एक्स्प्लोर

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून तीन पक्षात महानगरपालिकेत फूट होईल का याची ही चर्चा सध्या सुरू आहे.

Aurangabad To Sambhajinagar :  महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणार असं शिवसेना वारंवार सांगत आहे. मात्र शिवसेना महाराष्ट्रात ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत सत्तेत आहेत ते मात्र काहीही झालं तरी औरंगाबादचे नाव संभाजीनगर होऊ देणार नाही असं म्हणतात.  त्यामुळे शिवसेना खरोखरच महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचा नामांतर करण्यात यशस्वी होणार का याची चर्चा सध्या रंगत आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद देत शिवसेना सुपर संभाजीनगर, ध्वज दिवाळी असे कार्यक्रम करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सोबत जरी गेलो असलो तरी हिंदुत्व सोडलं नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र शिवसेना ज्यांच्या सोबत महाराष्ट्रात सत्तेत आहे ते मात्र शिवसेना हिंदुत्ववादी असली तरी त्यांचे हिंदुत्ववादी मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही असं वारंवार सांगते आहे.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हे शिवसेनेचे स्वप्न आहे. पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही असा दावा काँग्रेस राष्ट्रवादीकडून केला जात आहे. शिवसेनेने मध्यंतरी सरकारी स्तरावर नामांतराचा प्रयत्न केला, विभागीय आयुक्तांनी तसा अहवालही पाठवला.  शिवसेनेच्या मंत्र्यांकडून शासकीय कागदपत्रावरही संभाजीनगर असा उल्लेख केला आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे की,  आता ती वेळ आली आहे असं म्हटलं. पण त्यांच्या सोबत सत्तेत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस मात्र शिवसेनेला वेळ साधू देणार नाहीत हेच यावरून दिसत आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महानगरपालिकेच्या निवडणुका लढवतील असे म्हटले जात आहे. मात्र गेल्या पंचवीस वर्षात शिवसेना संभाजीनगरचा मुद्दा अस्मितेचा केला आहे . याच मुद्द्यावरून जर वाद सुरू झाला तर हे तीन पक्ष एकत्र लढतील काय यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून तीन पक्षात महानगरपालिकेत फूट होईल का याची ही चर्चा सध्या सुरू आहे.

औरंगाबाद शहराच्या नावाचा इतिहास काय?

या शहराचं नावाजलेलं नाव म्हणजे खडकी, हा परिसर बेसाल्ट खडकावर वसलेला आहे त्यात शहरात अगदी प्राचिन असे खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे याच नावावरून या शहराचे नाव खडकी पडले असावे असं इतिहासात नोंद आहे.  त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता ख-या अर्थानं नहरे ए अंबरी सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारून त्यानं या गावाचं शहर केलं मात्र  त्यानंही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही,  कालांतरानं 1633मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्यानं आपल्या नावावरून या शहराचे नाव फतेहनगर असे ठेवले. 1653 मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला त्यानं पुन्हा या शहराचं नाव फतेहनगर वरून खुजिस्ता बुनियाद असे ठेवले, कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आले आणि त्यानंतर या शहराला सध्याचे आहे हे औरंगाबाद हे नाव मिळालं. ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिले.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog: अशोक खरातने नरबळी दिल्याचा संशय, पाच पुंगळ्या सापडल्या, 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली
Maharashtra Live Blog: अशोक खरातने नरबळी दिल्याचा संशय, पाच पुंगळ्या सापडल्या, 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली
Ashok Kharat Case Nashik Sessions Court: पेढा, नरबळी,रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा; अशोक खरातबाबत वकिलांची कोर्टात हादरवणारी माहिती, नाशिक सत्र न्यायालयात आज काय काय घडलं?
पेढा, नरबळी,रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा; अशोक खरातबाबत वकिलांची कोर्टात हादरवणारी माहिती, नाशिक सत्र न्यायालयात आज काय काय घडलं?
साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 भाविक जखमी
साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 भाविक जखमी
मोठी बातमी! धर्मांतर केल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, याचिका फेटाळली
मोठी बातमी! धर्मांतर केल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, याचिका फेटाळली

व्हिडीओ

Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर
Supriya Sule on Rupali Chakankar : Devendra Fadnavis यांचे आभार, Ashok Kharat प्रकरणी काय म्हणाल्या?
Sunil Tatkare on Kharat : तुमच्यासमोर खरातने पूजा केलीय का? सुनील तटकरेंचं बेधडक उत्तर
Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 भाविक जखमी
साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 भाविक जखमी
Devendra Fadnavis and Supriya Sule: देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
सभापतींचा निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही; तुषार दोशी निलंबनावरुन सभागृहात चर्चा, फडणवीसांचं उत्तर
सभापतींचा निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही; तुषार दोशी निलंबनावरुन सभागृहात चर्चा, फडणवीसांचं उत्तर
Donald Trump on Iran talks: अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
Dhruv Rathee on Ram & Krishna: श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
Diva Ratnagiri passenger train MNS: दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन 15 दिवसांत सुरु करा, अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू; मनसेचा आक्रमक पवित्रा
दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन 15 दिवसांत सुरु करा, अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू; मनसेचा आक्रमक पवित्रा
Embed widget