एक्स्प्लोर

कोरोनामुळे लग्नकार्यावर होणाऱ्या वाऱ्यामाप खर्चाला कात्री; यवतमाळमध्ये नोंदणी विवाहांमध्ये वाढ

कोरोनाकाळात दिलासादायक गोष्ट म्हणजे निर्बंधामुळे लग्नकार्यावर होणाऱ्या वारेमाप खर्चाला कात्री लागली आहे.

यवतमाळ : कोरोनामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहेत. याचा फटका मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना बसत आहे. मात्र, यात दिलासादायक गोष्ट म्हणजे कोरोना काळातील निर्बंधामुळे लग्नकार्यावर होणाऱ्या वारेमाप खर्चाला कात्री लागली आहे. त्यात विदर्भातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतच असल्याने आता जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभसाठी केवळ 35 लोकांची परवानगी दिली असली तरी आता बरीच मंडळी बडेजाव पद्धतीने लग्न न करता साध्या सोप्या पद्धतीने लग्न लावताना दिसून येत आहे.

लग्नामध्ये खर्च कमी करण्यासाठी सहदुय्यम निबंधक कार्यालयात येऊन नवदाम्पत्य विवाह नोंदणी करीत आहेत. केवळ 200 ते 250 रुपयात लग्न होतंय. त्यामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत सोप्या पद्धतीने विवाह होत असल्याने आता नागरिकांचा कल लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात या विवाह पद्धतीकडे वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

लग्नकार्यात अनेक मंडळी लग्नकार्यातील तामझामवर पाण्यासारखा पैशाचा खर्च करतात. त्यात आता कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 35 लोकांची मर्यादा लग्नकार्यासाठी निश्चित केली आहे. अशावेळी आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्ट लग्न आणि त्याच लग्नकार्यासाठी सोप्या आणि कमी खर्चात विवाह करण्यासाठी अनेक मंडळी विवाह नोंदणी कार्यालयात येऊन लग्न लावत आहेत. यात वर-वधू आणि तीन साक्षीदार एवढ्या लोकांची गरज असते. एक महिन्यापूर्वी नोंदणी करायची आणि त्यानंतर 30 दिवसांनी जोडप्याला लग्न करता येते, तेही अगदी 200 ते 250 रुपयात. त्यामुळे या नोंदणी विवाह पद्धतीने लग्न करण्यासाठी आता नागरिकांचा कल वाढला आहे.

विवाह नोंदणी पद्धतीने केल्याने लाखोंचा खर्च फक्त काही रुपयांवर आला आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती या विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी येत आहेत. लग्न करणारे उपवर वर आणि वधू सोबत तीन साक्षीदार एवढ्याच लोकात लग्न लागते. या लग्न पद्धीतीने खर्चात बचत होत असून बरेच पालक लग्नकार्यात होणाऱ्या वारेमाप खर्चात बचत होत असल्याने तेच पैसे याच नावदाम्पत्याला भविष्यासाठी मदत म्हणून देत आहेत. त्यामुळे आता नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी कल वाढला असल्याची माहिती विवाह नोंदणी अधिकारी वसंत कळंबे यांनी दिली.

दिव्यांगांचे लग्न
अमरावती येथील राजेश बोरकर आणि यवतमाळच्या कामठवाडा गावची मंगला श्रीरामे या दोघांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतले असून राजेश अमरावती येथील एका कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करतोय. या जोडप्याचे याच सोप्या पद्धतीने विवाह नोंदणी कार्यालयात मोजक्या लोकांच्या उपस्थितमध्ये लग्न लागले. विशेष म्हणजे हे नवविवाहित दाम्पत्य दिव्यांग म्हणजे जन्मतः बोलता न येणारे वर-वधू असल्याने त्यांच्या पालकांच्या साक्षीने हे लग्न लागले.

नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली
यवतमाळ जिल्ह्यात सन 2018 ते 19 मध्ये 280 नोंदणी पद्धतीने लग्न लागले. तर सन 2019 ते 20 मध्ये 305 नोंदणी पद्धतीने लग्न झाली असून कोरोनाच्या उद्रेकानंतर मे 2020 ते 10 मार्च 2021 पर्यंत 303 लग्न विवाह नोंदणी पद्धतीने झाली आहेत. कमी खर्चात कमी वेळेत विवाह नोंदणी कार्यालयात लग्न होत असल्याने या पद्धतीने लग्न करणाऱ्या व्यक्तीची संख्या कोरोनाच्या लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात वाढताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vinayak Raut : ती घरातून जाताना स्त्रीधन, 10-12 बॅग भरुन कपडे घेऊन गेली, त्यानंतर फ्लॅट, गाडी, कोट्यावधी रूपयांची डिमांड, विनायक राऊतांनी सगळंच काढलं
ती घरातून जाताना स्त्रीधन, 10-12 बॅग भरुन कपडे घेऊन गेली, त्यानंतर फ्लॅट, गाडी, कोट्यावधी रूपयांची डिमांड, विनायक राऊतांनी सगळंच काढलं
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Bhiwandi News: फ्लॅटच्या लोखंडी खिडकीवर खेळतांना जाळीचा आधार निखळला; दोन्ही चिमुकल्यासह खिडकी थेट दुसऱ्या मजल्यावरून जमिनीवर कोसळली, भिवंडीतील घटना
फ्लॅटच्या लोखंडी खिडकीवर खेळतांना जाळीचा आधार निखळला; दोन्ही चिमुकल्यासह खिडकी थेट दुसऱ्या मजल्यावरून जमिनीवर कोसळली, भिवंडीतील घटना

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Actor Sanjeeb Singh Dies Of Heart Attack: 13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Ahilyanagar Shrirampur Band : श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Embed widget