एक्स्प्लोर

'महाबीज' शेतकऱ्यांना देणार परतावा रक्कम, बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी निर्णय

'महाबीज' शेतकऱ्यांना परतावा रक्कम देणार आहे. महाबीजनं बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात हा महत्वाचा निर्णय घेतलाय. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून संपूर्ण नुकसान भरपाईची मागणी केली गेली होती.

अकोला : बातमी आहे 'एबीपी माझा'च्या 'इम्पॅक्ट'ची. बोगस बियाणे प्रकरणी उपरती झालेल्या महाबीजला अखेर शेतकऱ्यांच्या मागणी समोर अखेर नमतं घ्यावं लागलं आहे. राज्यभरातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणातील तक्रारदार शेतकऱ्यांना 'महाबीज'नं परतावा रक्कम देणं सुरू केलं आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणात 'एबीपी माझा'नं सातत्यानं शेतकऱ्यांची बाजू लावून धरली होती. राज्यभरात मोठा रोष महाराष्ट्र बियाणे महामंडळ अर्थात 'महाबीज'. संपूर्ण खरीप हंगामात महाबीजचं सोयाबीन बियाणं वादग्रस्त ठरलं आहे. राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन बियाणं उगवलंच नाही. राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांवर यामूळे दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवलं होतं. यासंदर्भात महाबीजसह सोयाबीन इतर खाजगी बियाणे कंपन्यांच्या विरोधात राज्यभरात मोठा रोष निर्माण झाला होता. महाबीजनं तक्रारीनंतर सरकारच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना बियाणं बदलवून दिलं. मात्र, संपुर्ण नुकसान भरपाईची मागणी करणार्या शेतकऱ्यांना बियाणे रक्कम परताव्याचा निर्णय महाबीजनं घेतलाय. मात्र, शेतकऱ्यांनी या निर्णयावर टिका केली आहे. सोयाबीन बियाणे उत्पादक, विक्रेत्यांवर पुढील सुनावणी होईपर्यंत कारवाई करू नये : सर्वोच्च न्यायालय 700 क्विंटल बियाणं शेतकऱ्यांनी बदलून घेतलं यावर्षीच्या खरीप हंगामासाठी 'महाबीज' 2.93 लाख क्विंटल सोयाबीन बियाणं बाजारात आणलं होतं. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त 50 टक्केच बियाणं 'महाबीज'नं बाजारात आणलं होतं. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी महाबीजसह इतर खाजगी कंपन्यांचं सोयाबीन बियाणं उगवलंच नाही. यानंतर सरकारं याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तालुकास्तरीय चौकशी समित्या नेमल्यात. सरकारनं तक्रारदार शेतकऱ्यांना बियाणं बदलवून देण्याचा निर्णय घेतला. यानुसार महाबीजनं 3250 क्विंटल बियाणं यासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं होतं. यातील 700 क्विंटल बियाणं शेतकऱ्यांनी बदलून घेतलं होतं. काही शेतकऱ्यांनी बियाणे बदलून घ्यायला नकार दिला होता. अशा तक्रारदार शेतकऱ्यांना बियाण्याची रक्कम परत करण्याचा निर्णय 'महाबीज' प्रशासनानं घेतला आहे. Mahabeej | 'बियाणे न उगवायला केवळ बियाणांना दोष का द्यायचा?', महाबीज संघटनेच्या उलट्या बोंबा रक्कम होणार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. महाबीजनं आतापर्यंत बियाणे रक्कम परताव्याचे 19 लाख रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. महाबीज मुख्यालयानं प्रत्येक जिल्ह्यातील आपल्या यंत्रणेकडून शेतकऱ्यांच्या तक्रारींची माहिती आणि बँके खात्याचं विवरण मागितलं आहे. अकोल्याच्या महाबीज मुख्यालयात सध्या ही माहिती गोळा करण्याची लगबग सुरू आहे. मात्र, 'महाबीज' रक्कम परतावा मिळणाऱ्या शेतकर्‍यांचा आकडा सांगण्याचं जाणीवपूर्वक टाळलं आहे. यवतमाळ जिल्ह्याचा 'महाबीज' मुख्यालयाकडे नुकसान भरपाईसाठी 35 लाखांचा प्रस्ताव यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे न उगविल्याच्या सहा हजारांवर तक्रारी आल्या आहेत. यात 'महाबीजच्या बियाण्यांचा समावेश आहे. पेरणीच्या हंगामात महाबीज 45 क्विंटल बियाणे बदलून दिले आहे. आता पेरणीचा हंगाम निघून गेल्याने महाबीजने शेतकऱ्यांयांना बियाणे रक्कम परत देण्यासाठी 35 लाख रूपयांचा पहिला प्रस्ताव मुख्यालयात पाठविला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील नऊ लाख हेक्टरपैकी साडे आठ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात जवळपास दोन लाख 19 हजार हेक्टरवर यंदा सोयाबीनचा पेरा झाला आहे. राज्यभरात झालं होतं 'महाबीज'विरोधात आंदोलन यावर्षी 'महाबीज' बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नानंतर राज्यभरात अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनं केली होती. लातूरमध्ये 'मनसे'नं 'महाबीज'च्या जिल्हा कार्यालयात तोडफोड केली होती. तर 9 जुलै रोजी अकोल्यातील महाबीज मुख्यालयात युवक काँग्रेसनं मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या कक्षात सोयाबीन फेकलं होतं. मुख्य विरोधी पक्ष भाजपनं थेट रस्त्यावरचं आंदोलन केलं नसलं तरी विधीमंडळातील दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी सरकारकडे सातत्यानं यासंदर्भात बाजू मांडली. काँग्रेस, शेतकरी संघटनेची संपूर्ण नुकसान भरपाईची मागणी दरम्यान, काँग्रेस आणि शेतकरी संघटनेनं 'महाबीज'च्या या निर्णयावर टीका केली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनी महाबीजनं संपुर्ण भरपाई न दिल्यास युवक काँग्रेस परत रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला. तर शेतकरी संघटनेच्या 'सोशल मीडिया' आघाडीचे प्रमुख विलास ताथोड यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 15 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी सरकार आणि महाबीजकडे केली आहे. 'एबीपी माझा'चा सातत्यानं पाठपुरावा या संपूर्ण प्रकरणात 'एबीपी माझा'नं राज्यभरातून सातत्यानं पाठपुरावा केला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी यामुळे कसा देशोधडीला लागला याचं वृत्तांकन 'माझा' सातत्यानं सरकार आणि जनतेसमोर मांडलं आहे. निर्णयामुळे राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 'एबीपी माझा'चे आभार मानले आहेत. 'बियाणं असेल दमदार, तर पीक येईल जोमदार' ही 'महाबीज'ची 'टॅगलाईन' आहे. महाबीज'ने जुन्या चुका टाळत विश्वासहार्य बियाणे शेतकऱ्यांना पुरविणे आवश्यक आहे. तरच जनतेच्या मालकीचं हे महामंडळ खऱ्या अर्थाने अधिकाधिक लोकाभिमुख होईल, यात तिळमात्रही शंका नाही.
गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले

व्हिडीओ

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget