एक्स्प्लोर

Dhananjay Munde : हे सरकार जनतेच्या नाहीतर स्वतःच्या हितासाठी सत्तेत आलं, धनंजय मुंडेंचा निशाणा

परतीच्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसलाय. अद्याप या नुकसानीचे पंचनामे झाले नसून, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. याच मुद्यावरुन राष्ट्रावदी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंनी सरकारवर टीका केली.

Dhananjay Munde on State Govt : हे सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आलं नाही, तर स्वतःच्या हितासाठी आलं  आहे, असं म्हणत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) सरकारवर निशाणा लगावला. परतीच्या पावसाचा (Rain) मोठा फटका शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना बसला आहे. हाती आलेली पिकं वाया गेली आहेत. अद्यापही अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तसेच काही ठिकाणी अजूनही पंचनामे झाले नसल्याचे मुंडे म्हणाले. 

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही

मागील वर्षीही परतीच्या पावसामुळं अशीच परिस्थिती झाली होती. आम्ही मदत केली, पण आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नसल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. राज्यात पिकांचं एवढं नुकसान झालं आहे, मात्र कुठलेच मंत्री दिसत नसल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. शिधा भेटणार नाहीच नुसत्या गोड घोषणा सरकार करत असल्याचेही मुंडे यावेळी म्हणाले. एकतर मंत्रीमंडळाचा विस्तार उशीरा केला. पालकमंत्रीपदाची घोषणा उशीरा केली. त्यामुळं सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी याबाबत कोणताही दिलासा द्यायला तयार नसल्याचे मुंडे म्हणाले. अनेक ठिकाणी 65 मिमी पुढे पाऊस पडला आहे. तरी देखील तिथे पंचनामे झाले नाहीत, असे मुंडे म्हणाले. मी याबाबत तीन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात पत्र दिले असल्याचे मुंडे म्हणाले.

अतिवृष्टीनं सोयाबीनसह कापूस आणि फळबागांनांही फटका

बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फक्त सोयाबीन कापूस या पिकालाच फटका बसला नाही तर फळबागांचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. चार दिवस पडलेल्या पावसामुळं मोसंबीच्या फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे. तोडणीला आलेल्या मोसंबीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असून शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालं आहे. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची भयंकर स्थिती झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली होती, ते सोयाबीन जागेवरच असून पावसामुळं त्याला कोंब फुटले असल्याचे मुंडे म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार असताना अशीच स्थिती आली होती. या स्थितीत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं त्यांना अनुदान दिले होते. बीड जिल्ह्यात 800 कोटी रुपयांचा अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले होते असेही मुंडे म्हणाले. 

संकटाच्या काळात मंत्री कुठेच दिसत नाहीत

कृषीमंत्री नाहीतर सगळेच मंत्री कुठे दिसत नाही. संकटाच्या काळात मंत्री कुठेही दिसत नसल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. विरोधी पक्ष आवाज उठवत आहेत, पण सरकारनं मदत करायचीच नाही असं ठरवल्याचे मुंडे म्हणाले. हे सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आलं नसून स्वत: च्या हितासाठी सत्तेत आलं असल्याचे मुंडे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Aurangabad Rain: औरंगाबाद जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी, पहा कोणत्या भागात काय परिस्थिती

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Embed widget