एक्स्प्लोर

आम्हाला त्याकाळी निवडणुकीसाठी उमेदवार मिळाले आणि त्यांचे डिपॉझिट वाचले की आम्हाला आनंद व्हायचा : राम नाईक

अटलजी-अडवाणींची भाजप आणि मोदी-शाहांची भाजप यामध्ये फक्त पिढीचे अंतर आहे. मात्र वैचारिक भूमिका मात्र एकच आहे. तत्व महत्वाचे आहे आणि ते तत्व दोन्ही पिढीमध्ये एकच आहे, असे नाईक म्हणाले.

मुंबई : आम्ही जनसंघापासून काम सुरु केलं. जनसंघ त्यावेळी अगदी मिणमिणता दिवा होता. 1968 साली मी पूर्णवेळ काम करायचं ठरवलं. मी त्यावेळी संघटनमंत्री होतो. त्यावेळी आम्हाला उमेदवार मिळत नसायचे. उमेदवार मिळाले आणि त्यांचे डिपॉझिट वाचले तरी आम्हाला आनंद व्हायचा, असे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी संघटनमंत्री असताना स्कुटरवरून फिरायचो. पूर्ण मुंबई त्यावेळी पिंजून काढायचो. अशा स्थितीतून आज जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष झालाय. याचा खूप आनंद आहे, असे नाईक म्हणाले. नाईक म्हणाले की, भाजपचं वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे संघटना आहे. ही संघटना विचारावर आधारित आहे. हरलो तरी विचारांसाठी हरलो आणि जिंकलो तरी उन्माद नाही, अशी विचारधारा असल्याने पक्ष मोठा झाला. इथं काम करण्याचा आनंद म्हणजे विचारधारेमुळे जास्त येतो. विचारांमुळे ताकद येते. आमच्या जुन्या नेत्यांचे विचार आमच्यात आहेत. त्या विचारांची ताकत अजूनही भाजपमध्ये आहे.  काँग्रेसमधील अशी ताकत कमी झाली. त्यामुळे काँग्रेसची आज ही अवस्था झाली आहे, असेही ते म्हणाले. अटलजी-अडवाणींची भाजप आणि मोदी-शाहांची भाजप यामध्ये फक्त पिढीचे अंतर आहे. मात्र वैचारिक भूमिका मात्र एकच आहे. तत्व महत्वाचे आहे आणि ते तत्व दोन्ही पिढीमध्ये एकच आहे, असे नाईक म्हणाले. मी भाजप अनुशासन समितीचा अध्यक्ष असताना वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उमा भारती आणि मदनलाल खुराणा यांची हकालपट्टी केली होती. साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर कारवाई न झाल्याबाबत विचारले असता नाईक म्हणाले की, हा पिढीमधील फरक आहे. पिढीमध्ये काही बदल होत असतात. पक्षात अनुशासन आहे. परंतु हे सगळं होत असताना आपली दिशा योग्य असावी, असेही ते म्हणाले. माझ्यावर मंत्री असताना काही आरोप केले गेले. मात्र ते सिद्ध होऊ शकले नाहीत. माझ्या विरोधात आरोप झाल्यानंतर मी व्यथित झालो होतो. मात्र मी घाबरलो नव्हतो. अटलजी आणि सगळेजण माझ्या मागे उभे होते. त्यावेळी कारगिल युद्धात आपले खूप जवान शहीद झाले होते. त्यावेळी मी शहीदांच्या परिवारांना पेट्रोलपंप आणि गॅस एजन्सी दिल्या. या निर्णयाचं खूप कौतुक झालं, असे ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!Tanaji Sawant PC on Son Kidnapping| घरात वाद, चार्टर प्लेन, मुलगा कुठं गेला? तानाजी सावंत म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
Embed widget