एक्स्प्लोर

Unlock 4 Guidelines: राज्यातील जिल्हाबंदी अखेर समाप्त, ई पास रद्द; राज्य सरकारच्या गाईडलाईन्स जारी

Maharashtra Lockdown Extended: आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. येत्या 2 सप्टेंबरपासून याची अमंलबजावणी केली जाणार आहे. राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहे.

मुंबई : मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. येत्या 2 सप्टेंबरपासून याची अमंलबजावणी केली जाणार आहे.राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे.

मिशन बिगीन अगेनअंतर्गत अनेक बाबींमध्ये सुट देत व अर्थचक्रास गती देण्यासाठी 2 सप्टेंबर 2020 पासून खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना 100 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापी, खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक, हॉटेल, लॉजेसचे कार्यान्वयन याबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) जारी करण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी शासकीय कार्यालयांमध्ये अ व ब गटातील अधिकाऱ्यांची यापुढे 100 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका, पुणे, पिंपरी - चिंचवड महापालिका आणि वेळोवेळी सूचीत करण्यात आलेल्या इतर महापालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचारी किंवा किमान 30 कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचारी किंवा किमान 50 कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल.

खाजगी कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार 30 टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय आणि खाजगी कार्यालये आणि आस्थापना यामध्ये निरीक्षण अधिकारी (व्हिजिलंट ऑफिसर)ची नियुक्ती करणे आवश्यक करण्यात आले असून हा अधिकारी सॅनिटायझेशन, शारिरीक अंतर आणि इतर सुरक्षाविषयक उपयायोजनांकडे लक्ष पुरवेल.

आता आंतरजिल्हा प्रवासी व मालवाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. वेगवेगळ्या व्यापारी करारानुसार शेजारी राष्ट्रांमधून मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीसाठी निर्बंध राहणार नाहीत. शिवाय त्यासाठी ई-परमिट / संमती / स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही.

मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संस्थाही 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. स्विमिंग पूल, करमणूक केंद्र, सिनेमा हॉल, नाट्य गृह, (मॉलमधील सिनेमाहॉलसह) बार परमीट रूमही बंदच राहतील.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026 Jay Pawar: राष्ट्रवादीचे 75 नेते देव पाण्यात बुडवून बसले, पण विधानपरिषदेवर जय पवारांना संधी मिळणार? अमोल मिटकरींचं ट्विट, पडद्यामागे हालचाली?
राष्ट्रवादीचे 75 नेते देव पाण्यात बुडवून बसले, पण विधानपरिषदेवर जय पवारांना संधी मिळणार? अमोल मिटकरींचं ट्विट, पडद्यामागे हालचाली?
Mumbai Watermelon Family death News: मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना, पण पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय
मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना, पण पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Jalgaon Crime News: क्रिकेटचा सामना संपताच दोन गट भिडले, 'तुम्ही कुठले?' वरून वादाची ठिणगी अन् तीन जण गंभीर जखमी; जळगावातील धक्कादायक घटना
क्रिकेटचा सामना संपताच दोन गट भिडले, 'तुम्ही कुठले?' वरून वादाची ठिणगी अन् तीन जण गंभीर जखमी; जळगावातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Iran US Israel War Conflict: पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
Mumbai Watermelon Family death News: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
Vidhan Parishad Election 2026 Bacchu Kadu: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
Mumbai Watermelon Family death News: मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना, पण पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय
मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना, पण पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Embed widget