एक्स्प्लोर

Agriculture News : पावसाने दडी मारली, चाऱ्याच्या प्रश्न गंभीर अन् त्यात लम्पीने चिंता वाढवली; शेतकरी तिहेरी संकटात

Agriculture News : यंदा एकामागून एक शेतकऱ्यांसमोर संकटाचे डोंगर उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे.

परभणी: एकीकडे पावसाने (Rain) दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात आता चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. हेच काय कमी आता लम्पीमुळे (Lumpy) देखील चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी तिहेरी संकटात सापडलाय. गेल्या चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना यंदा काहीतरी हाती लागण्याची अपेक्षा होती. मात्र, यंदा एकामागून एक शेतकऱ्यांसमोर संकटाचे डोंगर उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे. कारण यंदा मराठवाड्यातील सहा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या संकटाचा सामना करत असतानाच आता शेतकऱ्यांसमोर जनावरांमधील लम्पी आजाराचं संकट देखील उभं राहिला आहे.

परभणी जिल्ह्यातील 144 गावांतील जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या रोगाच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण 768 जनावरे दगावले आहेत. विशेष म्हणजे या आजाराची जिल्ह्यात झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 144  गावांमधील जनावरे बाधित आढळून आले आहेत. या गावांमध्ये 5 हजार 507 जनावरे बाधित आढळून आली. त्यापैकी 3 हजार 570 जनावरांवर उपचार करून ती बरी झाली आहेत. तर, आतापर्यंत 768 जनावरांचा मृत्यू झाला आहे. बाधित गावापासून 5 किमी परिघातील 626 गावे हे प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये 2 लाख 80 हजार 397  जनावरांचा समावेश आहे. तर, जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून दगावलेल्या जनावरांपैकी 305 जनावर मालकांना 50 लाख 85 हजार रुपयांचे अर्थसहाय्य केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पण, सध्या वाढत असलेल्या लम्पीमुळे शेतकऱ्यांची आणि पशुपालकांची चिंता वाढली आहे. 

शेतकरी तिहेरी संकटात...

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर पहिलं संकट निर्माण झाले. जून महिन्यात सुरवातीलच पाऊस उशिरा दाखल झाला. जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला. पण ऑगस्ट महिना कोरडा गेला. सप्टेंबर महिन्यात किंचित आलेल्या पावसाने पिकांना जीवनदान दिले. पण, पुढे गायब झालेला पाऊस 20 दिवस उलटूनही परतला नाही. त्यात आता पावसाचे 10 दिवस शिल्लक असून, या काळात देखील मोठ्या पावसाची अपेक्षा नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 8 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी चाऱ्याचे बियाणे मिळावे म्हणून जिल्हा परिषदकडे अर्ज केले आहेत. असे असतांना आता अनेक जिल्ह्यात लम्पीचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे या तिहेरी संकटाचा कसा सामना करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Marathwada : मराठवाड्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव; तब्बल 8 हजार 60 पशुपालकांची मोफत बियाण्यांसाठी अर्ज

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Tukaram Mundhe : विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!
विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Embed widget