अनैतिक संबंधातून दोघांनी केला खून, कापूस वेचणाऱ्या 'त्या' महिलेच्या खून प्रकरणाला वेगळे वळण
24 वर्षीय महिलेचा गळा आवळून व डोक्यात दगड मारून खून केल्याच्या घटनेने पोलिसांनी अवघ्या काही तासात या खुनातील आरोपींना ताब्यात घेतले.
बीड : शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेमध्ये आढळून आला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील सालेगाव मधील या घटनेने खळबळ उडाली होती. 24 वर्षीय महिलेचा गळा आवळून व डोक्यात दगड मारून खून केल्याच्या घटनेने पोलिसांनी अवघ्या काही तासात या खुनातील आरोपींना ताब्यात घेतले. सदर खून हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचे आता पुढे आले आहे.
एका 24 वर्षीय विवाहित महिलेचा शेतात कापूस वेचताना कोणीतरी अज्ञात इसमाने गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता महिलेचा मोबाईल त्यांना आढळून आला. त्या आधारे त्यांनी तपासणी केली असता त्यांना पंकज भगवान जाधव याच्याशी पहाटे संपर्क झाल्याचे निदर्शनास आले.
त्या आधारे अधिक तपास केला असता सदर महिला हे शेतात गेली असता तिच्याशी पंकज भगवान जाधव याने शारीरिक संबंध ठेवले. त्या नंतर त्याने त्याचा मित्र धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे यास फोन करून बोलावून घेतले. त्यानेही ही सदर मयत महिलेशी शरीर सुखाची मागणी केली; मात्र त्या महिलेने नकार दिला आणि तिने हा प्रकार तिच्या पतीस सांगते व पोलिसात तक्रार देते; अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी तिच्या हातातील मोबाईल हातावर मारून हिसकावून घेतला. नंतर धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे यांनीही तिला ओढत नेऊन कापसाच्या शेतात तिच्यावर बलात्कार केला.
त्या नंतर हा प्रकार घरी माहित होईल किंवा पोलिसात तक्रार होईल; म्हणून दोघांनी मिळून त्या महिलेचा स्कार्फने गळा आवळून आणि नंतर डोक्यात दगड घालून खून केला. खून केल्या नंतर दोघांनी प्रेत उचलून सुमारे पन्नास फूट अंतरावर कापसाच्या पिकात नेऊन टाकले.
या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये कुणाचा गुन्हा दाखल केला मात्र प्रथम दर्शनी या महिलेसोबत विनयभंग आणि बलात्कार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. त्यानंतर नातेवाईकांनी मात्र जोपर्यंत बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्या महिलेचे प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला होता. या घटनेनंतर शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जवळच्या नातेवाईकाकडूनच या महिलेचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे आता पुढे आले आहे.
संबंधित बातम्या :