एक्स्प्लोर

'आपण फायरब्रॅंड नेते, दुसरी इनिंग सुरु करा, आम्ही...' एकनाथ शिंदेंनी रामदास कदमांची पाठ थोपटली

Eknath Shinde on Ramdas Kadam : शिवसेनेचे नेते रामदास कदम हे मध्यंतरी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र ते आता पुन्हा पक्षात सक्रिय होण्याची चिन्हं दिसत आहेत

Eknath Shinde on Ramdas Kadam : शिवसेनेचे नेते रामदास कदम हे मध्यंतरी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. एवढंच काय तर रामदास कदम हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा देखील रंगलेल्या. मात्र पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नसल्याचे रामदास कदम यांनी केले होते. असं असलं तरी ते पक्षकार्यात सक्रिय दिसत नव्हते. मात्र ते आता पुन्हा पक्षात सक्रिय होण्याची चिन्हं दिसत आहेत. रामदास कदम यांनी लिहलेल्या 'जागर कदम वंशाचा' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन आज झालं. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी उपस्थिती लावली. 

पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने या सर्वांनी शिवसेना नेते रामदास कदम यांचे कौतुक केलं. खासकरून एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांनी निवृत्तीचा विचार करू नये आपण दुसरी इनिंग सुरु करा आपण तुमच्या मागे राहू असा सल्ला देत शिवसेना नेते रामदास कदम यांची पाठराखण केली आहे. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे फायर ब्रॅंड म्हणून रामदास कदम यांचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम कुणापुढे झुकणारे नाहीत, अशी आठवण करून दिली. 

आपल्याला निवृत्त होता येणार नाही असं सांगत नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना सल्ला दिला आहे.  

रामदास कदम यांनी लिहलेल्या पुस्तक हे सरकारी वाचनालयात ठेवलं जाणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देत रामदास कदम यांनी लिहलेल्या पुस्तकाचे कौतुक केलं. 

वैभव खेडेकर यांचा रामदास कदम यांच्यावर प्रहार

या पुस्तकावरून राजकीय गरमागरमी पहायला मिळतेय. याच पुस्तकावरून खेडचे नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी रामदास कदम यांच्यावर प्रहार केला आहे. हे पुस्तकाचे नाव जागर नसून गाजर आहे. या पुस्तकात रामदास कदम यांनी लिहलेलं पुस्तक समाजाला कितपत आदर्श हे पाहावं लागेल. राजकीय संन्यासानंतर रामदास कदम यांना भरपूर वेळ मिळाला असावा, त्यांनी टीका वैभव खेडेकर यांनी केली आहे. या पुस्तकात पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण कसं करायचं, कार्यकत्यांना दबावात कसं ठेवायचं, जमिनी कशा गिळंकृत कराव्या हे लिहलं असा टोलाही त्यांनी लगावला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget