एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांची बाजू मांडतांना जितेंद्र आव्हाडांनी माझा बाप काढला, चंद्रकांत पाटलांचा आरोप, आव्हाड म्हणाले...

जितेंद्र आव्हाड यांनी माझा बाप काढला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ही आपली संस्कृती नसल्याचे पाटील म्हणाले. मात्र, त्यांचा हा आरोप आव्हाडांनी फेटाळून लावला आहे.

मुंबई : मुख्यमंत्र्यांची बाजू मांडतांना जितेंद्र आव्हाड यांनी माझा बाप काढला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ही आपली संस्कृती नसल्याचे पाटील म्हणाले. मात्र, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांचा आरोप फेटाळून लावला आहे. मी जर चंद्रकांत पाटील यांचा बाप काढला असेल तर त्यांचे पाय धरुन माफी मागण्यास तयार असल्याचे आव्हाड म्हणालेत.


मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहणार का, याबाबत माहिती नाही. मी भविष्यकार नाही. आधी मी त्यांच्याजवळ होतो मात्र आता माहिती नाही. त्यांच्या हिताच्या दृष्टीने मी बोललो होतो की, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दुसऱ्याकडे द्यावा, असेही पाटील म्हणाले. मंत्री जितेंद्र आव्हाडांना  सेनेच्या जवळ जाऊन फाईल क्लिअर करायची असेल अशी खोचक टीका पाटील यांनी केली. अध्यक्षपदाची निवडणूक होईल का याबाबत माहिती नाही ,परंतू जर झाली तर बघू कोणाला संधी द्यायची ते ठरवू असे पाटील यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चार्ज दुसऱ्याकडे देत नाहीत, कारण त्यांना भीती वाटते. जर राष्ट्रवादी काँग्रेसला केलं तर ते महाराष्ट्र विकून टाकतील, असा टोलाही पाटील यांनी लगावला.


आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?

विरोधी पक्षाने मागण्या करणं, आंदोलन करणं, टीका करणं हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणं हे राजकीय प्रगल्भता नसल्याचं उदाहरण असल्याचे आव्हाड म्हणाले होते. कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अर्धा, पाऊण तास बोलत होते. असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांवर कोणत्याही विभागाची जबाबदारी नाही. ते संपूर्ण मंत्रीमंडळाचे नेते आहेत. जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवानामध्ये येणार आहेत. ते अधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानभवनात येऊन गेले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंदर्भात राज्यात संभ्रम निर्माण करणं किंवा चर्चा करणं चुकीचं आहे, असे देखील आव्हाड म्हणाले होते. आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का? आपली ती संस्कृती आहे का? आजारपण हे नैसर्गिक आहे. तो काय स्वत:हून नाटक करत नसतो. त्यामुळे या आजारपणाची चर्चा करणं हेच मुळात विकृतपणाचं, बालिशपणाचं लक्षण आहे,” अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : मविआच्या जागावाटपाआधीच ठाकरेंचे पत्ते ओपनAaditya Thackeray On Ashish Shelar :आशिष शेलारांना मेंटल कौन्सिलिंगची गरज,ठाकरे काय बोलले?Zero Hour : मुख्यमंत्रिपदावर शरद पवारांचं सूचक विधान, पवारांकडून अप्रत्यक्ष घोषणा?Zero Hour Guest Center : मविआचा 260 जागांचा तिढा सुटला, 20 ते 25 जागांचा तिढा कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक, 15 मतदारसंघातील उमेदवार ठरले; एबी फॉर्मही दिले?
शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक, 15 मतदारसंघातील उमेदवार ठरले; एबी फॉर्मही दिले?
Vasundhara Oswal : ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
Multiple Bomb Threats to Indian Flights : भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
Embed widget