एक्स्प्लोर

बहुमत नसताना फडणवीसांनी शपथ घ्यायला नको होती : एकनाथ खडसे

विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा? या विषयावरून शिवसेना आणि भाजपा मध्ये युती होऊ शकली नाही आणि त्यानंतर सर्वच पक्ष सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष आघाडी करीत असल्याचं पाहायला मिळाले. तर भाजप आणि राष्ट्रवादी सोबत जात असल्याने अनाकलनीय असं राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा पाहायला मिळालं आहे.

मुंबई : आपल्याकडून बहुमत सिद्ध होत नसल्याचे लक्षात आल्यावर पहिल्यांदा अजित पवार यांनी आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने आणि सामाजिकदृष्ट्या योग्य तर नाहीच शिवाय ही नामुष्की असल्याचं मत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्याभरापासून सत्तेसाठीचे सर्वच पक्षांकडून जाणाऱ्या तडजोडीमुळे जनता आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे ही खडसे यांनी म्हटलं आहे. मात्र आपल्या जवळ बहुमत नसताना भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आणि अजित पवार यांनी शपथ घ्यायलाच नको होती . मात्र या घटनेवरून पुढील काळात बोध घ्यायला हवा. विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा? या विषयावरून शिवसेना आणि भाजपा मध्ये युती होऊ शकली नाही आणि त्यानंतर सर्वच पक्ष सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष आघाडी करीत असल्याचं पाहायला मिळाले. तर भाजप आणि राष्ट्रवादी सोबत जात असल्याने अनाकलनीय असं राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा पाहायला मिळालं आहे. शिवसेना आणि भाजपचा विचार केला तर या दोन्ही पक्षांना जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. स्पष्ट दिले असताना केवळ मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही पक्षांमध्ये झालेला वाद हा जनतेला न पटणारा होता. त्यामुळे ना मला न तुला घाल कुत्र्याला असा प्रकार यामध्ये झालेला आपल्याला दिसत असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचा आणि सामान्य जनतेचा विचार केला तर कोणाचेही असो सरकार लवकर बनले पाहिजे. लोक प्रतिनिधींचा अंकुश असल्याशिवाय जनतेचे प्रश्न त्वरित सोडविण्यास मदत होत असते. हा अंकुश नसेल तर सरकारी अधिकारी जनतेच्या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने पाहात नाहीत. त्यामुळे ज्यांना बनवायचे त्यांनी लवकर सरकार बनवायला पाहिजे असं मत खडसे यांनी व्यक्त केले आहे. सरकार कुणाचे बनेल असा प्रश्न विचारला असता खडसे यांनी मात्र मौन बाळगणेच पसंत केले असून या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती पहिली तर राज्यपालांनी जी मदत जाहीर केलेली आहे. ती अतिशय अल्प स्वरूपाची आहे. दोन हेक्टरसाठी आठ हजार रुपये मदत वाढवून मिळायला हवी ती किमान पाच हेकटर पर्यंत असायला हवी तरच त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल अस मतही खडसे यांनी व्यक्त केले आहे. जळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी बातचीत करीत असताना खडसे यांनी हे मत व्यक्त केले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Nabin BJP: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान

व्हिडीओ

Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
Gosikhurd Project Special Report गोसेखुर्द काठोकाठ पण 38 वर्षांपासून गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Naresh Mhaske Coffee with Kaushik : मुंबईत महापौर कुणाचा? खासदार नरेश म्हस्के यांचा खळबळजनक पॉडकास्ट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Nabin BJP: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Kalyan Dombivli Mahangarpalika Election 2026: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत चक्रावणारं राजकारण, ठाकरेंचे दोन नगरसेवक गायब, दोन जण मनसेच्या गोटात
कल्याण-डोंबिवलीत चक्रावणारं राजकारण, ठाकरेंचे दोन नगरसेवक गायब, दोन जण मनसेच्या गोटात
Embed widget