एक्स्प्लोर

मॉल ते सिनेमा हॉल पुन्हा निर्बंध लागणार का, राजेश टोपे म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. निर्बंधाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे टोपे म्हणाले.

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. जर नागरिकांनी काळजी घेतली नाही तर परिणाम भोगावे लागतील असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. रुग्ण वाढणे हा काळजीचा विषय असून, निर्बंधाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी जर काळजी घेतली नाही तर पुन्हा निर्बंध आणावे लागतील असेही ते म्हणाले.

लसीकरणाचा वेग कमी
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात 2 हजारांच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. मुंबईत दररोज 51 हजार कोरोना चाचण्या केल्या  जात आहेत. यामध्ये पॉझिटीव्ह रेट हा 4 टक्के आहे, ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. दिल्लीत बऱ्यापैकी निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यात सध्या 11 हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आहेत. तर 167 हे ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत, त्यातील 97 रुग्ण हे बरे झाले आहेत. त्यामुळे निर्बंध लावण्याची शक्यता पडू शकते असे टोपे म्हणाले. लसीकरण जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. दिवसाला 8 लाखांच्या आसपास लसीकरण होत होते, मात्र, सध्या हे लसीकरण दिवसाला 5 लाखांवर आले आहे. लसीकरणाचा कमी झालेला वेग वाढवावा लागेल. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे टोपे यांनी सांगितले.  आता सर्वांनीच लसीकरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभाग तर काम करतच आहे. मात्र, स्थानिक नेते, प्रशासन आणि एनजीओ यांनी हातात हात घालून काम करावे असे आवाहन टोपे यांनी केले आहे.

राज्यात आत्तापर्यंत 13 कोटी 31 लाख 90 हजार लसीकरणाचे डोस दिले आहेत. राज्यातील 87 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. म्हणजे जवळपास 8 कोटी लोकांनी पहिला लसीचा डोस घेतला आहे. अद्याप 1 कोटी लोकांना लसीकरण बाकी असल्याचे टोपे म्हणाले. तर 57 टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे साडेपाच कोटी लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

विद्यार्थ्यांना लस देण्यास राज्य सरकार सज्ज
3 जानेवारीपासून केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार देखील यासाठी सज्ज असल्याचे टोपे यांनी सांगितले. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे सर्व नियोजन सुरू आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाऊनच लस देण्यासाठीचे नियोजन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे टोपे यांनी सांगितले. बुस्टर डोसच्या बाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही. नेमकी कोणती लस घ्यायची हे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले नसल्याटे टोपे यावेळी म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget