एक्स्प्लोर

कोकणवासीयांना घरी येण्याची परवानगी द्या; भास्कर जाधव यांची सरकारला विनंती

लॉकडाऊनमुळे अनेक कोकणवासी मुंबईत अडकून पडले आहेत. त्यांना घरी येण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

रत्नागिरी : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्यामुळे पुन्हा 19 दिवसांचा लॉकडाऊन घेतला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत कोकणातील अनेक चाकरमाने काम करतात. मात्र, आता लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकले आहेत. देशातील महामार्गावरील जिल्हाअंतर्गत सीमाही बंद करून येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने वाहतूकीचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना गावी जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

शिमगोत्सवात मोठ्या प्रमाणावर कोकणात चाकरमानी दाखल होतात. मात्र, लॉकडाऊमुळे आता कुणाची आई; तर कुणाचे भाऊ कामानिमित्त मुंबईला गेल्याने ते गावी परतण्याचे मार्गही बंद झालेत. अशा वेळेस भास्कर जाधव यांनी सरकारकडे मागणी केली आहे. माझ्या कोकणातील रोजीरोटी निमित्त मुंबई गेलेले चाकरमानी कोकणात परत येण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी. मुंबईत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून लोक रोजीरोटीच्या निमित्ताने गेलेले आहेत. त्यांच्यात कोकणातील लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. मुंबईमधली आजची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीपासूनच मी सांगत आलोय कोकणातील लोकांना कोकणामध्ये येउद्या. तीथे गावामध्ये त्यांची घरे आहेत. त्यांना मोकळा श्वास घेता येइल. अजूनही वेळ गेलेली नाही, अशी विनंती भास्कर जाधव यांनी केली.

केंद्राचा सुधारित आदेश | देशात आजपासून अटींसह 'ही' दुकानं उघडण्याची सूट

तपासणी करुन कोकणवासीयांना घरी सोडा राज्य सरकारने एसटी पाठवून या चाकरमान्यांना त्यांच्या घरी पोहचावे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसाठी एका बसमध्ये केवळ 30 प्रवासी आणावे. या नागरिकांच्या कोरोना चाचणी केल्यानंतरच त्यांना त्यांच्या घरी सोडवावे. जर, घरामध्ये जाण्याची सरकारची परवानगी नसेल तर शाळेत त्यांना क्वॉरंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात येईल. एसटीने यांना कोकणात आणलं तर त्यांची तपासणी करणे सोपं होईल. मात्र, खासगी वाहनांनी आणलं तर त्यांच्यावर नियंत्रण करणं अवघड असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. ज्या ठिकाणाहून हे प्रवासी निघतील तिथे यांची तपासणी करण्यात येईल आणि ती एसटी ज्या गावातील असेल त्याच्या सीमेवर थांबून त्यांची तपासणी आपण करुया. हे सहज सोपे होइल. आजही कोरोना वाढण्याची भिती वाढत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. कोकणातील लोकांना कोकणात येउद्या, अशी मागणी माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

Amit Deshmukh | कोरानाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग कोणती पावलं उचलतोय? वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी बातचीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : आगामी येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
आगामी येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
Ajit Pawar: धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार 10 मिनिटांत उठून गेले
धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण अजितदादा मंत्रिमंडळ बैठकीतून 10 मिनिटांत उठून गेले
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 11 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaManoj Jarange Dasara Melava : जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी 200 एकरवर पार्किंगVidarbha Vidhansabha Election : विदर्भात काँग्रेसच्या जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावाABP Majha Headlines : 9 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : आगामी येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
आगामी येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
Ajit Pawar: धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार 10 मिनिटांत उठून गेले
धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण अजितदादा मंत्रिमंडळ बैठकीतून 10 मिनिटांत उठून गेले
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
"मी माझ्या बायकोला 'या' सुपरस्टारसोबत बेडरुममध्ये रंगेहात पकडलं"; सेलिब्रिटीचा आत्मचरित्रात खळबळजनक दावा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Embed widget