एक्स्प्लोर

Nana Patole : फतवे काढून काही धर्मातील लोकांना मुद्दाम मतदानापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न; काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा घणाघात

Nana Patole : काही लोक एखादा कागद काढतात आणि जाणून बुजून एखाद्या धर्मातील लोकांना मतदानापासून दूर करण्याचे काम करत आहेत, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सत्ताधाऱ्याना लगावला आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुक 2024 (Lok Sabha Elections 2024) च्या पाचव्या टप्प्यासाठी देशात 49 जागांवर मतदान (Voting) सुरू झालंय. तर महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha Election 2024) 13 जागांवर आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातला हा मतदानाचा शेवटचा टप्पा असेल. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 जागांवर आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत. अशातच काही ठिकाणी मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने आवाहन करत मतदानापासून दूर ठेवण्याचा अथवा केवळ काही ठराविक पक्षाला मतदान करण्याचे सांगण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

मुद्दाम मतदानापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न   

आज मुंबईतल्या 6 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतल्या मुस्लिम समाजाने नोटाला मतदान करावं, असं आवाहन मुस्लिम सेवाभावी संस्थांनी केलं आहे. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काही लोक एखादा कागद काढतात आणि जाणून बुजून त्या धर्मातील लोकांना मतदानापासून दूर करण्याचे काम करतात, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्याना लगावला आहे. तर सध्या मोदी सरकारची जी तानाशाही सुरू झाली आहे, त्यापासून देशाला वाचविण्याकरिता आपल्याला मतदान करावे लागणार आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

राजकारणात जर-तर ला अर्थ नसतो 

राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांसोबत गेलो नसतो तर मी मुख्यमंत्री झालो असतो असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राजकारणामध्ये जर तर ला अर्थ नसतो. देशामध्ये जनतेचे महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न महत्वाचे आहेत. ते प्रश्न मांडायला पाहिजे आणि काँग्रेस ते प्रश्न रोखठोकपणे मांडत आली आहे.असेही नाना पटोले म्हणाले. शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये सत्तेतील भाजपने मागील 10 वर्षात विकास केला, असा आव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुळात कुठेही विकास न केल्यामुळे ते पटवून देण्यात अपयशी ठरले. भ्रष्टाचारी, तानाशाह व्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर, बेरोजगारी,  शेतकऱ्यांवरील अन्याय यावर  ना देशाचे पंतप्रधान बोलले, ना राज्याचे मुख्यमंत्री. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड आहे. ही चीड आता मतातून व्यक्त होईल, असेही नाना पटोले म्हणाले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे म्हणाले होते की, 2004 मध्ये प्रफुल पटेल हे भाजपाच्या वाटेवर होते.  त्यावेळी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करायचा होते, असं वक्तव्य केले होते. यावर नाना पटेल यांना विचारले असता ते म्हणाले की,  कोण मुख्यमंत्री झाला, कोण मंत्री झाला, कोणी किती उजेड पाडला हे महत्त्वाचं नाही. तर काँग्रेससाठी जनतेचे मत मुद्दे महत्त्वाचे आहेत.असे म्हणत या विषयावर अधिक बोलणे नाना पटोले यांनी टाळले आहे.

ज्यांना गरिबांची, शेतकऱ्यांची जाण नाही, असे जिल्ह्याचे नेते राहिलेत 

गोंदियाच्या बिरसी येथे नुकतेच विमानतळ बांधण्यात आले आहे. विमानतळावरून हे विमानतळ प्रफुल पटेल यांनी सामान्य जनतेसाठी नव्हे तर स्वतःसाठी बांधलं, अशी चर्चा सुरू असताना यावर नाना पटोले यांना विचारले असताना नाना पटोले म्हणाले की, ज्याला शेतकऱ्यांची आणि गरिबांची जाण नाही अशी लोक या जिल्ह्यांमध्ये नेते म्हणून राहिलेत आणि यामुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या जनतेवर अन्याय झाला आहे. मात्र, 4 जून नंतर आमचं सरकार आलं तर मी जातीने बिरसी विमानतळाच्या विषयाकडे लक्ष देणारा असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget