरून पुढील काळात बोध घ्यायला हवा. विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा? या विषयावरून शिवसेना आणि भाजपा मध्ये युती होऊ शकली नाही आणि त्यानंतर सर्वच पक्ष सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष आघाडी करीत असल्याचं पाहायला मिळाले. तर भाजप आणि राष्ट्रवादी सोबत जात असल्याने अनाकलनीय असं राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा पाहायला मिळालं आहे. शिवसेना आणि भाजपचा विचार केला तर या दोन्ही पक्षांना जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. स्पष्ट दिले असताना केवळ मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही पक्षांमध्ये झालेला वाद हा जनतेला न पटणारा होता. त्यामुळे ना मला न तुला घाल कुत्र्याला असा प्रकार यामध्ये झालेला आपल्याला दिसत असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचा आणि सामान्य जनतेचा विचार केला तर कोणाचेही असो सरकार लवकर बनले पाहिजे. लोक प्रतिनिधींचा अंकुश असल्याशिवाय जनतेचे प्रश्न त्वरित सोडविण्यास मदत होत असते. हा अंकुश नसेल तर सरकारी अधिकारी जनतेच्या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने पाहात नाहीत. त्यामुळे ज्यांना बनवायचे त्यांनी लवकर सरकार बनवायला पाहिजे असं मत खडसे यांनी व्यक्त केले आहे. सरकार कुणाचे बनेल असा प्रश्न विचारला असता खडसे यांनी मात्र मौन बाळगणेच पसंत केले असून या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती पहिली तर राज्यपालांनी जी मदत जाहीर केलेली आहे. ती अतिशय अल्प स्वरूपाची आहे. दोन हेक्टरसाठी आठ हजार रुपये मदत वाढवून मिळायला हवी ती किमान पाच हेकटर पर्यंत असायला हवी तरच त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल अस मतही खडसे यांनी व्यक्त केले आहे. जळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी बातचीत करीत असताना खडसे यांनी हे मत व्यक्त केले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 एप्रिल 2026 | रविवार
गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, 45 गॅस सिलेंडरसह 3 दुचाकी जप्त, पवई पोलिसांची मोठी कारवाई 
गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, 45 गॅस सिलेंडरसह 3 दुचाकी जप्त, पवई पोलिसांची मोठी कारवाई 
राहुरी विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून कोण लढणार? तिढा कायम, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु
राहुरी विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून कोण लढणार? तिढा कायम, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Rickshaw License : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
धक्कादायक! लग्नाच्या वरातीत घुसून पुतण्याकडूनच चाकू हल्ला; खळबळजनक घटनेत बाप-लेकाचा मृत्यू
धक्कादायक! लग्नाच्या वरातीत घुसून पुतण्याकडूनच चाकू हल्ला; खळबळजनक घटनेत बाप-लेकाचा मृत्यू
पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक
पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक
शेकडो कमांडो, डझनभर फायटर जेट, हेलिकॉप्टर्स, सायबर, गुप्तचर यंत्रणा, C-130 विमानात अडचण येताच जागेवर बाॅम्ब टाकून उडवली, दुसरी दोन आणली; अमेरिकेनं आपल्या शस्त्रास्त्र अधिकाऱ्याला इराणच्या तावडीतून कसं सोडवलं?
शेकडो कमांडो, डझनभर फायटर जेट, हेलिकॉप्टर्स, सायबर, गुप्तचर यंत्रणा, C-130 विमानात अडचण येताच जागेवर बाॅम्ब टाकून उडवली, दुसरी दोन आणली; अमेरिकेनं आपल्या शस्त्रास्त्र अधिकाऱ्याला इराणच्या तावडीतून कसं सोडवलं?
Embed widget