एक्स्प्लोर

शासनाचे गोंडवाना विद्यापीठाकडे दुर्लक्ष; नियुक्ती प्रक्रिया घेतल्यानंतरही कुलगुरूंची निवड रखडलेलीच

शासनाचे गोंडवाना विद्यापीठाकडे दुर्लक्ष होत आहे. कारण नियुक्ती प्रक्रिया घेतल्यानंतरही विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड रखडलेलीच आहे. दिल्ली आयआयटी येथील प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची कुलगुरू म्हणून राज्यपाल कार्यालयाकडून नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांनी कुठलेही कारण न देता रुजू होण्यास नकार दिल्याने प्रशासनावर पुन्हा निवड प्रक्रिया राबविण्याची नामुष्की ओढवली.

गडचिरोली : राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत उच्च शिक्षणाची गंगा नेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा समावेश यात करण्यात आला. मात्र, प्रशासकीय उदासीनतेमुळे विद्यापीठाला दहा महिन्यांपासून पूर्णवेळ कुलगुरू मिळालेले नाही. चार महिन्यांपूर्वी कुलगुरू निवडिकरिता प्रक्रिया घेण्यात आली आणि दिल्ली आयआयटी येथील प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची कुलगुरू म्हणून राज्यपाल कार्यालयाकडून नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांनी कुठलेही कारण न देता रुजू होण्यास नकार दिल्याने प्रशासनावर पुन्हा निवड प्रक्रिया राबविण्याची नामुष्की ओढवली. तसे पत्र राज्यपाल कार्यालयाकडून विद्यापीठाला प्राप्त झाले. या प्रक्रियेवर विद्यापीठाचे 34 लाख रुपये खर्च झाले. निवड करण्यात आलेल्या कुलगुरूंना रुजुच व्हायचे नव्हते तर मग त्यांची नियुक्ती का करण्यात आली? हा प्रश्न विद्यार्थी संघटनांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे.
 
पदभरती रखडली

पूर्णवेळ कुलगुरू नसल्याने विद्यापीठातील रिक्त प्राध्यापक आणि कर्मचारी यांची पदभरती रखडलेली आहे. सध्या कुलगुरूंचा प्रभार संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्याकडे आहे. दरम्यानच्या काळात विद्यापीठाने सहायक प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात काढली होती. परंतु ती प्रक्रिया सुध्दा खोळंबली आहे. सोबतच जनसंपर्क अधिकारी पदाची भरती सुध्दा झालेली नाही. मान्यता असताना सुद्धा प्रशासकीय उदासीनतेमुळे पदभरती खोळंबली आहे. 

मागास भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी

दुर्गम आणि मागास भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे हे उद्देश्य समोर ठेऊन गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. मात्र, अनेक विभागात पूर्णवेळ प्राध्यापक नसल्यामुळे शैक्षणिक कार्याचा खेळ खंडोबा झाला आहे. विद्यापीठासारखी संस्था मागास गडचिरोली जिल्ह्यात असताना सुध्दा येथील लोकप्रतिनिधी येथील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

कुलगुरू नियुक्ती प्रक्रियेचा खर्च शर्मा यांच्याकडून वसूल करा

कुलगुरू पदाकरीता अर्ज करताना डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांना सर्व प्रक्रियेची कल्पना होती. निवडीच्यावेळेस त्यांचे सुध्दा मत घेण्यात आले होते. तरीसुद्धा कुठलेही कारण न देता शर्मा यांनी रुजू होण्यास नकार दिला. नवे विद्यापीठ त्यात निधीची चणचण असताना विद्यापीठावर 34 लाखांचा भुर्दंड बसला. इतकेच नव्हे तर शर्मा यांनी विद्यापीठ प्रशासनासोबत या बाबत संपर्क करणेही योग्य समजले नाही. त्यामुळे हा खर्च शर्मा यांच्याकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी संघटनानी केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
Share Market:भारती एअरटेल आणि रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल,बजाज फायनान्स अन् एलआयसीचं नुकसान, 5 दिवसात काय घडलं?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, बजाज फायनान्स अन् एलआयसीला जोरदार फटका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Pimpri Chinchwad Election : नगरसेवक व्हायचंय, मतदारांना 50 टक्क्यांत वस्तूंचं आमिष, धक्कादायक प्रकार
Raj Thackeray on BMC Election : मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिवतीर्थावर आज मनसेची बैठक
Chandrahar Patil Majha Katta LIVE : देशभर गाजलेली Bailgada Sharyat , जिंकलेले मालक माझा कट्टावर
Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
Share Market:भारती एअरटेल आणि रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल,बजाज फायनान्स अन् एलआयसीचं नुकसान, 5 दिवसात काय घडलं?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, बजाज फायनान्स अन् एलआयसीला जोरदार फटका
Uddhav Thackeray on BMC Election: मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय; उद्धव ठाकरेंची फक्त तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय; उद्धव ठाकरेंची फक्त तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
Bihar Election Result 2025: 'जागतिक बँकेचा पैसा महिलांमध्ये वाटला', बिहार निवडणुकीनंतर प्रशांत किशोरांच्या जन सूरजचा एनडीएवर गंभीर आरोप
'जागतिक बँकेचा पैसा महिलांमध्ये वाटला', बिहार निवडणुकीनंतर प्रशांत किशोरांच्या जन सूरजचा एनडीएवर गंभीर आरोप
निवडणुकीत पैसा खर्च करावाच लागतो, लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं आहे त्यांनाच देतात, समजने वालों को इशारा काफी है! प्रफुल पटेलांचा रोख कोणाकडे?
निवडणुकीत पैसा खर्च करावाच लागतो, लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं आहे त्यांनाच देतात, समजने वालों को इशारा काफी है! प्रफुल पटेलांचा रोख कोणाकडे?
आता आणखी एका देशाची तरुणाई सरकारविरोधात रस्त्यावर; राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाची संरक्षक भिंत उखडून फेकली; दगड, हातोडा, साखळदंड, काठ्यांनी पोलिसांवर 'प्रहार'
आता आणखी एका देशाची तरुणाई सरकारविरोधात रस्त्यावर; राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाची संरक्षक भिंत उखडून फेकली; दगड, हातोडा, साखळदंड, काठ्यांनी पोलिसांवर 'प्रहार'
Embed widget