व्यभिचारी असल्याचा आरोप करत बलात्कार पीडितेला गावबंदी, बीडमधील तीन गावांचा संतापजनक ठराव
बलात्कार पीडित महिलेवर व्यभिचारी असल्याचा ठपका ठेवत तीन गावांनी तिच्यासह कुटुंबाला हद्दपार करण्याचा ठराव मंजूर केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राची लक्तरं वेशीवर टांगल्याची घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली आहे.

बीड : पुरोगामी महाराष्ट्राची लक्तरं वेशीवर टांगल्याची घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली आहे. बलात्कार पीडित महिलेवर व्यभिचारी असल्याचा आरोप करत पाचेगाव, जयराम तांडा आणि वसंतनगर तांडा या तीन गावांनी तिच्यासह कुटुंबाला हद्दपार करण्याचा ठराव घेतला आहे. एवढंच नाही तर गावकऱ्यांनी या महिलेविरोधात बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातसमोर ठिय्या दिला.
ही महिला गावकऱ्यांना त्रास देते, ती व्यभिचारी आहे, असा आरोप करत तीन गावांनी बलात्कार पीडित महिलेसह तिच्या कुटुंबाविरोधात हद्दपारीचा ठराव मंजूर केला. अत्याचार पीडित महिलेला आधार देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला हद्दपार करण्याचा निर्णय या गावांनी घेतला. या अमानवीय घटनेनंतर सामाजिक स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
2015 मध्ये गावातील चार नराधमांनी संबंधित महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर न्यायालयाने या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली णि हेच गावकर्यांच्या जिव्हारी लागलं जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर गावातून या पीडित महिलेला त्रास सुरू झाला जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला कहर म्हणजे ग्रामसेवक सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या महिलेचा वागणुकीवर संशय घेत गावातून हाकालण्याचा आणि तडीपार करण्याचा ठराव 15 ऑगस्ट ला घेतलाय।।
यानंतर न्यायालयीन लढा देत आपल्या तक्रारीवर ठाम राहून महिलेने चारही दोषींना जन्मठेपेपर्यंत पोहोचवलं. पण हीच गोष्ट गावकऱ्यांच्या जिव्हारी लागली. या महिलेला गावातच त्रास सुरु झाला. तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला. कहर म्हणजे ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तिच्या वागणुकीवर संशय घेत 15 ऑगस्ट रोजी तिला गावातून हाकलण्याचा ठराव मंजूर केला. आश्चर्य म्हणजे म्हणजे ज्या ग्रामपंचायतींनी गावबंदीचा ठराव मंजूर केला त्या तिन्ही गावांच्या सरपंच या महिलाच आहेत.
ही महिला सध्या पाचेगावमध्येच राहते. बलात्कार प्रकरणातील चारपैकी दोन आरोपी जयराम तांडा आणि वसंतनगर तांडा इथे होते. त्यामुळे पाचेगावसह इतर दोन गावात सुद्धा या महिलेला राहायला जागा मिळू नये यासाठी तिन्ही गावांनी हद्दपारीचा ठराव मंजूर केला.
या प्रकरणामध्ये पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. पण ज्या ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर केला, त्याची आता जिल्हा परिषदेकडून तपासणी होणार आहेत. त्यानंतर ठराव कोणत्या परिस्थितीत आणि कसे मंजूर केले याची भविष्यामध्ये चौकशी होऊ शकते.
महिलेविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दरम्यान पाण्याच्या कारणावरुन महिलेने मागील आठवड्यात गावातील ग्रामपंचायत सदस्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. यावरुन कर्मचाऱ्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तर महिलेविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून तिला अटक करण्याची मागणी गावकरी करत आहेत.
Before You Go
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
महत्त्वाच्या बातम्या























