एक्स्प्लोर

Breaking News LIVE : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी लाॅकडाऊनचा विचार नाही; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Breaking News LIVE : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी लाॅकडाऊनचा विचार नाही; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

Background

कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'केंट' संपूर्ण जगभरात पसरणार : ब्रिटनच्या वैज्ञानिकाचा दावा

 

ब्रिटनच्या एका वैज्ञानिकाने कोरोना व्हायरसबाबात मोठा दावा केला आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट केंट (Kent) संपूर्ण जगभरात पसरेल. यामुळे कोरोनव्हायरसविरुद्धची लढाई कमीत कमी दशकभर सुरु राहिल. ब्रिटनमधील जेनेटिक सर्विलिएन्स प्रोग्रामचे प्रमुखांनी सांगितलं की, "ब्रिटनच्या केंट परिसरात आढळलेला कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंटचा फैलाव जगभरात होण्याची शक्यता आहे. परिणामी कोरोना विषाणूविरुद्धची लढाई कमीत कमी दशकभर चालेल."



देशाची आक्रमकता टिकवणं महत्त्वाचं : लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे

 

देशाच्या सीमांवर सध्याच्या घडीला सुरु असणारी परिस्थिती आणि एकंदर वातावरण पाहता लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी गुरुवारी देशाची आक्रमता आणखी बळावण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं. लष्करप्रमुखांचं वक्तव्य अशा वेळी करण्यात आलं आहे, जेव्हा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं सैन्य पॅगाँग त्सोच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन मागे हटत असल्याची माहिती दिली.



उदयनराजेंकडून शरद पवारांची भेट घेण्यामागचं मूळ कारण उघड

 

राष्ट्रवादीतून काढता पाय घेतल्यानंतर शरद पवारांची भेट घेण्यासाठी भाजप खासदार उदयनराजे जाणार असल्याची माहिती समोर आली आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींची थेट दिल्लीत होणारी भेट अनेक चर्चांना वावही देऊन गेली. अखेर खुद्द उदयनराजे यांनीच भेटीनंतर त्यामागचं खरं कारण उघड केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपण शरद पवार यांच्या भेटीला आल्याचं उदयनराजे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. पवारांच्या दिल्लीती निवासस्थानी या भेटीदरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पवारांना भेटलात आता मोदींना भेटणार का, या प्रश्नावर हा विषय राजकारणाचा नाही असं म्हणत उदयनराजेंनी बगल देण्याचा प्रयत्न केला. ke

 

 

 

भांडुप परिमंडळात 28 हजार ग्राहकांची वीज तोडली

 

एकीकडे वाढीव वीज बिलामुळे सामान्य माणूस कर्ज काढण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे महावितरणने ग्राहकाकडून सक्तीने वीज बिलाची वसुली सुरू केली आहे. फक्त भांडुप परिमंडळ क्षेत्रात महावितरणने 28 हजार पेक्षा जास्त ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले आहेत.  महाराष्ट्रात असे लाखो ग्राहक आहेत ज्यांना अव्वाच्या सव्वा वीजबील सोपवण्यात आले आणि आता ते वीजबिल भरावे यासाठी सक्तीची वसुली केली जात आहे. गेल्या वर्ष भरात कोरोना संसर्गाची झुंजत असलेल्या सर्वसामान्य गरीब जनतेला महावितरणने मोठा शॉक दिला. त्यानंतर अधिक खोटी आश्वासने दिली गेली विरोधकांनी आंदोलने केली मात्र महावितरण काही मागे हटले नाही. महावितरणाच्या केवळ भांडुप परीमंडळामध्ये शनिवार पासून आतापर्यंत तब्बल 28 हजार ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्यात आलेली आहे.



 
20:26 PM (IST)  •  12 Feb 2021

लसीकरणानंतरही राज्यात रुग्ण संख्या वाढत असली तरी लाॅकडाऊनचा विचार नसल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लसीकरणानंतरही राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मात्र याबाबत कोरोनाच्या नियमांचं पालन करणं हाच एकमेव पर्याय आहे. मात्र राज्यात कुठेच पुन्हा लाॅकडाऊन लावण्याचा विचार नाही किंवा त्याचा संबंध पण नाही, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. त्याचबरोबर पहिला डोस आणि दुसऱ्या डोसमध्ये एका महिन्याचं अंतर पाहिजे आणि त्यानंतर पंधरा दिवस काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचंही टोपे यांनी म्हंटलं आहे.
21:11 PM (IST)  •  12 Feb 2021

पंतप्रधान अवास योजनेच्या घरकुलचे बिल काढण्यासाठी दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाची धाड ग्रामसेवकास रंगेहाथ पकडले. निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथील ग्रामसेवक वैजनाथ चाञे हे गावातील राम वामन बिरादार यांच्याकडून पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचे बिल आदा करण्यासाठी दोन हजाराची लाच मागितली व ती देताना लातूर येथील लाचलुचपत विभागाने गावच्या ग्राम पंचायत मध्ये रंगेहाथ पकडल्याची घटना घडली
19:28 PM (IST)  •  12 Feb 2021

ठाणे : मुंबई आणि आसपास राहणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना निदान शनिवार आणि रविवार या दोन दिवशी कोणत्याही वेळेच्या बंधनाशिवाय प्रवास करू द्यावा अशी मागणी विविध रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी अनेक कार्यालयांना सुटी असल्याने लोकांमध्ये पर्यायाने कमी गर्दी असते. त्यामुळे ही मागणी करण्यात आलेली आहे. त्याच सोबत पीक अवर असताना, सकाळच्या वेळेस सीएसएमटी वरून येणाऱ्या गाड्या असतात. त्यामुळे त्यामध्ये मच्छी विक्रेते दूध विक्रेते आणि विद्यार्थी यांना प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशीही मागणी प्रवासी महासंघाने केली आहे. तर ही मागणी मान्य झाली नाही तर मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिला आहे. मात्र एकीकडे मुंबईमध्ये covid-19 रुग्णांची संख्या वाढत असताना राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
19:43 PM (IST)  •  12 Feb 2021

चंद्रपूर : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत 2 बांधकाम मजुरांचा मृत्यू, चंद्रपूर-मूल मार्गावरील जानाळा फाट्यावरील घटना, अजयपूर येथून हे मजूर मारोडा या आपल्या गावी जात असताना झाला अपघात, प्रदीप मानकर (41) आणि विनोद मानकर (35) अशी मृतकांची नावं, अपघातानंतर ट्रकसह चालक फरार
17:56 PM (IST)  •  12 Feb 2021

सनदी अधिकाऱ्यांची बदली.. एस चोकलिंगम, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे यांची नियुक्ती महासंचालक, यशदा पुणे या पदावर. श्रावण हर्डीकर महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे यांची नियुक्ती नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर. राजेश पी पाटील (Odissa Cadre) आंतरराज्य प्रतिनियुक्तीने राज्य महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे या पदावर. शितल उगले-तेली यांची नियुक्ती संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर. प्रेरणा देशभ्रतार आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी वर्धा या पदावर अनिता पाटील भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमिअभिलेख, पनवेल यांची नियुक्ती सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर. एन के सुधांशु यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर नियुक्ती.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Congress : ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vanchit On Vidhan Sabha | वंचित बहुजन आघाडी सोलापुरातील सर्व जागा लढवणारNitesh Rane on MVA | स्वतःचं ठेवावं झाकून, दुसऱ्याच बघाव वाकून, नितेश राणेंची मविआवर टीकाBaba Siddiuqe Accused Shiva Gautam Mother | दोन महिन्यापूर्वी शिवा पुण्यात भंगार विकायचं काम करायचाMumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती
Congress : ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका
Rahul Gandhi on Nashik Agniveer : 'शहीद झाल्यानंतर भेदभाव का?', नाशिकमध्ये अग्निवीरांच्या बलिदानावर राहुल गांधींचा पीएम मोदींना सवाल
'शहीद झाल्यानंतर भेदभाव का?', नाशिकमध्ये अग्निवीरांच्या बलिदानावर राहुल गांधींचा पीएम मोदींना सवाल
Baba Siddiqui Murder case : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील मोठी अपडेट समोर, चौथ्या आरोपीची ओळख पटली
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील मोठी अपडेट समोर, चौथ्या आरोपीची ओळख पटली
Baba siddique News : सिद्दीकी हत्या प्रकरण; शुभम लोकणरला शोधण्यासाठी क्राईम ब्रांचची टीम पुण्यात
Baba siddique News : सिद्दीकी हत्या प्रकरण; शुभम लोकणरला शोधण्यासाठी क्राईम ब्रांचची टीम पुण्यात
Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील हरियाणातील शूटरची भयंकर कहाणी समोर; कारनामे पाहून घरच्यांचा सुद्धा थरकाप
बाबा सिद्दीकी हत्याकांडातील हरियाणातील शूटरची भयंकर कहाणी समोर; कारनामे पाहून घरच्यांचा सुद्धा थरकाप
Embed widget