एक्स्प्लोर
Advertisement
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेची ‘जन आशीर्वाद यात्रा’, शुक्रवारपासून महाराष्ट्र पिंजून काढणार
येत्या काळात आदित्य ठाकरे शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतो त्याचं पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांच्यासाठी महत्तावाचा असणार आहे.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीची शिवसेनेच्यावतीने जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्राभर ‘जन आशिर्वाद यात्रा’ काढण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आदित्य संवाद’नंतर शिवसेनेचं दुसरं महत्वाचं पाऊल आहे.
Aditya Thackeray | दिशा पाटनीच्या प्रश्नाला उत्तर देण्यास नकार, आदित्य ठाकरेंनी जोडले हात | ABP Majha
“ज्यांनी मत दिले आहे, त्यांचे आभार मानायचे आहेत, तर ज्यांनी नाही दिली, त्याची मनं जिंकायची आहे” या मथळ्याखाली या जन आशिर्वाद यात्रेचं आयोजन करण्यासत आलं आहे. शुक्रवारपासून आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार असून घराघरात पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे. येत्या काळात आदित्य ठाकरे शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतो त्याचं पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांच्यासाठी महत्तावाचा असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याआधीच महाराष्ट्रात विकास यात्रा जाहिर केली आहे. ऑगस्ट महिन्यात फडणवीस ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ ही विकास यात्रा काढणार आहेत. भाजप आणि शिवसेना दोघेही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार असल्याने या दोन्ही यात्रांना राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.
संबंधित बातम्या
मुंबईत येत्या काळात 500 इलेक्ट्रीक बेस्ट बस सुरु होणार : आदित्य ठाकरे
डिनर डेटवर गेलेल्या आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीचा वाढदिवसही एकाच दिवशी!
"मी निवडणूक लढवावी की नाही याचा निर्णय उद्धव साहेब घेतील," : आदित्य ठाकरे
माझ्या राजकीय निर्णयापेक्षा दुष्काळ निवारण महत्त्वाचे- आदित्य ठाकरे
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement