एक्स्प्लोर

Latur : अखेर 45 दिवसांनंतर लातूरला स्वच्छ पाणीपुरवठा सुरू, नागरिकांतून समाधान व्यक्त

गेल्या काही दिवसांपासून लातूरकरांना पिवळसर पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. 

लातूर: ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यामध्ये पिवळसर पाणी पिण्याची वेळ आलेल्या लातूरकरांना अखेर स्वच्छ पाणी पुरवठा सुरू झाला आहे. शहरात मागील 45 दिवसांपासून पिवळसर पाणी पुरवठा होत होता. यामुळे सर्वसामान्य लातूरकरांना याचा त्रास सहन करावा लागत होता. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने अनेक दिवसांच्या प्रयासानंतर पाण्यातील पिवळसर रंग नाहीसा करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आता शहराला स्वच्छ पाणी पुरवठा केला जात आहे. 

लातूर शहराला मागील 45 दिवसापासून पिवळसर रंगाचा दूषित पाणी पुरवठा केला जात होता. यामुळे लातूरकर मोठ्या प्रमाणावर संतप्त झाले होते. वेगवेगळे पक्ष, संघटना यांनी यावर आंदोलनंही केली. मात्र मनपाला पाण्यातील पिवळसर रंग काढून टाकण्यात यश आलं नव्हतं. पाणी तपासणी करण्यात आल्यानंतर मनपा प्रशासनाने ते पाणी पिण्यालायक आहे अशी खात्री दिल्यानंतरही लातूरकर त्यावर समाधानी नव्हते. आता जलशुद्धीकरण प्रकल्पाची डागडुजी करण्यात आली आहे. मांजरा धरणातील पाणी पुरवठा केंद्रातील जॅकवेलवरील दारे उघडण्यात आली. त्यानंतर पाणी स्वच्छ स्वरूपात आले आणि मनपाच्या प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. 

लातूर मनपाची मुदत या महिन्यात संपणार आहे. काही महिन्यात मनपाच्या निवडणुका लागणार आहेत. अशा पार्श्वभूमीवर शहरात येणारे पिवळे पाणी सत्ताधारी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरले होते. शहरातील विविध भागात रोज पाणी पुरवठा केला जातो. प्रत्येक भागात 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मागील पाच वेळेस पाणी अशुद्ध आणि पिवळसर आले आहे. मात्र रविवारी पहिल्यांदा प्रयोगिक तत्वावर पाणी सोडून पाहिले असता ते स्वच्छ असल्याचं दिसून आलं. आजपासून शहरात नियमित स्वच्छ पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामुळे लातूरकरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

पाणी पिवळे येत होते, यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. आज 17 दिवसानंतर इंडिया नगर, शाम नगर, पंचशील चौक भागात, केशव नगर जाफर नगर, सुळ गल्ली भागात स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Harshwardhan Sapkal : मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, तर सुरक्षा कवच म्हणून युवासेनाही मैदानात
मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, तर सुरक्षा कवच म्हणून युवासेनाही मैदानात
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
Sonam Wangchuk on Pradhan Resignation :
"तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Fast Track Court for NEET: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
नीट पेपरफुटीप्रकरणी पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; फास्ट ट्रॅक कोर्टाचे विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
Palghar Rain News: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
Embed widget