एक्स्प्लोर

बेळगावमध्ये का साजरा केला जातो हुतात्मा दिन? 17 जानेवारी 1956 ला नेमकं काय घडलं होतं? 

सीमालढ्याच्या इतिहासात 17 जानेवारी 1956 रोजी एक महत्त्वाची घटना घडली होती. याच दिवशी केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आणि.....

बेळगाव : गेल्या 65 वर्षांपासून सुरु असलेल्या सीमालढ्याच्या इतिहासात 17 जानेवारी या दिवसाला महत्व आहे. 17 जानेवारी 1956 रोजी बेळगावमध्ये सीमालढ्यासाठी आंदोलन करणाऱ्या पाच आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मे झाले. त्यामुळे आजचा दिवस हा सीमाभागात हुतात्मा दिवस साजरा केला जातो. 

हुतात्मा दिनाचा इतिहास काय आहे? 
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मीती झाली खरं, पण याच वेळी बेळगाव, कारवार, बिदर सह मराठी भाषकांचा सीमाभाग हा कर्नाटकाला जोडण्यात आला. सुरुवातीपासून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अग्रेसर असलेल्या बेळगावातील जनतेला आजही त्यांच्या हक्कांसाठी, मागणीसाठी लढा द्यावा लागत आहे. बेळगावसह सीमाभाग हा तत्कालीन म्हैसूर प्रांताला जोडण्यात आल्यानंतर बेळगावात या विरोधात मोठं आंदोलन झालं. या आदोलनाच्या वेळी 17 जानेवारी 1956 रोजी चार आणि दुसऱ्या दिवशी एक अशा पाच हुतात्म्यांना पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडावं लागलं होतं. 

भाषावार प्रांतरचनेचा इतिहास काय आहे? 
भारतात भाषावार प्रांतरचनेचा इतिहास हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. 1920 साली नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या विशेष आंदोलनामध्ये महात्मा गांधींनी भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा मांडला होता आणि तो मान्य करुन घेतला होता. 

स्वातंत्र्यानंतर भाषावार राज्यांची मागणी होऊ लागली. यामध्ये सर्वप्रथम 1953 साली आंध्र प्रदेशची निर्मिती झाली. याच धर्तीवर संपूर्ण मराठी राज्याची निर्मिती करावी अशी मागणी महाराष्ट्रातून होत होती. अशीच मागणी देशातील इतरही भागांतून होत होती. त्यामुळे 1953 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती केली. या आयोगात फाजल अली, हृदयनाथ कुंजरू आणि एम. के. पणिकर असे तिघेजण होते.

भाषावार प्रांतरचना करण्यासाठी नेमण्यात आलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल स्वीकारण्याचा निर्णय 16 जानेवारी 1956 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी जाहीर केलं. या आयोगाने केलेल्या सूचनेमध्ये मुंबई द्वैभाषिक राज्य करण्याची सूचना होती. तर  बेळगावसह संपूर्ण सीमाभाग त्या वेळच्या म्हैसूर म्हणजे आताच्या कर्नाटकला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात सीमाभागातील मराठी जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला. त्याचे पडसाद हे बेळगावमध्ये उमटू लागले. 17 जानेवारी 1956 रोजी सकाळपासूनच व्यापारी पेठा ठप्प झाल्या. ठिकठिकाणी लोक रस्त्यावर येऊ लागले आणि बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देऊ लागले. 

रस्त्यावर उतरलेला जमाव केंद्र सरकारच्या विरोधात जास्तच आक्रमक झाला होता. त्यामुळे या जमावाला पांगवण्यासाठी म्हैसूर प्रांतातील पोलिसांना गोळीबाराचे आदेश देण्यात आले. पोलिसांच्या या गोळीबारात चार जण आंदोलक हुतात्मे झाले. तर दुसऱ्या दिवशी निपाणीत एक महिला पोलिसांच्या गोळीबारात शहीद झाली.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जे 107 हुतात्मे झाले त्यापैकी पाच हुतात्मे हे बेळगाव जिल्ह्यातील या घटनेमधील आहेत. तेव्हापासून 17 जानेवारी हा दिवस सीमाभागात हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सीमालढ्यामध्ये शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते. 

बेळगावसह सीमाभागातील जनतेने हा सीमालढा गेल्या 65 वर्षांपासून धगधगता ठेवला आहे. आजही या भागातील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Embed widget