एक्स्प्लोर

मराठवाड्यातील नुकसान जलयुक्त शिवारमुळे! पर्यावरणतज्ञांचं मत, भाजपनं दावा फेटाळला, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra  Marathwada Rain Update : मराठवाड्यात झालेली जलयुक्त शिवारची काम जबाबदार नुकसानीला असल्याचं मत पर्यावरणतज्ञांनी व्यक्त केलं आहे.यावरुन चांगलाच वाद पेटला आहे.

Maharashtra  Marathwada Rain Update :  गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update)  राज्यातील काही भागात तुफान पाऊस झाला. या पावसानं होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील या नुकसानीला मराठवाड्यात झालेली जलयुक्त शिवारची काम जबाबदार असल्याचं मत पर्यावरणतज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर केला जाणार? मंत्री विजय वडेट्टीवारांचं महत्वाचं वक्तव्य

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 476 कोटी सात लाख 75 हजारांचे नुकसान
विभागीय आयुक्त कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 476 कोटी सात लाख 75 हजारांचे नुकसान झाले आहे.  मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आजपर्यंत 25 लाख 98 हजार 213 हेक्टरचे नुकसान झाले आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या 35 लाख 64 हजार 391 इतकी आहे.  90 टक्के पंचनामे झाल्याचा दावा विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आला आहे. 

Maharashtra Rain : आभाळ फाटलं! 'गुलाब' वादळाचे 'काटे' शेतकऱ्यांच्या अंगाला, बळीराजाचं अतोनात नुकसान

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये झालेल्या या नुकसानीला जलयुक्तची कामंच जबाबदार असल्याचा निष्कर्ष पर्यावरणतज्ञानांनी काढलाय. महाराष्ट्र जलयुक्तची कामे झाली. नदी ,ओढा नाल्यातून गाळ काढून बाजूलाच टाकला गेला आणि हा गाळ पुन्हा नदी नाल्यात येऊन नदीत आल्यानं सपाटीकरण झालं. त्यानंतर आता अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे पाणी पात्र सोडून शेतामध्ये घुसलं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचं पर्यावरणतज्ञ अतुल  देऊळगावकर यांचं म्हणणं आहे.  

Marathwada Rain : अतिवृष्टीचा मराठवाड्याला मोठा फटका, तब्बल 476 कोटींचं नुकसान, 22 लोकांचा मृत्यू तर शेकडो जनावरं दगावली

पर्यावरण तज्ञाच्या मते अतिवृष्टीनंतर हेच स्पष्टपणे समोर आलं आहे की पाणी वाहून जाण्यास जागा न ठेवल्यामुळे नदीचे पात्र बदलले. रस्ते पुलांचे बांधकाम होताना पाण्याचा निचरा करण्याबाबत विचार केला गेला नाही. शिवाय मुख्य पात्राऐवजी चोरट्या मार्गाने वाळू उपसा झाल्यामुळे देखील मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. 
 
या सगळ्या नुकसानीला जलयुक्त शिवारची कामं जबाबदार आहेत असं पर्यावरणतज्ज्ञांनी म्हटल्यानंतर ज्या भाजपच्या सरकारच्या काळात ही कामे झाली. ज्या मंत्र्यांच्या अखत्यारीत जलयुक्तची कामे झाली. त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या. माजी मंत्री राम शिंदे यांनी जलयुक्त शिवाराची कामं या नुकसानीला जबाबदार नसल्याचे म्हणत पर्यावरण तज्ञांचा दावा फेटाळला आहे. 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, जलयुक्त शिवारची काम ही नियमांच्या बाहेर केली नाहीत. जलयुक्तच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हा दावा पंकजा मुंडे यांनी फेटाळला आहे. एखाद-दुसरं खराब काम झालं असेल त्यामुळे सगळीच कामांमुळे असं झालं असं म्हणणं योग्य नाही. उलट दुष्काळात जलयुक्तने मराठवाड्याला मदतच केली आहे, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Phaltan Doctor Death: 'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
Panvel Crime: पनवेल हादरलं! ऑफिसमधील महिलेला घरी बोलवले, पत्नीच्या मदतीने  गुंगीचं औषध देत लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ बनवत लाखोंचा गंडा
पनवेल हादरले! ऑफिसमधील महिलेला घरी बोलवले, पत्नीच्या मदतीने गुंगीचं औषध देत लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ बनवत लाखोंचा गंडा
सोन्याची पुन्हा एक गटांगळी! 24 तासांत सोन्याचा भाव 4 हजारांनी घसरला, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?
सोन्याची पुन्हा एक गटांगळी! 24 तासांत सोन्याचा भाव 4 हजारांनी घसरला, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?
Bacchu Kadu & Girish mahajan : बावनकुळेंनी 8-10 फोन लावले पण बच्चू कडूंनी दाद दिली नाही, अखेर भाजपचा संकटमोचक धावून आला, फोनवर महत्त्वाची चर्चा
बावनकुळेंनी 8-10 फोन लावले पण बच्चू कडूंनी दाद दिली नाही, अखेर भाजपचा संकटमोचक धावून आला, फोनवर महत्त्वाची चर्चा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmer Protest : कार्यकर्ते अडवले, बच्चू कडू संतापले; सरकारला थेट इशारा
Nana Patole On Farmers Issue : सरकार फक्त आकडे जाहीर करतंय,कोणतीही मदत करत नाहीय
Gold Price Drop: 'सोन्याचे भाव कोसळले, ग्राहकांना मोठा दिलासा
Devendra Fadnavis On Bacchu Kadu Protest : आंदोलन करुन प्रश्न सोडवता येत नाहीत : देवेंद्र फडणवीस
Khadse Robbery: 'त्या' सीडी आणि पेनड्राईव्हमध्ये काय होतं? Eknath Khadse यांच्या घरातून चोरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Phaltan Doctor Death: 'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
Panvel Crime: पनवेल हादरलं! ऑफिसमधील महिलेला घरी बोलवले, पत्नीच्या मदतीने  गुंगीचं औषध देत लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ बनवत लाखोंचा गंडा
पनवेल हादरले! ऑफिसमधील महिलेला घरी बोलवले, पत्नीच्या मदतीने गुंगीचं औषध देत लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ बनवत लाखोंचा गंडा
सोन्याची पुन्हा एक गटांगळी! 24 तासांत सोन्याचा भाव 4 हजारांनी घसरला, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?
सोन्याची पुन्हा एक गटांगळी! 24 तासांत सोन्याचा भाव 4 हजारांनी घसरला, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?
Bacchu Kadu & Girish mahajan : बावनकुळेंनी 8-10 फोन लावले पण बच्चू कडूंनी दाद दिली नाही, अखेर भाजपचा संकटमोचक धावून आला, फोनवर महत्त्वाची चर्चा
बावनकुळेंनी 8-10 फोन लावले पण बच्चू कडूंनी दाद दिली नाही, अखेर भाजपचा संकटमोचक धावून आला, फोनवर महत्त्वाची चर्चा
Phaltan Doctor Death: फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांशी राहुल गांधींचा फोनवरून संवाद, आई - वडील म्हणाले ....
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांशी राहुल गांधींचा फोनवरून संवाद, आई - वडील म्हणाले ....
Bacchu Kadu & Chandrashekhar Bawankule: सरकारकडून चर्चेचे दरवाजे उघडेच, पण बच्चू कडू बैठकीला येतच नाहीत: चंद्रशेखर बावनकुळे
सरकारकडून चर्चेचे दरवाजे उघडेच, पण बच्चू कडू बैठकीला येतच नाहीत: चंद्रशेखर बावनकुळे
Eknath Khadse Robbery: आता सीडी लावतो म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरातून 'ती' सीडी अन् पेनड्राईव्ह गायब; नाथाभाऊंच्या दाव्यानं एकच खळबळ
आता सीडी लावतो म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरातून 'ती' सीडी अन् पेनड्राईव्ह गायब; नाथाभाऊंच्या दाव्यानं एकच खळबळ
Pune Accident: भरधाव वेगात आला अन् वाहनांना उडवत गेला, पुण्यातील नवले पुलाखाली भीषण ट्रक अपघात, व्हिडिओही आला समोर
भरधाव वेगात आला अन् वाहनांना उडवत गेला, पुण्यातील नवले पुलाखाली भीषण ट्रक अपघात, व्हिडिओही आला समोर
Embed widget