एक्स्प्लोर

Dhananjay Munde : हे सरकार जनतेच्या नाहीतर स्वतःच्या हितासाठी सत्तेत आलं, धनंजय मुंडेंचा निशाणा

परतीच्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसलाय. अद्याप या नुकसानीचे पंचनामे झाले नसून, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. याच मुद्यावरुन राष्ट्रावदी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंनी सरकारवर टीका केली.

Dhananjay Munde on State Govt : हे सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आलं नाही, तर स्वतःच्या हितासाठी आलं  आहे, असं म्हणत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) सरकारवर निशाणा लगावला. परतीच्या पावसाचा (Rain) मोठा फटका शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना बसला आहे. हाती आलेली पिकं वाया गेली आहेत. अद्यापही अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तसेच काही ठिकाणी अजूनही पंचनामे झाले नसल्याचे मुंडे म्हणाले. 

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही

मागील वर्षीही परतीच्या पावसामुळं अशीच परिस्थिती झाली होती. आम्ही मदत केली, पण आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नसल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. राज्यात पिकांचं एवढं नुकसान झालं आहे, मात्र कुठलेच मंत्री दिसत नसल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. शिधा भेटणार नाहीच नुसत्या गोड घोषणा सरकार करत असल्याचेही मुंडे यावेळी म्हणाले. एकतर मंत्रीमंडळाचा विस्तार उशीरा केला. पालकमंत्रीपदाची घोषणा उशीरा केली. त्यामुळं सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी याबाबत कोणताही दिलासा द्यायला तयार नसल्याचे मुंडे म्हणाले. अनेक ठिकाणी 65 मिमी पुढे पाऊस पडला आहे. तरी देखील तिथे पंचनामे झाले नाहीत, असे मुंडे म्हणाले. मी याबाबत तीन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात पत्र दिले असल्याचे मुंडे म्हणाले.

अतिवृष्टीनं सोयाबीनसह कापूस आणि फळबागांनांही फटका

बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फक्त सोयाबीन कापूस या पिकालाच फटका बसला नाही तर फळबागांचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. चार दिवस पडलेल्या पावसामुळं मोसंबीच्या फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे. तोडणीला आलेल्या मोसंबीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असून शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालं आहे. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची भयंकर स्थिती झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली होती, ते सोयाबीन जागेवरच असून पावसामुळं त्याला कोंब फुटले असल्याचे मुंडे म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार असताना अशीच स्थिती आली होती. या स्थितीत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं त्यांना अनुदान दिले होते. बीड जिल्ह्यात 800 कोटी रुपयांचा अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले होते असेही मुंडे म्हणाले. 

संकटाच्या काळात मंत्री कुठेच दिसत नाहीत

कृषीमंत्री नाहीतर सगळेच मंत्री कुठे दिसत नाही. संकटाच्या काळात मंत्री कुठेही दिसत नसल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. विरोधी पक्ष आवाज उठवत आहेत, पण सरकारनं मदत करायचीच नाही असं ठरवल्याचे मुंडे म्हणाले. हे सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आलं नसून स्वत: च्या हितासाठी सत्तेत आलं असल्याचे मुंडे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Aurangabad Rain: औरंगाबाद जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी, पहा कोणत्या भागात काय परिस्थिती

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Mumbai Rain: मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन, जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी
मुंबईत मन्सूनपूर्व पावसाचे आगमन, जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
Dharavi redevelopment BEST Land: मोठी बातमी: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बेस्टच्या दोन आगारांची 11 एकरांची मोक्याची जागा जाणार, मोबदल्यात काय मिळणार?
मोठी बातमी: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बेस्टच्या दोन आगारांची 11 एकरांची मोक्याची जागा जाणार, मोबदल्यात काय मिळणार?

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
Embed widget