एक्स्प्लोर

उर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'महाविकास आघाडीचं अपयश आमच्या माथी मारु नये'

उर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Devendra Fadnavis : उर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प गेला अशा चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नये. सर्व टाईमलाईन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. 

उर्जा उपकरण प्रकल्पही मविआ सरकारच्याच काळातच गेला: फडणवीस

उर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर गेल्या संदर्भात नागपूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारले असता ते म्हणाले, ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प गेला अशा चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नये. सर्व टाईमलाईन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्पाचे तीन पार्ट असतील, दोन पार्टची घोषणा होणे बाकी आहे. महाराष्ट्रातुन गेल्याचा कांगावा करणे चुकीचे आहे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते, कुठलीही माहिती न घेता महाविकास आघाडीचं अपयश आमच्या माथी मारू नये. अधिकारी सुद्धा हताश होतात, कुठलीही माहिती न घेता जुन्या सरकारच्या काळातील गेलेले प्रकल्प आमच्या काळात गेले हे दाखवणे बंद केले पाहिजे.  

मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं...
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याच्या आरोपांमुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला विरोधकांच्या टीकेला समोरे जावे लागत आहे. तर राज्यात विरोधी पक्षांकडून तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.  कोणताही प्रकल्प एखाद्या राज्यात तीन-चार महिन्यात येतो आणि जातो, असं होत नाही. कुठलीही प्रक्रिया ही आधीपासून सुरु असते. प्रकल्प म्हणजे जादूची कांडी नाही, की इकडून आला आणि तिकडे गेला, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील बाहेर गेलेल्या प्रकल्पांबद्दल दिले. 

जितेंद्र आव्हाडांवर काय म्हणाले फडणवीस...

फडणवीस म्हणाले की, एखाद्या गोष्टीचा कांगावा करणे ही आव्हाडांची स्टाईल आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन मारहाण केली म्हणून कारवाई झाली. आपण खूप मोठं केलं आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.

फडणवीस म्हणाले की, अफजलखान कबरीवरील अतिक्रमण हटविले आहे. आता पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असंही ते म्हणाले. गुजरात निवडणुकीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, मला पक्षाने जबाबदारी दिली आहे. ती पूर्ण करण्याची जबाबदारी आहे, मला गुजरातमध्ये प्रचार करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे.

ही बातमी देखील वाचा

Eknath Shinde : जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई कायदेशीर, राजकीय हस्तक्षेप नाहीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget