एक्स्प्लोर

CORONAVIRUS UPDATES | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन प्रवासावर उद्यापासून निर्बंध

Coronavirus live updates todays breaking news 21th march 2020 marathi news CORONAVIRUS UPDATES | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन प्रवासावर उद्यापासून निर्बंध

Background

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासोबतच औरंगाबाद, ठाणे, बीडसह अन्य काही जिल्हे उद्या बंद राहणार आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी आणि खासगी दुकाने, आस्थापने बंद राहणार आहेत. या सर्व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तर नागपूरमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. याकाळात नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

राज्यात कोरोना विषाणुंच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती आता फक्त 25 टक्क्यांवर आणण्यात आली आहे, तसंच मेडिकल, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (20 मार्च) जाहीर केलं. रेल्वे, बस बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा खोळंबतील. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

 

21 आणि 22 मार्चला बीड बंद 
कोरोना विषाणुचा संसर्ग (कोव्हीड-19) रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने दिनांक 21 आणि 22 मार्च रोजी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक, नगरपालिका, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सर्व उपविभागीय अधिकारी, उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, सर्व तहसीलदार, सर्व संबंधीत नगरपालिका/नगरपंचायत मुख्याधिकारी, ग्रामसेवक, तलाठी इ.ची असणार आहे. ह्या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

 

नागपूरमध्ये लॉकडाउन
कोरोना व्हायरसचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी काही निर्णय घेतल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना काही अधिकार दिले आहेत त्या नुसार. शहरात नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडायचे आहे. सर्व खासगी कार्यालय बंद करायचे आहेत. फक्त अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार आहेत. यात भाजीपाला, दूध, औषधी, पाणी, फूड होम डिलिव्हरी सुरू राहतील. नियम तोडल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. 1897 हा कायदा शहरात लागू झाला असून नागपुरात शहरात लोक डाऊन आहे.

ठाणे अत्यावश्यक सेवा वगळून पूर्णपणे बंद
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजना म्हणून ठाणे जिल्ह्यात शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर व ग्रामीण भागातील काळया पिवळया जीप अशा प्रकारची एकत्रित प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्रातील नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना अत्यावश्यक किराणा सामान ( GROCERY), दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तु व औषधालय (CHEMIST SHOP) वगळून 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

 

औरंगाबाद शहर दोन दिवस बंद
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता, औरंगाबाद शहर दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी घेतला आहे. उद्या आणि परवा संपूर्ण शहर बंद राहील त्यामुळे लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील उदय चौधरी यांनी केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवांना या बंदमधून सूट देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

22:33 PM (IST)  •  21 Mar 2020

'कोरोना’चा सामना करण्यासाठी सर्वजण सज्ज असतानाच औरंगाबादेत ‘स्वाईन फ्लू’ने शिरकाव केल्याचे समोर आले आहे़ कोरोनाच्या संशयावरून घेतलेल्या दोघांचे अहवाल ‘स्वाईन फ्लू’ पॉझिटिव्ह निघाले आहे़ कोरोना पॉझिटिव्ह प्राध्यापिका निगेटिव्ह झाल्याचा आनंदोत्सव साजरा होतानाच हा प्रकार समोर आला आहे
22:19 PM (IST)  •  21 Mar 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता लोकल प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन प्रवासावर उद्यापासून निर्बंध येणार आहे.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Abhimanyu Pawar: अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकं मोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकं मोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Embed widget