एक्स्प्लोर

Vinayak Raut : मध्यावधी निवडणुका झाल्यास शिवसेनेचे 100 आमदार निवडून येतील, विनायक राऊतांना विश्वास 

मध्यावधी निवडणुका झाल्यास शिवसेनेचे किमान 100 आमदार निवडून येतील असा विश्वास शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

Vinayak Raut : मध्यावधी निवडणुका झाल्यास शिवसेनेचे किमान 100 आमदार निवडून येतील असा विश्वास शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी व्यक्त केला. जे आमदार खरेदी विक्रीच्या बाजारात विकले गेलेत, त्यांची आम्हाला मुळीच चिंता नसल्याचा टोला देखील राऊत यांनी बंडखोरांना लगावला. बंडखोरांच्या विरोधात आणि भाजपच्या कपट कारस्थाना विरोधात आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचे ते म्हणाले. उदय सामंत किंवा दीपक केसरकर यांचा आयत्या बिळात नागोबाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश झालेला होता. त्यांच्यामुळं शिवसेना वाढलेली नाही, शिवसेनेनं त्यांना वाढवलेलं असल्याचे खासदार विनायक राऊत म्हणाले.
 
बंडखोरांना शिवसैनिक आहोत असं म्हणण्याचा अधिकार नाही
 
सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केल्यानंतर भाजपसोबत घरोबा करत सरकार स्थापन केले. त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर अनेक नेत्यांकडून मध्यावधी निवडणुका होणार असल्याची वक्तव्य केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देखील वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर शिवसेनेचे किमान 100 आमदार निवडून येतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. बंडखोर आमदारांची आम्हाला मुळीच चिंत नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, रत्नागिरीतील शिवसेनेच्या मेळाव्याला येण्याचा उदय सामंत यांना नैतिक अधिकार नाही. त्यांनी येऊही नये असे देखील खासदार राऊत म्हणाले. आम्ही शिवसैनिक आहोत असं म्हणण्याचा नैतिक अधिकार बंडखोरांना नाही. जर हिंमत असेल तर सांगा आम्ही भाजपवासी झालोय ते असा टोला देखील खासदार राऊतांनी लगावला.

हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्याव्यात : उद्धव ठाकरे

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केलं आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून काल त्यांनी शिवसेना भवनमध्ये राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे या घटनेचा अपमान असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. ते पुढे म्हणाले की, आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर चुकत असेल, तर आपल्याला जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर पालिकेकडून अखेर
Maharashtra Live Blog Updates: निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर पालिकेकडून अखेर
NCP Amol Mitkari: अमोल मिटकरींचा आमदारकीचा शेवटचा दिवस; सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर, भावूक होत म्हणाले, 'वादळं कितीही मोठी असली...'
अमोल मिटकरींचा आमदारकीचा शेवटचा दिवस; सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर, भावूक होत म्हणाले, 'वादळं कितीही मोठी असली...'
NEET Paper Leak Case : नाशिकमधील शुभम आणि पुण्यातील धनंजयने NEET चा पेपर फोडला; किती रुपयांना विकला?, धक्कादायक महिती समोर
नाशिकमधील शुभम आणि पुण्यातील धनंजयने NEET चा पेपर फोडला; किती रुपयांना विकला?, धक्कादायक महिती समोर
Sunil Tatkare Meets Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर सुनील तटकरे म्हणाले..., मला काही बोलायचं नाही!
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर तटकरे म्हणाले...

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mandana Karimi Leaves India After 16 Years: 16 वर्षांनंतर, 37 वर्षांच्या इराणी अभिनेत्रीनं सोडला भारत; म्हणाली, 'इथे घरासारखं वाटत नाही...'
16 वर्षांनंतर, 37 वर्षांच्या इराणी अभिनेत्रीनं सोडला भारत; म्हणाली, 'इथे घरासारखं वाटत नाही...'
Sunil Tatkare Meets Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर सुनील तटकरे म्हणाले..., मला काही बोलायचं नाही!
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर तटकरे म्हणाले...
Jai Gidwani Latest Photos: 'शक्ती' सिनेमातल्या करिष्मा कपूरच्या 'त्या' गोंडस मुलानं स्वतःच्या जीवावर उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य; 24 वर्षांनी आता दिसतो कसा?
24 वर्षांनी समोर आला करिश्मा कपूरचा 'तो' मुलगा; गोंडस चिमुकला आता झालाय 33 वर्षांचा हँडसम जेंटलमन PHOTOs
Nashik TCS Case Matin Patel : मोठी बातमी! निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवकाला भोवलं; मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई, नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता
मोठी बातमी! निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवकाला भोवलं; मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई, नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
Embed widget