एक्स्प्लोर

Hari Narke : तुमच्यात धमक असेल तर...; प्रा. हरी नरकेंच्या मृत्यूनंतर ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रमिती नरकेचं सनसणीत उत्तर

Hari Narke Death : प्रा. हरी नरके यांच्यावर टीका करण्यासाठी काहीतरी वैचारिक वारसा लागतो, तशी वैचारिक धमक असेल तर त्यांच्यावर टीका करा असं उत्तर अभिनेत्री प्रमिती नरके यांनी दिलं आहे. 

मुंबई : प्रा. हरी नरके (Hari Narke) यांचं बुधवारी 9 ऑगस्टला निधन झालं आणि त्यानंतर सोशल मीडियात विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी आनंद व्यक्त करणाऱ्या पोस्ट लिहिल्या. याला आता प्रा. हरी नरके यांची मुलगी अभिनेत्री प्रमिती नरकेने सणसणीत उत्तर दिलं आहे. आयुष्यभर त्या व्यक्तीने फक्त स्वतःच्या विचारांनी तुमच्या विचारांचं खंडन केलं. आज तुमच्यात धमक असेल तर तुमच्या विचारांनी त्यांचं खंडन करा. ती धमक मिळवलीत तर टीका करा असं त्या म्हणाल्या. मुंबईत भुजबळ नॉलेज सिटी येथे आयोजीत शोक सभेवेळी प्रमिती शिंदे बोलतं होती. यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, मंत्री छगन भुजबळ, राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

प्रमिती नरके म्हणाल्या की, "प्रा. हरी नरके यांच्यावर टीका तर करूच शकत नाहीत, कारण ती करण्यासाठी काहीतरी वैचारिक वारसा लागतो. लहानपणापासून त्याने मला बाबा म्हणायची सवय लावली. अहो जाओ नाही. बाबा नोकरी करत असताना दौरे करायचा, कार्यक्रम करायचा आणि मला तो जवळजवळ चार महिन्यांनी भेटायचा. मला त्याने वाचनाची सवय लावली, जी त्याला होतीच. ती त्याने माझ्यातही रुजवली."

प्रा. हरी नरके यांच्या आठवणींबद्दल सांगताना प्रमिती नरके पुढे म्हणाल्या की, "तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला. मला जे करायचंय ते करू दिलं. मी ललित कला केंद्रात प्रवेश घेतला तेव्हा आरक्षण वापरायचं नाही अशी सक्त ताकीद त्याने दिली होती. मी ते न वापरता प्रवेश मिळवला. मी अभिनयात करिअर करायचं असं सांगितल्यावर तो घाबरला होता, पण त्याने मला कधीच काही जाणवू दिलं नाही."

राज्याचे मंत्री छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा.हरी नरके यांच्या निधनाने माझा वैचारिक आधारस्तंभ हरपला आहे. हरी तुला आम्ही तुला मरू देणार नाही, तू सुरु केलेलं काम आम्ही नेटाने पुढे नेऊ. 

मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी प्रा.हरी नरके यांची सर्व ग्रंथ संपदा सुमारे 25 हजारांहून अधिक संपदा एकत्र करून वांद्रे येथील एमईटी भुजबळ नॉलेज सिटी येथे प्रा. हरी नरके यांच्या नावाने ग्रंथालय स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच दरवर्षी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या इतिहास संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना, शोध पत्रकारिता, गरीब विद्यार्थी, फुले, शाहू व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काम करणाऱ्या समाजसुधारक आणि मागासवर्गीयांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ता यांच्यासाठी एकत्रितपणे हरी नरके यांच्या नावाने 5 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल अशी घोषणा केली. 

यावेळी बोलताना एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर म्हणाले की, "गेली 35 वर्ष आमची मैत्री होती. पत्रकारितेत मला महात्मा फुले यांच्या बातमीने प्रसिद्धी दिली, त्यामागे प्रा.हरी नरके याचं संशोधन होत. संशोधन क्षेत्रात त्यांनी अतिशय कष्ट करून अनेक संशोधने, सत्य त्यांनी समाजापर्यंत पोहचविले. आपल्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. समाजाला आणि देशाला वेगळी दिशा देण्याचे काम त्यांनी केल. प्रा. हरी नरके यांच्या निधनाने समाजाची महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे."

ही बातमी वाचा: 

 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
Embed widget