एक्स्प्लोर

Jitendra Awhad : सत्य समोर येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनीही एखादा चित्रपट काढावा; आमदार जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला 

Jitendra Awhad : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एखादा सिनेमा काढावा, जेणेकरून लोकांना सत्य काय आहे ते कळेल. असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील एखादा सिनेमा काढावा, जेणेकरून लोकांना सत्य काय आहे तेही कळेल. सिनेमांमध्ये बऱ्याचशा गोष्टी खोट्या दाखवतात, तसेच खऱ्या गोष्टी देखील दाखवता येत असतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची देखील तयारी असल्यास त्यांनी देखील एखादा सिनेमा काढून कुणाचे मुखवटे फाडायचे आहेत तर जरूर त्यांनी हे काम केलं पाहिजे, असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. 

नुकताच बहुप्रतिक्षित 'धर्मवीर-2' (Dharmaveer 2) सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या सोहळ्याला सिनेमातील कलाकारांसह अशोक सराफ, महेश कोठारे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची देखील उपस्थिती होती. धर्मवीर-2 या सिनेमाविषयी अनेकांना उत्सुकता आहे. कारण या सिनेमातून महाराष्ट्राच्या राजकारणातील कोणत्या घटनेचा उलगडा केला जाणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण याचं उत्तर येत्या 9 ऑगस्ट रोजी सिनेमागृहांत प्रेक्षकांना मिळणार आहे. मात्र त्याआधीच सिनेमातील काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं असताना या सिनेमामुळे राजकीय वातावरण देखील तापले आहे. अशातच आज या चित्रपटावरुन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीसांनीही एखादा चित्रपट काढावाच! -जितेंद्र आव्हाड

देवेंद्र फडणवीस यांची देखील एखादा सिनेमा काढण्याची तयारी असल्यास त्यांनी देखील एखादा सिनेमा काढला पाहिजे. या सिनेमाच्या रूपाने महाराष्ट्रातील जनतेला हे कळाले देखील पाहिजे की कुणाचे मुखवटे आणि कुणाचा चेहरा कसा आहे. किंबहुना या निमित्ताने ते सर्वांना कळेल, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.नुकताच धर्मवीर या चित्रपटाचा दुसऱ्या भागाचा टेलर प्रदर्शित करण्यात आलं. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मला देखील एक चित्रपट काढायचा असून हा चित्रपट प्रदर्शित झाला तर अनेकांचे मुखवटे बाहेर पडतील, असे बोलताना फडणवीस म्हणाले होते. आता याच मुद्द्याला घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत उत्तर दिले आहे.

मुंबई महानगरपालिका म्हणजे रोज 50 लिटर दूध देणारी दुभती गाय 

डिंपल चड्डा नामक एका व्यवसायिकेला कुठलाही अनुभव नसताना त्यांना 400 कोटी रुपये दिले जाणार आहे. म्हणजे राज्यात कर्जातून सरकार चालत असल्याचे चित्र आहे. या सरकारला मराठी माणसं दिसतच नाही. परिणामी ते त्यांना बिनव्याजी नाहीत तर त्यांना घरात जाऊन देखील पैसे पोहोचवतील, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. नुकतीच मुंबई महानगरपालिकेमध्ये मी एक प्रकरण ऐकलं यामध्ये  ज्या बिघडलेल्या मशीन ज्याची मूळ किंमत वीस हजार रुपये आहे, त्याची बिलामध्ये 65 हजार रुपये एवढी किंमत दाखवली आहे. हा जवळजवळ कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आहे. ड्रीम सोल्युशन नामक ही एक कंपनी असून या कंपनीमध्ये काम करणारे सर्व कामगार हे हैदराबाद येथील आहे. दुसरीकडे राज्यात  शिक्षण घेऊन देखील तरुणांच्या हाताला काम मिळत नाही आहेत. सध्या घडीला मुंबई महानगरपालिका 50 लिटर दूध देणारी दुभती गाय असल्याची ल्याची टीकाही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ही ही वाचा 

कोविड १९ च्या प्रादुर्भाव नंतर ABP माझा मध्ये कार्यरत..
Read More

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget