एक्स्प्लोर

ग्रामीण भागातील कामं रखडली, पालघरमध्ये प्रतिबंधित क्षेत्रात शिथिलता देण्याची नागरिकांची मागणी

पालघर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी प्रतिबंध क्षेत्र लागू होऊन 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच या भागात नव्याने रुग्ण न आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्रात शिथिलता देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

पालघर : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सहा ठिकाणी तर वसई विरार महानगर पालिका क्षेत्रात काही प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेनमेंट झोन) घोषित करण्यात आले होते. या क्षेत्रात आढळलेले रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राचा कालावधी 15 दिवसांच्या पार गेला आहे. तर पावसाळा जवळ येत असल्याने नागरिकांची घर दुरुस्ती, घर साकारणे तसेच इतर काम ही रखडली आहेत. त्यामुळे नियमांमध्ये शिथिलता देण्याची मागणी नागरिक करत आहेत.  मात्र आजवरच्या सर्वेक्षणातून संक्रमणाचा संसर्गाचा इतर ठिकाणी वाढणारा वेग पाहता सावधगिरीचा उपाय योजना म्हणून प्रतिबंधात्मक क्षेत्र अजूनही कायम ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून देण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही प्रतिबंधात्मक क्षेत्रांच्या अंतिम सर्वेक्षण सुरू आहे. त्यादरम्यान आजाराची लक्षणे आढळून न आल्यास प्रतिबंधात्मक क्षेत्र शिथिल करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. पालघर ग्रामीण जिल्ह्यात सध्या 13 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी बरे होऊन परतणाऱ्या रुग्णांचे 14 आणि 15 दिवसांचे घशाचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले असून त्यांचे अहवाल नकारात्मक आल्यानंतर अशा रुग्णांना घरी सोडून देण्यात येईल, असे सांगण्यात आले. सफाळे, उसरणी व काटाळे (तालुका पालघर) तसेच दसरापाडा (गंजाड), कासा व रानशेत— सारणी (तालुका डहाणू) अशा सहा ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत. तर वाडा शहर हा नवीन कंटेंटमेंट झोन तयार झाला आहे. यापैकी उसरणी, काटाळे व कासा येथील रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. इतर ठिकाणच्या रुग्णाला येत्या दोन दिवसांत घरी पाठवणे अपेक्षित आहे. या पैकी बहुतांश ठिकाणी प्रतिबंध क्षेत्र लागू होऊन 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच या भागात नव्याने रुग्ण न आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्रात शिथिलता देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. शिथिलता देण्यास अडचण काय? पालघर आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता कोरोना संसर्गाचा रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसरातील घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेंक्षण आणि पाहणी केली जाते. यावेळेला करोना संसर्गाची लक्षण असणारे काही रुग्ण आढळल्याचे दिसून आले. अशा प्रतिबंधित क्षेत्राच्या गावांमधील सर्वेक्षण आणि पाहणीदरम्यान अलगीकरणाच्या भीतीपोटी अनेकदा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संशयितांची माहिती दिली जात नाही.  या क्षेत्रातील स्वत:हून आजाराची लक्षणे सांगणाऱ्या रुग्णांची संख्या मर्यादित आहे. वसई-विरारमधील 27 ठिकाणची बंदी उठवली वसई विरार शहरातील रुग्णसंख्या ही मंगळवार संध्याकाळ पर्यंत १६० वर पोहोचली आहे. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वाढ होत आहे. सध्या शहरात ८८ प्रतिबंधीत क्षेत्रे आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण आढळला तो परिसर प्रतिबंधित केला जातो. तेथील दुकाने बंद केली जातात आणि नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई केली जाते. त्याच भागात दुसरा रुग्ण आढळला नाही तर साधारण १४ दिवसांनतर तेथील प्रतिबंधित क्षेत्र हटवले जाते. आजवर पालिकेने २७ ठिकाणीची प्रतिबंधित क्षेत्र हटविल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
Konkan Railway ratnagiri diva passenger: रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार, रोगापेक्षा इलाज भयंकर?
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार, रोगापेक्षा इलाज भयंकर?
Sushma Andhare: अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स
अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स
Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Accident News: भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 7 जणांचा मृत्यू
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 7 जणांचा मृत्यू
Sharad Ponkshe and Babasaheb Ambedkar: 'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
Narhari Zirwal : माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
Embed widget