एक्स्प्लोर

मराठवाड्यातील नुकसान जलयुक्त शिवारमुळे! पर्यावरणतज्ञांचं मत, भाजपनं दावा फेटाळला, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra  Marathwada Rain Update : मराठवाड्यात झालेली जलयुक्त शिवारची काम जबाबदार नुकसानीला असल्याचं मत पर्यावरणतज्ञांनी व्यक्त केलं आहे.यावरुन चांगलाच वाद पेटला आहे.

Maharashtra  Marathwada Rain Update :  गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update)  राज्यातील काही भागात तुफान पाऊस झाला. या पावसानं होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील या नुकसानीला मराठवाड्यात झालेली जलयुक्त शिवारची काम जबाबदार असल्याचं मत पर्यावरणतज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर केला जाणार? मंत्री विजय वडेट्टीवारांचं महत्वाचं वक्तव्य

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 476 कोटी सात लाख 75 हजारांचे नुकसान
विभागीय आयुक्त कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 476 कोटी सात लाख 75 हजारांचे नुकसान झाले आहे.  मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आजपर्यंत 25 लाख 98 हजार 213 हेक्टरचे नुकसान झाले आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या 35 लाख 64 हजार 391 इतकी आहे.  90 टक्के पंचनामे झाल्याचा दावा विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आला आहे. 

Maharashtra Rain : आभाळ फाटलं! 'गुलाब' वादळाचे 'काटे' शेतकऱ्यांच्या अंगाला, बळीराजाचं अतोनात नुकसान

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये झालेल्या या नुकसानीला जलयुक्तची कामंच जबाबदार असल्याचा निष्कर्ष पर्यावरणतज्ञानांनी काढलाय. महाराष्ट्र जलयुक्तची कामे झाली. नदी ,ओढा नाल्यातून गाळ काढून बाजूलाच टाकला गेला आणि हा गाळ पुन्हा नदी नाल्यात येऊन नदीत आल्यानं सपाटीकरण झालं. त्यानंतर आता अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे पाणी पात्र सोडून शेतामध्ये घुसलं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचं पर्यावरणतज्ञ अतुल  देऊळगावकर यांचं म्हणणं आहे.  

Marathwada Rain : अतिवृष्टीचा मराठवाड्याला मोठा फटका, तब्बल 476 कोटींचं नुकसान, 22 लोकांचा मृत्यू तर शेकडो जनावरं दगावली

पर्यावरण तज्ञाच्या मते अतिवृष्टीनंतर हेच स्पष्टपणे समोर आलं आहे की पाणी वाहून जाण्यास जागा न ठेवल्यामुळे नदीचे पात्र बदलले. रस्ते पुलांचे बांधकाम होताना पाण्याचा निचरा करण्याबाबत विचार केला गेला नाही. शिवाय मुख्य पात्राऐवजी चोरट्या मार्गाने वाळू उपसा झाल्यामुळे देखील मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. 
 
या सगळ्या नुकसानीला जलयुक्त शिवारची कामं जबाबदार आहेत असं पर्यावरणतज्ज्ञांनी म्हटल्यानंतर ज्या भाजपच्या सरकारच्या काळात ही कामे झाली. ज्या मंत्र्यांच्या अखत्यारीत जलयुक्तची कामे झाली. त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या. माजी मंत्री राम शिंदे यांनी जलयुक्त शिवाराची कामं या नुकसानीला जबाबदार नसल्याचे म्हणत पर्यावरण तज्ञांचा दावा फेटाळला आहे. 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, जलयुक्त शिवारची काम ही नियमांच्या बाहेर केली नाहीत. जलयुक्तच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हा दावा पंकजा मुंडे यांनी फेटाळला आहे. एखाद-दुसरं खराब काम झालं असेल त्यामुळे सगळीच कामांमुळे असं झालं असं म्हणणं योग्य नाही. उलट दुष्काळात जलयुक्तने मराठवाड्याला मदतच केली आहे, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
Pravin Tidme: आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Satara ZP Election : शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणेंचा पराभव
शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, अर्चना रांजणेंचा पराभव, जावळीतून धक्कादायक निकाल

व्हिडीओ

Sharad Pawar Health Update : शरद पवार होतोय श्वसनाचा त्रास, रुबी रुग्णालयात केलं दाखल
Ram Satpute On ZP Election : मोहिते पाटील आणि जानकरांना घरात बसवलं- राम सातपुते
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन
Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
Pravin Tidme: आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Satara ZP Election : शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणेंचा पराभव
शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, अर्चना रांजणेंचा पराभव, जावळीतून धक्कादायक निकाल
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
Kolhapur ZP Election Result: ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
Embed widget