'सामना'त रिफायनरीची जाहिरात, कोकणातील राजकारण पुन्हा तापलं
सामनाच्या कोकण आवृत्तीमध्ये रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊस कोकणवासियांच्या उन्नतीसाठी अशी जाहिरात देण्यात आली आहे. त्यावरून आता मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्प रद्द केल्याचं शिवसेनेनं सांगितलं आहे. त्यानंतर देखील आता सामनामध्ये रिफायनरीच्या समर्थनार्थ जाहीरात देण्यात आली आहे.

रत्नागिरी : नाणार प्रकल्प रद्द झाला असं शिवसेना सांगत असली तरी नाणार प्रकल्पावरून कोकणातलं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. त्याला कारणीभूत ठरलं आहे ते सामना वृत्तपत्रात आलेल नाणार समर्थनाची जाहीरात. सामनाच्या कोकण आवृत्तीमध्ये रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊस कोकणवासियांच्या उन्नतीसाठी अशी जाहिरात देण्यात आली आहे. त्यावरून आता मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्प रद्द केल्याचं शिवसेनेनं सांगितलं आहे. त्यानंतर देखील आता सामनामध्ये रिफायनरीच्या समर्थनार्थ जाहीरात देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी सामनामध्ये जाहीरात देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय? असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान, नाणार व्हावा यासाठी आता भाजपसह शिवसेनेतील देखील काही कार्यकर्ते आणि नेते नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. त्यामुळे नाणार पुन्हा येणार की कायमचा हद्दपार होणार हे पाहावं लागणार आहे.
काय म्हणाले विनायक राऊत नाणारला आमचा विरोध कायम आहे. सामना हे जरी शिवसेनेचं मुखपत्र असलं तरी ते वृत्तपत्र आहे. इतर वृत्तपत्रांतील जाहिरातींप्रमाणे सामनामध्ये देखील जाहिरात आली. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताा दिली.
शिवसेना नेते कार्यकर्ते आग्रही आम्ही लोकांसोबत आहोत. त्यामुळे नाणार कोणत्याही परिस्थितीत होणार नाही अशी भूमिका शिवसेना अर्थात उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. त्यानंतर नाणार रद्द झाल्याची अधिसुचना देखील काढली गेली. पण, आता काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते हे नाणार व्हावा यासाठी आग्रही झाले आहेत. कोकणात सध्या भातशेती, आंबा, काजू वातावरणामुळे चांगलं उत्पादन आता देत नाहीत. शिवाय, कोकणातील तरूण हा मोठ्या प्रमाणावर गाव सोडून शहरांकडे वळतोय. उद्योगांअभावी कोकणचा विकास देखील रखडला आहे. नाणार, आंबोळगड, जैतापूरसारखे प्रकल्प आल्यास कोकणचा विकास होईल असं म्हणत आता नाणारचं समर्थक केलं जात आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते देखील अग्रक्रमावर आहेत.
फडणवीसांचं ते विधान लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना - भाजपनं एकत्र येत नाणार रद्द करत असल्याचं सांगितलं होतं. उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी देखील जमिन अधिग्रहणाची अधिसुचना रद्द केली होती. पण, राजापूर येथे आले असता तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाणार समर्थनाची भूमिका असल्याचं विधान केलं होतं.
शिवसेनेची नेमकी भूमिका काय? आम्ही स्थानिकांसोबत असा दावा कायम शिवसेनेकडून केला जात आहे. पण, शिवसेनेचा उघडपणे होत असलेला विरोध काही प्रमाणात मावळताना होताना दिसत आहे. शिवाय, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते देखील नाणारसाठी आग्रही दिसून येत आहेत. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय? असा सवाल केला जात आहे.
संबंधित बातम्या :
नाणार रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने शिवसेना नाराज
रत्नागिरीत नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा, भाजपचा पाठिंबा
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
महत्त्वाच्या बातम्या






















