एक्स्प्लोर

'महाबीज' शेतकऱ्यांना देणार परतावा रक्कम, बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी निर्णय

'महाबीज' शेतकऱ्यांना परतावा रक्कम देणार आहे. महाबीजनं बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात हा महत्वाचा निर्णय घेतलाय. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून संपूर्ण नुकसान भरपाईची मागणी केली गेली होती.

अकोला : बातमी आहे 'एबीपी माझा'च्या 'इम्पॅक्ट'ची. बोगस बियाणे प्रकरणी उपरती झालेल्या महाबीजला अखेर शेतकऱ्यांच्या मागणी समोर अखेर नमतं घ्यावं लागलं आहे. राज्यभरातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणातील तक्रारदार शेतकऱ्यांना 'महाबीज'नं परतावा रक्कम देणं सुरू केलं आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणात 'एबीपी माझा'नं सातत्यानं शेतकऱ्यांची बाजू लावून धरली होती. राज्यभरात मोठा रोष महाराष्ट्र बियाणे महामंडळ अर्थात 'महाबीज'. संपूर्ण खरीप हंगामात महाबीजचं सोयाबीन बियाणं वादग्रस्त ठरलं आहे. राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन बियाणं उगवलंच नाही. राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांवर यामूळे दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवलं होतं. यासंदर्भात महाबीजसह सोयाबीन इतर खाजगी बियाणे कंपन्यांच्या विरोधात राज्यभरात मोठा रोष निर्माण झाला होता. महाबीजनं तक्रारीनंतर सरकारच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना बियाणं बदलवून दिलं. मात्र, संपुर्ण नुकसान भरपाईची मागणी करणार्या शेतकऱ्यांना बियाणे रक्कम परताव्याचा निर्णय महाबीजनं घेतलाय. मात्र, शेतकऱ्यांनी या निर्णयावर टिका केली आहे. सोयाबीन बियाणे उत्पादक, विक्रेत्यांवर पुढील सुनावणी होईपर्यंत कारवाई करू नये : सर्वोच्च न्यायालय 700 क्विंटल बियाणं शेतकऱ्यांनी बदलून घेतलं यावर्षीच्या खरीप हंगामासाठी 'महाबीज' 2.93 लाख क्विंटल सोयाबीन बियाणं बाजारात आणलं होतं. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त 50 टक्केच बियाणं 'महाबीज'नं बाजारात आणलं होतं. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी महाबीजसह इतर खाजगी कंपन्यांचं सोयाबीन बियाणं उगवलंच नाही. यानंतर सरकारं याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तालुकास्तरीय चौकशी समित्या नेमल्यात. सरकारनं तक्रारदार शेतकऱ्यांना बियाणं बदलवून देण्याचा निर्णय घेतला. यानुसार महाबीजनं 3250 क्विंटल बियाणं यासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं होतं. यातील 700 क्विंटल बियाणं शेतकऱ्यांनी बदलून घेतलं होतं. काही शेतकऱ्यांनी बियाणे बदलून घ्यायला नकार दिला होता. अशा तक्रारदार शेतकऱ्यांना बियाण्याची रक्कम परत करण्याचा निर्णय 'महाबीज' प्रशासनानं घेतला आहे. Mahabeej | 'बियाणे न उगवायला केवळ बियाणांना दोष का द्यायचा?', महाबीज संघटनेच्या उलट्या बोंबा रक्कम होणार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. महाबीजनं आतापर्यंत बियाणे रक्कम परताव्याचे 19 लाख रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. महाबीज मुख्यालयानं प्रत्येक जिल्ह्यातील आपल्या यंत्रणेकडून शेतकऱ्यांच्या तक्रारींची माहिती आणि बँके खात्याचं विवरण मागितलं आहे. अकोल्याच्या महाबीज मुख्यालयात सध्या ही माहिती गोळा करण्याची लगबग सुरू आहे. मात्र, 'महाबीज' रक्कम परतावा मिळणाऱ्या शेतकर्‍यांचा आकडा सांगण्याचं जाणीवपूर्वक टाळलं आहे. यवतमाळ जिल्ह्याचा 'महाबीज' मुख्यालयाकडे नुकसान भरपाईसाठी 35 लाखांचा प्रस्ताव यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे न उगविल्याच्या सहा हजारांवर तक्रारी आल्या आहेत. यात 'महाबीजच्या बियाण्यांचा समावेश आहे. पेरणीच्या हंगामात महाबीज 45 क्विंटल बियाणे बदलून दिले आहे. आता पेरणीचा हंगाम निघून गेल्याने महाबीजने शेतकऱ्यांयांना बियाणे रक्कम परत देण्यासाठी 35 लाख रूपयांचा पहिला प्रस्ताव मुख्यालयात पाठविला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील नऊ लाख हेक्टरपैकी साडे आठ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात जवळपास दोन लाख 19 हजार हेक्टरवर यंदा सोयाबीनचा पेरा झाला आहे. राज्यभरात झालं होतं 'महाबीज'विरोधात आंदोलन यावर्षी 'महाबीज' बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नानंतर राज्यभरात अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनं केली होती. लातूरमध्ये 'मनसे'नं 'महाबीज'च्या जिल्हा कार्यालयात तोडफोड केली होती. तर 9 जुलै रोजी अकोल्यातील महाबीज मुख्यालयात युवक काँग्रेसनं मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या कक्षात सोयाबीन फेकलं होतं. मुख्य विरोधी पक्ष भाजपनं थेट रस्त्यावरचं आंदोलन केलं नसलं तरी विधीमंडळातील दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी सरकारकडे सातत्यानं यासंदर्भात बाजू मांडली. काँग्रेस, शेतकरी संघटनेची संपूर्ण नुकसान भरपाईची मागणी दरम्यान, काँग्रेस आणि शेतकरी संघटनेनं 'महाबीज'च्या या निर्णयावर टीका केली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनी महाबीजनं संपुर्ण भरपाई न दिल्यास युवक काँग्रेस परत रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला. तर शेतकरी संघटनेच्या 'सोशल मीडिया' आघाडीचे प्रमुख विलास ताथोड यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 15 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी सरकार आणि महाबीजकडे केली आहे. 'एबीपी माझा'चा सातत्यानं पाठपुरावा या संपूर्ण प्रकरणात 'एबीपी माझा'नं राज्यभरातून सातत्यानं पाठपुरावा केला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी यामुळे कसा देशोधडीला लागला याचं वृत्तांकन 'माझा' सातत्यानं सरकार आणि जनतेसमोर मांडलं आहे. निर्णयामुळे राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 'एबीपी माझा'चे आभार मानले आहेत. 'बियाणं असेल दमदार, तर पीक येईल जोमदार' ही 'महाबीज'ची 'टॅगलाईन' आहे. महाबीज'ने जुन्या चुका टाळत विश्वासहार्य बियाणे शेतकऱ्यांना पुरविणे आवश्यक आहे. तरच जनतेच्या मालकीचं हे महामंडळ खऱ्या अर्थाने अधिकाधिक लोकाभिमुख होईल, यात तिळमात्रही शंका नाही.
गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | बुधवार

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
Embed widget