एक्स्प्लोर

दिवाळी, पेरणी की देणेदारी.. सोयाबीन दरात घसरण झाल्याने सणासुदीच्या तोंडावर शेतकरी चिंतेत

सोयाबीन दरात घसरण झाल्याने सणासुदीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिवाळी, पेरणी की देणेदारी द्यावी, अशा विवंचनेत तो सापडला आहे.

लातूर : दसऱ्यानंतर शेतमालाची बाजारपेठेत आवक सुरू होते. दिवाळीत बाजारपेठेत प्रचंड जोश असतो. मात्र, यावर्षी सोयाबीनच्या दरात सतत होणाऱ्या घसरणीमुळे आवक मंदावली आहे. दिवाळीचा खर्च असेल किंवा पुढील पेरणीचा खर्च या विवंचनेत आता बळीराजा आहे.

देशात सोयाबीन उत्पादन करण्यात महाराष्ट्र एक नंबरचे राज्य आहे. राज्यातील जवळपास 28 जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. मराठवाड्यात लातूर सारख्या जिल्ह्यात सोयाबीनचा विक्रमी पेरा होत असतो. यावर्षी पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यातच मागील काही दिवसात सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत आहे. गत हंगामाच्या शेवटाला सोयाबीनचे दर हे 11 हजाराच्या घरात गेले होते. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सोयाबीनची आवक सुरू झाली आणि भावात घसरण सुरू झाली. अवघ्या काही दिवसात 10 हजारी पार झालेले सोयाबीन 7 हजारांवर आला होता. सोयाबीनची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि भावात घसरण वाढत गेली. आज भाव 4800 ते 5200 च्या घरात आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी हातात नकदी पैसे पडतील अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्याला ह्या घसरणीचा फटका बसला आहे.

लातूर बाजारात मराठवाडा, तेलंगाणा आणि कर्नाटकच्या भागातूनही शेतमाल येत असतो. येथील बाजारात कायमच चढा भाव आणि शेतमालाचा काटा झाला की तात्काळ पैसे देण्याची प्रथा आहे. यामुळे कर्नाटकातील शेतकरी अमृतराव येथे आले. मात्र, गुलबर्गा येथील भाव आणि लातूरच्या भावात एव्हढा फरक नसल्यामुळे त्याच्या हाती निराशा आली आहे. जी अवस्था लातूरच्या बाजारपेठेची तीच अवस्था उस्मानाबाद येथील बाजारपेठेत आहे. शेतकरी सोयाबीन घेऊन आला खरा मात्र भावातील घसरणीमुळे त्याच्या पदरी निराशा पडली आहे.  

येत्या काळात भावाबाबत काहीच सांगता येणार नाही, अशी स्थिती आहे. जागतिक बाजारात सोयाबीनचे भावाचा परिणाम देशात होतोय. हे चित्र दिवाळीनंतर स्पष्ट होईल तोपर्यंत आवश्यकता असेल एवढाच माल शेतकऱ्यांनी विकावा, असे मत व्यापारी बाळाप्रसाद बिदादा यांनी व्यक्त केले आहे. मागील चार दिवसात 5200 असलेला भाव 4800 पर्यंत खाली आला आहे. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनच्या भावात होत असलेल्या घसरणीमुळे आवकवर परिणाम झाला आहे. बाजाराचा अंदाज घेऊन शेतकरी बाजारात येत आहे. ज्यांच्याकडे माल विकल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही असेच शेतकरी बाजारात येत आहेत. पेरणी, देणी आणि दिवाळीचा खर्च अशा चक्रात अडकलेला शेतकरी येईल तो भाव आपला अशा विचारत येत आहे. मात्र, भावातील घसरणीमुळे आज आवक मंदावली आहे, असे मत आडत व्यापारी माणिक मोरे यांनी व्यक्त केले आहे.


सततच्या नैसर्गिक आपत्तीचा सामान करत बळीराजा पार जेरीला आला आहे. त्यातच आता हे भाव पडल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्याची वेळ आली आहे. दिवाळी गोड करण्याचे आश्वासन देणारे सत्ताधारी याकडे लक्ष देतील का? हा खरा प्रश्न आहे.


सोयाबीनच्या दरातील घसरण 


सोयाबीन दर
23 ऑगस्ट 10800


4 सप्टेंबर 9500


6 सप्टेंबर 8700


1 ऑक्टोबर 6300

 

या नंतर प्रतिदिन 100 रुपये घसरण झाली


8 ऑक्टोबर 6100


15 ऑक्टोबर 5300


20 ऑक्टोबर 5400


25 ऑक्टोबर 5200


26 ऑक्टोबर 5000

फडीवर तर 4200 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी केले जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde : स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
Pune Crime: नोकरी गेल्याने मानसिक धक्का, मुंबईच्या आदित्य सातपुतेंचं पुण्यातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?
नोकरी गेल्याने मानसिक धक्का, मुंबईच्या आदित्य सातपुतेंचं पुण्यातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Buldhana Accident News : सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाची झडप; बुलढाण्यातील भीषण अपघात दोघांचा दुर्दैवी अंत, 23 जण गंभीर जखमी
सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाची झडप; बुलढाण्यातील भीषण अपघात दोघांचा दुर्दैवी अंत, 23 जण गंभीर जखमी

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
Thane Electricity Supply : ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
Chhatrapati Sambhajinagar Crime: तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
Akola News: गॅस सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या 'वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने...'
गॅस सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या 'वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने...'
Ashok Kharat: तेजस्वी सातपुतेंनी प्रश्न विचारताच अशोक खरातची बोलती बंद, मान खाली घालून तसाच उभा राहिला
तेजस्वी सातपुतेंनी प्रश्न विचारताच अशोक खरातची बोलती बंद, मान खाली घालून तसाच उभा राहिला
Marathi Actor Accident:निखील बनेनंतर आणखी एका हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा भीषण अपघात; हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ 
निखील बनेनंतर आणखी एका हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा भीषण अपघात; हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ 
BMC commissioner : मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
NCP Merger:
"अजूनही वेळ गेलेली नाही, दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर अभिमान.., सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मान्य करा"; सुनील शेळकेंचं मोठे विधान
Embed widget