एक्स्प्लोर

मॉल ते सिनेमा हॉल पुन्हा निर्बंध लागणार का, राजेश टोपे म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. निर्बंधाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे टोपे म्हणाले.

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. जर नागरिकांनी काळजी घेतली नाही तर परिणाम भोगावे लागतील असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. रुग्ण वाढणे हा काळजीचा विषय असून, निर्बंधाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी जर काळजी घेतली नाही तर पुन्हा निर्बंध आणावे लागतील असेही ते म्हणाले.

लसीकरणाचा वेग कमी
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात 2 हजारांच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. मुंबईत दररोज 51 हजार कोरोना चाचण्या केल्या  जात आहेत. यामध्ये पॉझिटीव्ह रेट हा 4 टक्के आहे, ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. दिल्लीत बऱ्यापैकी निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यात सध्या 11 हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आहेत. तर 167 हे ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत, त्यातील 97 रुग्ण हे बरे झाले आहेत. त्यामुळे निर्बंध लावण्याची शक्यता पडू शकते असे टोपे म्हणाले. लसीकरण जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. दिवसाला 8 लाखांच्या आसपास लसीकरण होत होते, मात्र, सध्या हे लसीकरण दिवसाला 5 लाखांवर आले आहे. लसीकरणाचा कमी झालेला वेग वाढवावा लागेल. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे टोपे यांनी सांगितले.  आता सर्वांनीच लसीकरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभाग तर काम करतच आहे. मात्र, स्थानिक नेते, प्रशासन आणि एनजीओ यांनी हातात हात घालून काम करावे असे आवाहन टोपे यांनी केले आहे.

राज्यात आत्तापर्यंत 13 कोटी 31 लाख 90 हजार लसीकरणाचे डोस दिले आहेत. राज्यातील 87 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. म्हणजे जवळपास 8 कोटी लोकांनी पहिला लसीचा डोस घेतला आहे. अद्याप 1 कोटी लोकांना लसीकरण बाकी असल्याचे टोपे म्हणाले. तर 57 टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे साडेपाच कोटी लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

विद्यार्थ्यांना लस देण्यास राज्य सरकार सज्ज
3 जानेवारीपासून केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार देखील यासाठी सज्ज असल्याचे टोपे यांनी सांगितले. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे सर्व नियोजन सुरू आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाऊनच लस देण्यासाठीचे नियोजन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे टोपे यांनी सांगितले. बुस्टर डोसच्या बाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही. नेमकी कोणती लस घ्यायची हे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले नसल्याटे टोपे यावेळी म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
Single Window Clearance : राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget