एक्स्प्लोर

मॉल ते सिनेमा हॉल पुन्हा निर्बंध लागणार का, राजेश टोपे म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. निर्बंधाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे टोपे म्हणाले.

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. जर नागरिकांनी काळजी घेतली नाही तर परिणाम भोगावे लागतील असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. रुग्ण वाढणे हा काळजीचा विषय असून, निर्बंधाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी जर काळजी घेतली नाही तर पुन्हा निर्बंध आणावे लागतील असेही ते म्हणाले.

लसीकरणाचा वेग कमी
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात 2 हजारांच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. मुंबईत दररोज 51 हजार कोरोना चाचण्या केल्या  जात आहेत. यामध्ये पॉझिटीव्ह रेट हा 4 टक्के आहे, ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. दिल्लीत बऱ्यापैकी निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यात सध्या 11 हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आहेत. तर 167 हे ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत, त्यातील 97 रुग्ण हे बरे झाले आहेत. त्यामुळे निर्बंध लावण्याची शक्यता पडू शकते असे टोपे म्हणाले. लसीकरण जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. दिवसाला 8 लाखांच्या आसपास लसीकरण होत होते, मात्र, सध्या हे लसीकरण दिवसाला 5 लाखांवर आले आहे. लसीकरणाचा कमी झालेला वेग वाढवावा लागेल. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे टोपे यांनी सांगितले.  आता सर्वांनीच लसीकरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभाग तर काम करतच आहे. मात्र, स्थानिक नेते, प्रशासन आणि एनजीओ यांनी हातात हात घालून काम करावे असे आवाहन टोपे यांनी केले आहे.

राज्यात आत्तापर्यंत 13 कोटी 31 लाख 90 हजार लसीकरणाचे डोस दिले आहेत. राज्यातील 87 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. म्हणजे जवळपास 8 कोटी लोकांनी पहिला लसीचा डोस घेतला आहे. अद्याप 1 कोटी लोकांना लसीकरण बाकी असल्याचे टोपे म्हणाले. तर 57 टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे साडेपाच कोटी लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

विद्यार्थ्यांना लस देण्यास राज्य सरकार सज्ज
3 जानेवारीपासून केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार देखील यासाठी सज्ज असल्याचे टोपे यांनी सांगितले. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे सर्व नियोजन सुरू आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाऊनच लस देण्यासाठीचे नियोजन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे टोपे यांनी सांगितले. बुस्टर डोसच्या बाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही. नेमकी कोणती लस घ्यायची हे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले नसल्याटे टोपे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget