एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांची बाजू मांडतांना जितेंद्र आव्हाडांनी माझा बाप काढला, चंद्रकांत पाटलांचा आरोप, आव्हाड म्हणाले...

जितेंद्र आव्हाड यांनी माझा बाप काढला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ही आपली संस्कृती नसल्याचे पाटील म्हणाले. मात्र, त्यांचा हा आरोप आव्हाडांनी फेटाळून लावला आहे.

मुंबई : मुख्यमंत्र्यांची बाजू मांडतांना जितेंद्र आव्हाड यांनी माझा बाप काढला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ही आपली संस्कृती नसल्याचे पाटील म्हणाले. मात्र, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांचा आरोप फेटाळून लावला आहे. मी जर चंद्रकांत पाटील यांचा बाप काढला असेल तर त्यांचे पाय धरुन माफी मागण्यास तयार असल्याचे आव्हाड म्हणालेत.


मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहणार का, याबाबत माहिती नाही. मी भविष्यकार नाही. आधी मी त्यांच्याजवळ होतो मात्र आता माहिती नाही. त्यांच्या हिताच्या दृष्टीने मी बोललो होतो की, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दुसऱ्याकडे द्यावा, असेही पाटील म्हणाले. मंत्री जितेंद्र आव्हाडांना  सेनेच्या जवळ जाऊन फाईल क्लिअर करायची असेल अशी खोचक टीका पाटील यांनी केली. अध्यक्षपदाची निवडणूक होईल का याबाबत माहिती नाही ,परंतू जर झाली तर बघू कोणाला संधी द्यायची ते ठरवू असे पाटील यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चार्ज दुसऱ्याकडे देत नाहीत, कारण त्यांना भीती वाटते. जर राष्ट्रवादी काँग्रेसला केलं तर ते महाराष्ट्र विकून टाकतील, असा टोलाही पाटील यांनी लगावला.


आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?

विरोधी पक्षाने मागण्या करणं, आंदोलन करणं, टीका करणं हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणं हे राजकीय प्रगल्भता नसल्याचं उदाहरण असल्याचे आव्हाड म्हणाले होते. कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अर्धा, पाऊण तास बोलत होते. असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांवर कोणत्याही विभागाची जबाबदारी नाही. ते संपूर्ण मंत्रीमंडळाचे नेते आहेत. जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवानामध्ये येणार आहेत. ते अधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानभवनात येऊन गेले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंदर्भात राज्यात संभ्रम निर्माण करणं किंवा चर्चा करणं चुकीचं आहे, असे देखील आव्हाड म्हणाले होते. आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का? आपली ती संस्कृती आहे का? आजारपण हे नैसर्गिक आहे. तो काय स्वत:हून नाटक करत नसतो. त्यामुळे या आजारपणाची चर्चा करणं हेच मुळात विकृतपणाचं, बालिशपणाचं लक्षण आहे,” अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Pune Rain Update : पुण्यात पावसाचा कहर! खडकवासला धरण तुडुंब भरलं; मुठा नदीपात्रात 28 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, भिडे पूल दिसेनासा झाला; मेट्रो खांबांनाही पुराचा वेढा
पुण्यात पावसाचा कहर! खडकवासला धरण तुडुंब भरलं; मुठा नदीपात्रात 28 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, भिडे पूल दिसेनासा झाला; मेट्रो खांबांनाही पुराचा वेढा
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Embed widget