एक्स्प्लोर

CAA Protest | परभणीत हिंसाचारप्रकरणी 50 जणांना अटक, राष्ट्रवादीच्या नगरसेवकावरही गुन्हा दाखल

परभणीतील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील हिंसक आंदोलनप्रकरणी 50 जणांना अटक करण्यात आली आहे. हिंगोलीतील कळमनुरी दगडफेक प्रकरणी 150 जनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर बीडमध्ये 31 जणांना अटक करण्यात आली असून 103 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परभणी : परभणीतील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं. या हिंसाचारप्रकरणी 50 जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि एमआयएमचे विधानसभा उमेदवार अली खान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन झाल्यापासून अली खान फरार आहे. राष्ट्रवादीनेही त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याप्रकरणी झालेल्या आंदोलनप्रकरणी नवा मोंढा, कोतवाली, नानल पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. तिन्ही पोलीस ठाण्यात अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दंगल घडवणे, शासकीय मालमत्तेचं नुकसान करणे, दगडफेक करणे इत्यादी कलमान्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यांनी कायदा हाती घेतला त्यांच्यावर कारवाई होणारच, असं परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितलं आहे.

CAA Protest | परभणीत हिंसाचारप्रकरणी 50 जणांना अटक, राष्ट्रवादीच्या नगरसेवकावरही गुन्हा दाखल राष्ट्रवादी नगरसेवक अली खान

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात परभणी, पूर्णा, मानवत, पालम शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. ईदगाह मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला. शिवाय पोलिसांवर दगडफेक सुरु केली. एवढंच नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालया समोरील घर, दुचाकी,ऑटो चारचाकी शिवाय अग्निशमन दलाची गाडीही काही आंदोलकांनी फोडली. यावेळी पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. मात्र आंदोलनकांनी केवळ पोलीस अधीक्षक कार्यालयच नाही तर नारायण चाळ, शिवाजी चौक आदी परिसरात ही दगडफेक करत नुकसान केलं आहे.

कळमनुरी दगडफेक प्रकरणी 150 जनांवर गुन्हे दाखल

हिंगोलीतील कळमनुरी येथील दगडफेक प्रकरणी 150 जनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एसटी बस, अग्निशमनदलाची गाडी, खाजगी वाहने व दुकानावर दगडफेक आणि पोलिसांवर दगडफेक करून सरकारी मलमतेचे नुकसान आणि हिंसाचार केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कळमनुरीमध्ये एसटी बस आणि खाजगी वाहनांची जमावाने तोडफोड केली होती. या टोळक्यांनी पोलिसांवर देखील दगडफेक केली आहे. त्यानंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला.

बीडमध्ये 31 जणांना अटक, 103 जणांवर गुन्हे दाखल

बीडमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. आज 31 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 103 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपींवर 307 अर्थात हत्या करण्याचा प्रयत्न असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. काल नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. मात्र काही लोकांनी अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बीडमधील आंदोलनाला गालबोट लागलं.

महत्त्वाच्या बातम्या

Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
Embed widget