एक्स्प्लोर

Guru Purnima 2020 | शिर्डी, शेगाव, अक्कलकोटसह अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये भक्तांविना गुरुपौर्णिमा उत्सव

राज्यातील महत्वाच्या मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शिर्डी, शेगाव, अक्कलकोटला दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. यंदा मात्र ही सर्व मंदिरं सुनीसुनी आहे. भक्तांविना गुरुपौर्णिमा सर्वत्र साजरी होत आहे.

मुंबई : आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. परंपरेप्रमाणे या दिवशी आपल्या गुरूंची पुजा केली जाते. गुरुपौर्णिमा मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केली जाते. राज्यातील महत्वाच्या मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शिर्डी, शेगाव, अक्कलकोटला दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. यंदा मात्र ही सर्व मंदिरं सुनीसुनी आहे. भक्तांविना गुरुपौर्णिमा सर्वत्र साजरी होत आहे. अक्कलकोट येथे स्वामी भक्तांविना गुरुपौर्णिमा राज्यभर कोरोनाचे संकट वाढत असल्याने दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा गुरुपौर्णिमेच्या सोहळा मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा होतोय. स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन ऊर्जा मिळवण्यासाठी गुरुपौर्णिमेला देशभरातून लाखो भाविक वटवृक्ष मंदिरात येत असतात. मात्र कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर 17 मार्चपासून मंदिर बंदच आहे. मंदिरातील उपचार आणि परंपरा नियमितपणे साजरे होत असले तरी आज गुरुपौर्णिमेला भक्ताविना मोकळे मंदिर पहायची वेळ कोरोनाचे आणली आहे. अक्कलकोटमध्ये 59 कोरोनाचे रुग्ण असल्याने शहरातील अनेक भागात कंटेन्मेंट झोन बनवले आहेत. त्यामुळेच यंदा घरीच गुरुपौर्णिमा करण्याचे प्रशासनाचे आवाहन स्वामी भक्तांनी ऐकले आहे. शिर्डी साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला दरवर्षी शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र कोरोनाच्या सावटामुळे शिर्डी साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला. साई संस्थानच्या इतिहासात प्रथमच भक्तांविना हा उत्सव साजरा झाला. 4 जुलै ते 6 जुलै असा तीन दिवस हा उत्सव साजरा होतोय. या काळात केवळ धार्मिक विधी या दरम्यान पार पडणार आहेत. रथ यात्रा तसेच पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. पायी पालख्या घेऊन येणाऱ्या भाविकांना देखील पालख्या न आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा बघता अगोदर नोंदणी करून रक्तदान करावे, तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावा असं आवाहन देखील साई संस्थानने केलं आहे. शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरात शुकशुकाट विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलडाण्याच्या शेगाव इथं गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी भाविकांची मोठी मांदियाळी जमते. गजानन महाराजांना गुरू मानत भाविक दर्शनाकरता शेगावी असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गजानन महाराज मंदिर बंद आहे. पहिल्यांदाच शेगाव इथं गुरुपौर्णिमाला गजानन महाराज मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. गुरुपौर्णिमेला मंदिर परिसर गर्दीने फुललेला असतो मात्र आज रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळतोय. सिंधुदुर्गातील कविलगावात गुरुपौर्णिमा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी भारतातील पहिले साई मंदिर अशी ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कविलगावात आज गुरुपौर्णिमा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी केली जात आहे. कोरोनाच्या सावटामुळे कविलगावातील साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. साईबाबांना गुरू स्वरूप मानून साई भक्त या साई मंदिरात दर्शनाला हजेरी लावत असतात. मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने घरी राहूनच त्यांना आपल्या गुरूला वंदन करावे लागणार आहे. साईबाबांच्या भक्तांसाठी गुरुपोर्णिमा उत्सवाला मोठे महत्व आहे. अख्यायिका अशी आहे की, कुडाळ तालुक्यातील कविलगाव येथील रामचंद्र माडये हे श्री दत्तमहाराजांचे असीम भक्त होते. त्यांच्या कठोर भक्तीचे फलस्वरुप त्यांच्या स्वप्नात प्रत्यक्ष दत्तमहाराजांनी साक्षात्कार घडवून तू शिर्डीला ये असे सांगितले. त्याप्रमाणे शिर्डी येथे गेलेले माडये यांना साई बाबांची भेट घडली. तेव्हाच त्यांना साईस्वरुपात दत्तांचे प्रत्यक्ष दर्शन घडले. शिर्डीहून परतताना बाबांनी त्यांच्या हातावर एक रुपयाचे नाणे ठेवले व तू आता जा मी तेथेच येत आहे असा संदेश दिला. त्याप्रमाणे कविलगावात आल्यानंतर काही वर्षातच म्हणजे सन 1918 साली शिर्डी येथे बाबांनी आपला पवित्र देह ठेवला. आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी म्हणजे सन 1919 साली कविलगावात बाबांच्या अद्भुत भक्ती प्रेरणेने प्रेरीत झालेल्या माडये यांनी बाबांचा पहिला पुण्यतिथी उत्सव साजरा केला. विशेष म्हणजे या उत्सवा करीता साईबाबांनी दिलेल्या एक रुपया उत्सवाच्या संपूर्ण खर्चाकरीता वापरण्यात आला. जालना : समर्थ रामदासांच्या जन्मगावी विशेष अनुष्ठान समर्थ रामदासांचे जन्मस्थान असलेल्या जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथे दरवर्षी गुरू पोर्णिमेनिमित्त दर्शनासाठी मोठी गर्दी असते. पण यावेळी कोरोनामुळे भाविकांसाठी दर्शन पूर्णतः बंद ठेवण्यात आलंय. दरम्यान आज गुरुपौर्णिमा निमित्त सकाळी 7 वाजता आरती आणि गुरुपौर्णिमा विशेष उपासना करन्यात आली. यावेळी विशेष अनुष्ठान करून हे मंदिर बंद करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget