एक्स्प्लोर

बहुमत नसताना फडणवीसांनी शपथ घ्यायला नको होती : एकनाथ खडसे

विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा? या विषयावरून शिवसेना आणि भाजपा मध्ये युती होऊ शकली नाही आणि त्यानंतर सर्वच पक्ष सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष आघाडी करीत असल्याचं पाहायला मिळाले. तर भाजप आणि राष्ट्रवादी सोबत जात असल्याने अनाकलनीय असं राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा पाहायला मिळालं आहे.

मुंबई : आपल्याकडून बहुमत सिद्ध होत नसल्याचे लक्षात आल्यावर पहिल्यांदा अजित पवार यांनी आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने आणि सामाजिकदृष्ट्या योग्य तर नाहीच शिवाय ही नामुष्की असल्याचं मत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्याभरापासून सत्तेसाठीचे सर्वच पक्षांकडून जाणाऱ्या तडजोडीमुळे जनता आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे ही खडसे यांनी म्हटलं आहे. मात्र आपल्या जवळ बहुमत नसताना भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आणि अजित पवार यांनी शपथ घ्यायलाच नको होती . मात्र या घटनेवरून पुढील काळात बोध घ्यायला हवा. विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा? या विषयावरून शिवसेना आणि भाजपा मध्ये युती होऊ शकली नाही आणि त्यानंतर सर्वच पक्ष सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष आघाडी करीत असल्याचं पाहायला मिळाले. तर भाजप आणि राष्ट्रवादी सोबत जात असल्याने अनाकलनीय असं राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा पाहायला मिळालं आहे. शिवसेना आणि भाजपचा विचार केला तर या दोन्ही पक्षांना जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. स्पष्ट दिले असताना केवळ मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही पक्षांमध्ये झालेला वाद हा जनतेला न पटणारा होता. त्यामुळे ना मला न तुला घाल कुत्र्याला असा प्रकार यामध्ये झालेला आपल्याला दिसत असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचा आणि सामान्य जनतेचा विचार केला तर कोणाचेही असो सरकार लवकर बनले पाहिजे. लोक प्रतिनिधींचा अंकुश असल्याशिवाय जनतेचे प्रश्न त्वरित सोडविण्यास मदत होत असते. हा अंकुश नसेल तर सरकारी अधिकारी जनतेच्या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने पाहात नाहीत. त्यामुळे ज्यांना बनवायचे त्यांनी लवकर सरकार बनवायला पाहिजे असं मत खडसे यांनी व्यक्त केले आहे. सरकार कुणाचे बनेल असा प्रश्न विचारला असता खडसे यांनी मात्र मौन बाळगणेच पसंत केले असून या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती पहिली तर राज्यपालांनी जी मदत जाहीर केलेली आहे. ती अतिशय अल्प स्वरूपाची आहे. दोन हेक्टरसाठी आठ हजार रुपये मदत वाढवून मिळायला हवी ती किमान पाच हेकटर पर्यंत असायला हवी तरच त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल अस मतही खडसे यांनी व्यक्त केले आहे. जळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी बातचीत करीत असताना खडसे यांनी हे मत व्यक्त केले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
BMC Election 2026: वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण

व्हिडीओ

Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report
Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
BMC Election 2026: वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
Malaika Arora Ready For Second Marraige: अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अरोरा दुसरं लग्न करणार? म्हणाली, 'यासाठी मी पूर्णपणे तयार...'
अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अरोरा दुसरं लग्न करणार? म्हणाली, 'यासाठी मी पूर्णपणे तयार...'
Chhatrapati Sambhaji Nagar Rashid Mamu: चंद्रकांत खैरेंच्या नाकावर टिच्चून छत्रपती संभाजीनगरध्ये रशीद मामूंनी उमेदवारी मिळवलीच, अंबादास दानवेंची सरशी
चंद्रकांत खैरेंच्या नाकावर टिच्चून छत्रपती संभाजीनगरध्ये रशीद मामूंनी उमेदवारी मिळवलीच, अंबादास दानवेंची सरशी
Neha Bhasin Decides Never Wants To Have Kids: 43 वर्षांच्या गायिकेचा मूल न होऊ देण्याचा निर्णय, लग्नाच्या नऊ वर्षांनीही ठाम; पती जबाबदार असल्याचंही थेट सांगून टाकलं
43 वर्षांच्या गायिकेचा मूल न होऊ देण्याचा निर्णय, लग्नाच्या नऊ वर्षांनीही ठाम; पतीलाच धरलं जबाबदार
Embed widget