एक्स्प्लोर

बीडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचे हाल, जमिनीवर बसून परीक्षा देण्याची वेळ

बीड तालुक्यातील रायमोहा येथे अतुल कला व वाणिज्य महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रावर बारावीच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून परिक्षा देण्याची वेळ आली आहे. या प्रकारानंतर शिक्षणविभागाच्या कारभारावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

बीड : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेच्या पहिल्य़ाच दिवशी इंग्रजीच्या पेपरला शिक्षण विभागाचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर आला आहे. बीड तालुक्यातील रायमोहा येथे अतुल कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर फरशी नसलेल्या जागेवर बसून परीक्षा द्यावी लागली. बारावीसाठीच्या अतुल कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर इतर भौतिक सुविधा देखील नाही आहेत. या परीक्षाकेंद्रावर काही विद्यार्थ्यांना चक्क जिल्हा परिषद शाळेतील डेस्क बसण्यासाठी देण्यात आले होते. या प्रकारानंतर शिक्षणविभागाच्या कारभारावर सर्व स्तरातून टीका होतं आहे. दरम्यान, राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून (18 फेब्रुवारी) सुरु होत आहे. राज्यातील एकूण 3036 परीक्षा केंद्रांवर 18 फेब्रुवारी ते 18 मार्च असा एक महिना बारावीची परीक्षा होणार आहे. राज्यभरातून 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736 विद्यार्थी, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 784 विद्यार्थी तर व्यावसायिक अभ्यासक्रमचे 57 हजार 373 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यावर्षीच्या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदललेला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मंडळाने हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहेत. शिवाय दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय मंडळामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यात कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी 273 भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत. परीक्षा काळात गैरप्रकार टाळण्यासाठी ही भरारी पथकं काम करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात समित्या नेमण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षेला अर्धा तास आधी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं गरजेचे आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात सकाळी साडे दहाच्या आत आणि दुपारच्या सत्रात दुपारी अडीचच्या आत विद्यार्थ्यांनी केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे. शिवाय परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅल्क्युलेटर नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना मोबाईलमधील किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी बारावी परीक्षेच्या काही महत्त्वाच्या पेपरमध्ये एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: जयंत पाटलांची गुगली! मोदींच्या आवाहनावरून मुख्यमंत्र्यांनाच घेरलं, म्हणाले, पंतप्रधानांचा आदेश मानून गाड्यांची संख्या कमी करा, फक्त एक गाडी अन् एक अंगरक्षक...
जयंत पाटलांची गुगली! मोदींच्या आवाहनावरून मुख्यमंत्र्यांनाच घेरलं, म्हणाले, पंतप्रधानांचा आदेश मानून गाड्यांची संख्या कमी करा, फक्त एक गाडी अन् एक अंगरक्षक...
Monsoon Update : आनंदाची बातमी; अंदमानात 'मान्सून'साठी पोषक वातावरण; लवकरच पावसाची एन्ट्री होण्याची शक्यता, तापमानातही बदल
आनंदाची बातमी; अंदमानात 'मान्सून'साठी पोषक वातावरण; लवकरच पावसाची एन्ट्री होण्याची शक्यता, तापमानातही बदल
Pune Nasrapur Crime: अत्याचार करताना 4 ते 5 मुलांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने समोर दगड भिरकावला; नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा, नेमकं काय घडलं?
अत्याचार करताना 4 ते 5 मुलांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने समोर दगड भिरकावला; नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा, नेमकं काय घडलं?
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
Embed widget