एक्स्प्लोर

सरकारचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका करताना ओबीसी आरक्षण, अतिवृष्टीतील मदत, मुख्यमंत्र्यांची प्रकृती, भास्कर जाधव यांचे वक्तव्य अशा विविध विषयांवर भाष्य केले.

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवडणूक नियम बदलून घेण्याची महाविकास आघाडीवर वेळ आली आहे. गुप्त मतदान झाले तर सरकारमधील आमदार आपला असंतोष दाखवतील याची सरकारला भीती आहे. राज्य सरकार घाबरलेलं आहे. सरकारचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही, अशी घणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर केली आहे. 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका करताना ओबीसी आरक्षण , अतिवृष्टीतील मदत, मुख्यमंत्र्यांची प्रकृती, भास्कर जाधव यांचे वक्तव्य अशा विविध विषयांवर भाष्य केले. विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासठी होणाऱ्या निडणुकीत राज्य सरकारने केलेल्या बदलावरून फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये असंतोष आहे. गुप्त मतदान घेतले तर ते आपला असंतोष मतदानातून दाखवून देतील. त्यामुळे राज्य सरकार घाबरले आहे. या भीतीमुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बदल करण्यात आले आहेत अशी टीका यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नसेल तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही, भाजपचा त्यावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही. परंतु, ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नसतील तर एखाद्या मंत्र्याकडे त्यांनी आपला चार्ज द्यावा"  

शेतकऱ्यांची वीज तोडण्याचं काम राज्य सरकारकडून केलं जात आहे. वीज तोडल्याले राज्यातील अनेक गावे अंधारात आहेत. असे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यात अतिवृष्टी होवून खूप मोठा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्याप नुकसानग्रस्तांना मदत मिळाली नाही. राज्य सरकार फक्त जनतेची दिशाभूल करत आहे. राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला अशी सरकारची स्थीती झाली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

भास्कर जाधव यांचं वक्तव्य लज्जास्पद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 लाख रूपये देणार असे कधीही म्हटलेलं नाही. परंतु, भास्कर जाधव यांनी त्यांची नक्कल करून आक्षेपार्ह वक्तव्य केले. भास्कर जाधव यांचं वक्तव्य आक्षेपार्ह आणि लज्जास्पद आहे. पंतप्रधानांची नक्कल करणं आणि आक्षेपार्ह
वक्तव्य करणं सहन केलं जाणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला. 

... तर ओबीसी आरक्षण टीकले असते
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरूनही राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ओबीसी आयोगाला आधीच पैसे दिले असते तर आरक्षण टिकले असते. आरक्षण रद्द झाल्यावर पैसे देणे म्हणजे वराती मागून घोडा, अशी टीका फडणवीस यांनी केली. 

Devendra Fadnavis : राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी महाविकास आघाडीची परिस्थिती : फडणवीस

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget