एक्स्प्लोर

कोकणवासीयांना घरी येण्याची परवानगी द्या; भास्कर जाधव यांची सरकारला विनंती

लॉकडाऊनमुळे अनेक कोकणवासी मुंबईत अडकून पडले आहेत. त्यांना घरी येण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

रत्नागिरी : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्यामुळे पुन्हा 19 दिवसांचा लॉकडाऊन घेतला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत कोकणातील अनेक चाकरमाने काम करतात. मात्र, आता लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकले आहेत. देशातील महामार्गावरील जिल्हाअंतर्गत सीमाही बंद करून येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने वाहतूकीचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना गावी जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

शिमगोत्सवात मोठ्या प्रमाणावर कोकणात चाकरमानी दाखल होतात. मात्र, लॉकडाऊमुळे आता कुणाची आई; तर कुणाचे भाऊ कामानिमित्त मुंबईला गेल्याने ते गावी परतण्याचे मार्गही बंद झालेत. अशा वेळेस भास्कर जाधव यांनी सरकारकडे मागणी केली आहे. माझ्या कोकणातील रोजीरोटी निमित्त मुंबई गेलेले चाकरमानी कोकणात परत येण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी. मुंबईत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून लोक रोजीरोटीच्या निमित्ताने गेलेले आहेत. त्यांच्यात कोकणातील लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. मुंबईमधली आजची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीपासूनच मी सांगत आलोय कोकणातील लोकांना कोकणामध्ये येउद्या. तीथे गावामध्ये त्यांची घरे आहेत. त्यांना मोकळा श्वास घेता येइल. अजूनही वेळ गेलेली नाही, अशी विनंती भास्कर जाधव यांनी केली.

केंद्राचा सुधारित आदेश | देशात आजपासून अटींसह 'ही' दुकानं उघडण्याची सूट

तपासणी करुन कोकणवासीयांना घरी सोडा राज्य सरकारने एसटी पाठवून या चाकरमान्यांना त्यांच्या घरी पोहचावे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसाठी एका बसमध्ये केवळ 30 प्रवासी आणावे. या नागरिकांच्या कोरोना चाचणी केल्यानंतरच त्यांना त्यांच्या घरी सोडवावे. जर, घरामध्ये जाण्याची सरकारची परवानगी नसेल तर शाळेत त्यांना क्वॉरंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात येईल. एसटीने यांना कोकणात आणलं तर त्यांची तपासणी करणे सोपं होईल. मात्र, खासगी वाहनांनी आणलं तर त्यांच्यावर नियंत्रण करणं अवघड असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. ज्या ठिकाणाहून हे प्रवासी निघतील तिथे यांची तपासणी करण्यात येईल आणि ती एसटी ज्या गावातील असेल त्याच्या सीमेवर थांबून त्यांची तपासणी आपण करुया. हे सहज सोपे होइल. आजही कोरोना वाढण्याची भिती वाढत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. कोकणातील लोकांना कोकणात येउद्या, अशी मागणी माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

Amit Deshmukh | कोरानाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग कोणती पावलं उचलतोय? वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी बातचीत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prajakt Tanpure : अखेर प्राजक्त तनपुरे यांच ठरलं, भाजपमध्ये प्रवेश करणार; फेसबुक प्रोफाईलला मामा जंयत पाटलांचा फोटो लावत भावनिक संदेश
अखेर प्राजक्त तनपुरे यांच ठरलं, भाजपमध्ये प्रवेश करणार; फेसबुक प्रोफाईलला मामा जंयत पाटलांचा फोटो लावत भावनिक संदेश
Sunil Tatkare : फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
मोठी बातमी! हितेंद्र ठाकूरांना न भेटताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; बविआ अन् शिवसेनेतील चर्चेला पूर्णविराम
मोठी बातमी! हितेंद्र ठाकूरांना न भेटताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; बविआ अन् शिवसेनेतील चर्चेला पूर्णविराम
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'

व्हिडीओ

Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs GT Qualifier 1 Live Update : फायनलचं तिकीट कोणाला? क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने जिंकला टॉस अन् बंगळुरूसमोर टाकली गुगली
RCB vs GT Qualifier 1 Live Update : फायनलचं तिकीट कोणाला? क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने जिंकला टॉस अन् बंगळुरूसमोर टाकली गुगली
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
Mudra Loan : केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
Dombivli Scam : तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
Eknath Shinde and BJP: भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
Embed widget