एक्स्प्लोर

खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता इडली, पराठा , भगर सारखे चमचमीत पदार्थ मिळणार

खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता मिळणार इडली, पराठा , भगर सारखे चमचमीत पदार्थ खायला मिळणार आहेत.

Mumbai News : खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता मिळणार इडली, पराठा , भगर सारखे चमचमीत पदार्थ खायला मिळणार आहेत. राज्यातील मुलांना सकस आणि पोषक आहार देऊन त्यांच्या प्रकृतीत आणि बौद्धिक क्षमतेत सुधारणा होण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारात पौष्टिक आणि चमचमीत पदार्थ देण्यास सुरुवात केली जाणार आहे . शासनाच्या या निर्णयामुळे मुलांचा शाररिक आणि बौद्धिक विकास झपाट्याने होईलच शिवाय ग्रामीण भागातील मुलांचा शाळेकडे ओढा वाढण्यास देखील मदत होणार आहे. 

 राज्यात माध्यान्ह भोजन हे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिले जाते. मात्र शाळेत गेल्या वर्षानुवर्षे मिळणाऱ्या माध्यान्ह भोजनात फक्त खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आत खिचडीसोबतच इडली-सांबार, भगर, थालीपीठ, नाचणीचे सत्व आणि पराठाही मिळणार आहे. तशी शिफारस राज्य सरकारने नेमलेल्या समितीने केली असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्याचे स्वागत केले आहे.
केंद्र सरकारने स्थानिक उपलब्ध होणारे अन्नपदार्थ व तृणधान्य यांचा समावेश या आहारात करावा, असे सुचविले होते. या पार्श्वभूमीवर, आरोग्य, आहार आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती शालेय शिक्षण विभागाने नेमली होती. आता या निर्णयाचा बच्चे कंपनी बरोबर शिक्षक, माध्यान्ह भोजन बनवणाऱ्या व्यक्ती आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांकडून जोरात स्वागत करण्यात आले आहे .

या समितीने शिफारसी देताना सोयाबीन तेलाऐवजी सूर्यफुल तेलाचा वापर करावा.  आठवडाभर एकच खाद्यवस्तू देण्याऐवजी दर दोन दिवसांनी आहार बदलावा. या आहारात  उडीद-तांदळाची इडली, रवा इडली, केशरी रवा इडली असे विविध प्रकार असावेत. शिवाय मल्टिग्रेन पराठ्यामध्ये चार प्रकारचे धान्य असावे सोबत पुदिना चटणी द्यावी असे बदल सुचविताना माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या व्यक्ती, संस्थांच्या मानधनात वाढ करावी, असेही समितीने सुचविले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत लाखोंच्या संख्येने गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत असतात . अशा मुलांना आहारात हवे तेवढे प्रोटीन व इतर घटक परिस्थितीमुळे नियमित मिळत नसल्याने या निर्णयाचा खरा फायदा या लाखो गोरगरीब लहान मुलांना होणार

 या मुलांना द्यायचे खाद्यपदार्थ कसे बनवायचे याचे व्हिडीओ समितीचे एक सदस्य आणि शेफ विष्णू मनोहर स्वत: तयार करणार आहेत. ते सर्व शाळांकडे पाठवून त्यानुसार खाद्यान्य तयार केले जातील. या शालेय पोषण आहारात बेदाणे देण्याबाबत देखील निर्णय झाल्याने याचा फायदा हजारो बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे . सध्या द्राक्षाला भाव नसल्याने बहुतांश शेतकऱ्याने बेदाणे प्रक्रिया उद्योग सुरु केला मात्र बेदाण्यालाही भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले होते . शासनाने आता पोषण आहारात बेदाणा देखील देण्याबाबत निर्णय घेतल्याने या बेदाणा निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळू शकणार असल्याचे बेदाणा उत्पादक प्रश्न देशमुख यांनी सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या

Shasan Aplya Dari : दोन आठवड्यांपासून 'शासन आपल्या दारी'चा मांडव घातलाय, दोन तारखा बदलल्या, नेमका खर्च कोण करतंय? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshwardhan Patil : जनतेतून जो आवाज उठतो त्यासोबत राहणं महत्त्वाचं, पक्ष प्रवेशापूर्वी हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याचं कारण सांगितलं
कार्यकर्ते अस्वस्थ झाले, लोकांनी उठाव केला अन् निर्णय झाला, हर्षवर्धन पाटील यांचं पक्षप्रवेशापूर्वी कारण सांगितलं
Pune Crime: सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
Nitin Gadkari: 'मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन'; नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली होती धमकी
'मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन'; नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली होती धमकी
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 7 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMahavikas Aaghadi Meeting  : आजपासून पुन्हा महाविकास आघाडीच्या जागावाटपावर मॅरेथॉन बैठकाABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 8 AM 07 October 2024Raosaheb Danve VS Arjun Khotkar : आज आम्ही सुपात उद्या तुम्ही जात्यात याल, दानवेंना खोतकरांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshwardhan Patil : जनतेतून जो आवाज उठतो त्यासोबत राहणं महत्त्वाचं, पक्ष प्रवेशापूर्वी हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याचं कारण सांगितलं
कार्यकर्ते अस्वस्थ झाले, लोकांनी उठाव केला अन् निर्णय झाला, हर्षवर्धन पाटील यांचं पक्षप्रवेशापूर्वी कारण सांगितलं
Pune Crime: सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
Nitin Gadkari: 'मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन'; नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली होती धमकी
'मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन'; नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली होती धमकी
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
Uddhav Thackeray : इनकमिंग सुरु झालं पण उद्धव ठाकरेंनी अटी सांगितल्या, शिंदेंची साथ देणाऱ्या आमदारांना नो एंट्री, 'या' नेत्यांसाठी दारं खुली
आमदारांना नो एंट्री, पण या नेत्यांना परत घेणार, उद्धव ठाकरेंनी दीपेश म्हात्रेंच्या प्रवेशावेळी निकष सांगितले
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Mhada Lottery 2024 : म्हाडाची 2030 घरांची सोडत काही तासांवर, मुंबईतील घराचं स्वप्न पाहणारांची धाकधुक वाढली, थेट प्रक्षेपण कुठं पाहता येणार?
म्हाडाची 2030 घरांची सोडत काही तासांवर, मुंबईत सोहळ्याचं आयोजन, थेट प्रक्षेपण कुठं पाहणार?
Nashik Accident: कसारा घाटात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, कारचा चुराडा, पत्रा कापून जखमींना बाहेर काढलं
नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरचा ब्रेक फेल, कारचा पार चुराडा
Embed widget