एक्स्प्लोर

Aditya Thackeray : आंतरवालीच्या आंदोलनावर लाठीचार्जचा आदेश देणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल

आंतरवाली सराटीत जेव्हा पहिल्यांदा लाठीचार्ज झाला,हा आदेश देणारे जनरल डायर कोण आहेत?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. जेव्हा लाठीचार्ज झाला होता, जेव्हा पहिल्यांदा लाठीचार्ज झाला, डोकी फुटली होती, गोळीबारही झाला होता. मूळ गोष्ट हीच आहे की, अशी आंदोलनं उठवायची असतील, तर पोलीस कुठल्याही आदेशाशिवाय करत नाहीत. तेव्हा पण मी प्रश्न विचारला होता की, हा आदेश देणारे जनरल डायर कोण आहेत. एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री यामधील जनरल डायर कोण आहे, याचं उत्तर मिळायला हवं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आदित्य ठाकरे म्हणाले की, मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होईलच. मात्र ज्यावेळी याची सुरुवात झाली त्यावर आपण बोलायला हवं, ज्यावेळी आंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला होता. अनेकांना  जखमा झाल्या. उपोषणाला बसलेल्या पहिल्या दिवसापासून सगळा प्रकार सुरु आहे. ज्यावेळी लाठीचार्ज झाला त्यावेळी इंडिया आघाडीची बैठक सुरु होती. एखाद्या ठिकाणी लाठीचार्ज झाला तर त्या परिसरातील पोलीस प्रशासनाची बदली केली जाते. तसं एसपींची बदली केली. मात्र एवढी मोठी आंदोलनं करण्यासाठी पोलिसांनाो आदेशाची गरज असते.  त्यांना आदेश देणारे जनरल डायर कोण आहेत? हे आपल्याला समजायला हवं. या घटनाबाह्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. कधीही आदेशाशिवाय आंदोलन उठवत नाही. त्यामुळे या संदर्भातील जनरल डायर नेमके मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री आहे, याचा शोध घेतला पाहिजे. 

मनोज जरांगे पाटीलआक्रमक; मुंबईकडे रवाना

मनोज जरांगे पाटीलआक्रमक झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची गंभीर टीका केल्यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा कार्यकर्ते जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर आंदोलन करण्याची जरांगेंची भूमिका असून ते उपोषण स्थळ सोडून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.  मी तुझ्या सागर बंगल्यावर येतो, निघालो मी असं म्हणत जरांगेंनी मुंबईची वाट धरली आहे. उपोषणामुळे जरांगेची प्रकृती खालावली आहे. अशक्तपणामुळे त्यांना नीट चालताही येत नाही. पण, तरीही जरांगे मुंबईला सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम आहेत. गावकरी आणि मराठा कार्यकर्ते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे

 

इतर महत्वाची बातमी-

Maratha Reservation : सलाईनमधून विष देण्याचा, माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव; मनोज जरांगे पाटलांचे गंभीर आरोप

 
 
 
 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Jalgaon Crime News : ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळून संपवलं; अपघाताचा बनावही रचला, पण अखेर बिंग फुटलं अन् अमृतसरच्या आरोपीला जळगावमधून उचललं
ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळून संपवलं; अपघाताचा बनावही रचला, पण अखेर बिंग फुटलं अन् अमृतसरच्या आरोपीला जळगावमधून उचललं
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget