एक्स्प्लोर

21 November In History : संयुक्त महाराष्ट्र चळवळीला सुरुवात, भारत-चीन युद्धाला पूर्णविराम; आज इतिहासात...

Today in History : आज म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील पहिले 15 आंदोलक आजच्या दिवशी हुतात्मा झाले.

On This Day : आज म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्या दिवशी शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांनी ग्रामोफोनचा शोध लावला. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी संयुक्त महाराष्ट्रासाठी पुकारलेल्या शांततामय आंदोलनावर तत्कालीन मुंबई सरकारने लाठीमार करत गोळीबार केला. यामध्ये 15 आंदोलकांनी प्राण गमावले. 


1877: ग्रामोफोनचा शोध लागला

1877 मध्ये थॉमस एडिसन यांनी जगातील पहिला फोनोग्राफ बनवला. या फोनोग्राफमध्ये आवाज रेकॉर्ड करून आणि नंतर एकला जाऊ शकत होता. हा एक अपघाती शोध होता. एडिसन हे टेलिग्राफ आणि टेलिफोनशी संबंधित शोध लावत होते. कागदाच्या टेपवर संदेश रेकॉर्ड करण्यासाठी आणि नंतर ते टेलीग्राफद्वारे पाठवण्यासाठी ते एक मशीन बनवत होते. याचदरम्यान, त्यांना त्यांचाच रेकॉर्ड केलेला आवाज पुन्हा ऐकू आला. एडिसनने "मेरी हॅड अ लिटल लँब" कविता गात रेकॉर्ड केली आणि पुन्हा ऐकली. फोनोग्राफ नंतर ग्रामोफोन म्हणून ओळखला जाऊ लागला.

1926: नायक आणि खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेमनाथ यांचा जन्म

अभिनेता प्रेमनाथ यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1926 रोजी पेशावर येथे झाला. प्रेमनाथ हे बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. जवळपास 250 चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्रेमनाथ यांनी 'जॉनी मेरा नाम', 'धर्मात्मा', 'बरसात', 'कालीचरण', 'प्राण जाए पर वचन न जाए', 'बॉबी' आणि 'लोफर' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1985 मध्ये आलेला 'हम दोनों' हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. 3 नोव्हेंबर 1992 रोजी प्रेमनाथ यांचे निधन झाले.

1927 : नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म

शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार होते. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात. डोंबिवलीत झालेल्या 2003 सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. कायम पडद्यामागे काम करणाऱ्या नाट्यकर्मींसाठी त्यांनी नाट्यसंमेलनातच 75 हजार रुपयांचा धनादेश दिला होता.


1955 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 15 आंदोलक हुतात्मा झाले

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या शेवटच्या टप्प्यात आंदोलने, सभा व मोर्चे सुरू झाले होते. तरीही भारत सरकारने या चळवळीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत होते. या चळवळीला मोरारजी देसाई, स. का. पाटील यांनी प्रथमपासून विरोध केल्याचे दिसून येत होता. परंतु जनतेच्या रेट्याने हे आंदोलन यशस्वी करण्यात आले. काँग्रेस वर्कींग कमिटीने त्रिराज्य योजना मांडली. याला संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र विरोध सुरू झाला. 18 नोव्हेंबर 1955 रोजी मुख्यमंत्री मोरारजी देसाई त्रिराज्य योजना मंजुरीसाठी विधानसभेत मांडणार होते. त्या विरोधात सेनापती बापट यांनी प्रचंड मोठा मोर्चा विधानसभेवर काढला. त्याच दिवशी सायंकाळी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी 50,000 हजार लोकांची सभा मुंबईत कामगार मैदानात घेतली व त्रिराज्य कल्पना फेटाळली व 21 नोव्हेंबर 1955 रोजी मोरारजी देसाई व स. का. पाटील यांनी मुंबईच्या चौपाटीवर सभा घेतली व त्यावेळी लोकांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या. परंतु मोरारजी देसाई यांनी 'हिंसक मार्गांचा वापर केल्यास मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे सांगितले. स. का. पाटील यांनी 'आकाशात चंद्र तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रालाही मिळणार नाही' अशी घोषणा केली. परिणामी चप्पल, दगड, गोटे यांचा मारा करून त्यांची ही सभा लोकांनी उधळून लावली. 21 नोव्हेंबर 1955 रोजी आंदोलकांनी कामगारांचा संप घडवून आणला. लोक ओव्हल मैदानावर जमू लागले. पोलीस बंदोबस्त कडक होता. मोरारजी देसाई सरकारने जमावबंदी आदेश मांडला. आदेशभंग केल्याबद्दल पोलिसांनी प्रथम लाठीमार केला. अश्रूधूर सोडला. नंतर जमावावर गोळीबार केला. त्यात 15 आंदोलक हुतात्मा झाले व सुमारे 300 लोक जखमी झाले. 400 पेक्षा जास्त लोकांना अटक झाली. (संदर्भ: आजचा महाराष्ट्र, एम.ए भाग -1, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)   

1962: भारत-चीन युद्धाला पूर्णविराम 

20 ऑक्टोबर 1962 रोजी भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरू झाले. चीनने भारतीय भूभागावर कब्जा केल्याच्या दाव्यानंतर दोन्ही देशांचे लष्कर आमनेसामने आले होते. महिनाभर चाललेल्या या युद्धात भारताच्या 11-12 हजार सैनिकांचा मुकाबला करण्यासाठी चीनने 80 हजारांहून अधिक सैनिक उतरवले होते. पूर्ण महिन्यानंतर, 20 नोव्हेंबर रोजी चीनने युद्धविराम घोषित केला. तसेच वादग्रस्त भागातून माघार घेण्याचे मान्य केले. यानंतर 21 नोव्हेंबर 1962 रोजी युद्ध संपले. या युद्धात भारताचे 1 हजार 383 जवान शहीद झाले. तर 722 चिनी सैनिक मारले गेले.

इतर महत्त्वाच्या घटना : 

1694: फ्रेंच तत्त्वज्ञानी व्हॉल्टेर यांचा जन्म
1942: राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
1962: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.
1963: प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन.
1970: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन. 
2015: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget