एक्स्प्लोर

Dhananjay Munde : हे सरकार जनतेच्या नाहीतर स्वतःच्या हितासाठी सत्तेत आलं, धनंजय मुंडेंचा निशाणा

परतीच्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसलाय. अद्याप या नुकसानीचे पंचनामे झाले नसून, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. याच मुद्यावरुन राष्ट्रावदी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंनी सरकारवर टीका केली.

Dhananjay Munde on State Govt : हे सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आलं नाही, तर स्वतःच्या हितासाठी आलं  आहे, असं म्हणत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) सरकारवर निशाणा लगावला. परतीच्या पावसाचा (Rain) मोठा फटका शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना बसला आहे. हाती आलेली पिकं वाया गेली आहेत. अद्यापही अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तसेच काही ठिकाणी अजूनही पंचनामे झाले नसल्याचे मुंडे म्हणाले. 

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही

मागील वर्षीही परतीच्या पावसामुळं अशीच परिस्थिती झाली होती. आम्ही मदत केली, पण आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नसल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. राज्यात पिकांचं एवढं नुकसान झालं आहे, मात्र कुठलेच मंत्री दिसत नसल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. शिधा भेटणार नाहीच नुसत्या गोड घोषणा सरकार करत असल्याचेही मुंडे यावेळी म्हणाले. एकतर मंत्रीमंडळाचा विस्तार उशीरा केला. पालकमंत्रीपदाची घोषणा उशीरा केली. त्यामुळं सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी याबाबत कोणताही दिलासा द्यायला तयार नसल्याचे मुंडे म्हणाले. अनेक ठिकाणी 65 मिमी पुढे पाऊस पडला आहे. तरी देखील तिथे पंचनामे झाले नाहीत, असे मुंडे म्हणाले. मी याबाबत तीन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात पत्र दिले असल्याचे मुंडे म्हणाले.

अतिवृष्टीनं सोयाबीनसह कापूस आणि फळबागांनांही फटका

बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फक्त सोयाबीन कापूस या पिकालाच फटका बसला नाही तर फळबागांचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. चार दिवस पडलेल्या पावसामुळं मोसंबीच्या फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे. तोडणीला आलेल्या मोसंबीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असून शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालं आहे. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची भयंकर स्थिती झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली होती, ते सोयाबीन जागेवरच असून पावसामुळं त्याला कोंब फुटले असल्याचे मुंडे म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार असताना अशीच स्थिती आली होती. या स्थितीत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं त्यांना अनुदान दिले होते. बीड जिल्ह्यात 800 कोटी रुपयांचा अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले होते असेही मुंडे म्हणाले. 

संकटाच्या काळात मंत्री कुठेच दिसत नाहीत

कृषीमंत्री नाहीतर सगळेच मंत्री कुठे दिसत नाही. संकटाच्या काळात मंत्री कुठेही दिसत नसल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. विरोधी पक्ष आवाज उठवत आहेत, पण सरकारनं मदत करायचीच नाही असं ठरवल्याचे मुंडे म्हणाले. हे सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आलं नसून स्वत: च्या हितासाठी सत्तेत आलं असल्याचे मुंडे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Aurangabad Rain: औरंगाबाद जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी, पहा कोणत्या भागात काय परिस्थिती

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: 'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ
'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ
Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
Nashik Pune Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Embed widget