एक्स्प्लोर
Advertisement
कपडे धुताना पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील चौघींचा मृत्यू
लातूर : कपडे धुवायला गेले असताना पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लातूरच्या उदगीर तालुक्यातल्या हाकनाकवाडी परिसरात ही घटना घडली.
नवरात्रीच्या निमित्ताने डोंगरशेलकी रस्त्यावरच्या खणीत कपडे धुवायला चौघी जणी गेल्या होत्या. त्यावेळी 5 वर्षांची अनुसया मोहन करलेवाड, 27 वर्षीय राधिका मोहन करलेवाड, 16 वर्षीय गवलण बलिराम करलेवाड आणि 18 वर्षीय अश्विनी बलिराम करलेवाड यांचा मृत्यू झाला.
अनुसया आणि राधिका या मायलेकी असून गवलण आणि अश्विनी या बहिणी होत्या. एकाच कुटुंबातील चार महिलांच्या अपघाती मृत्यूमुळे करलेवाड कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion