एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update: राज्यभरात वळवाच्या पावसाचा कहर! बुलढाण्यात बाणगंगा नदीला पूर, नाशकात ढगफटी सदृश पाऊस, वीज पडून अनेकांच्या मृत्यूच्या घटना 

नाशिकच्या पिंपळगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदार तडाखा दिल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यातील बाणगंगा नदीला पावसामुळे अचानक पूर आल्याने दोन गावांचा संपर्क तुटलाय.

Maharashtra Weather Update: भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांना वळवाच्या पावसाने (Rain Alert)  अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने बळीराजासह सर्वसामान्यांची एकच तारांबळ उडवली असताना दमदार पावसाने (Weather Update) राज्यात मोठी हानी पोहचवली आहे. नाशिकच्या पिंपळगाव परिसरात सायंकाळच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदार तडाखा दिल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यातील बाणगंगा नदीला पावसामुळे अचानक पूर आल्याने दोन गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच अमरावती जिल्ह्यात विज पडून एका वृद्ध आजीचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील जवळेथर परिसरात वीज पडून दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे.

बाणगंगा नदीला पुर, दोन गावांचा संपर्क तुटला

बुलढाणा तालुक्यात काल सायंकाळी (16 मे) मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे बाणगंगा नदीला पूर आलाय. परिणामी धाड व धामणगाव या दोन गावाचा संपर्क तुटला असल्याची माहिती समोर आली आहे. बानगंगा नदीवरील अनेक दिवसांपासून पुलाचे काम सुरू आहे.  मात्र या पुलाचे काम अपूर्ण असल्याने वळण रस्त्यावरील मातीचा पूल वाहून गेल्याने दोन गावातील संपर्क तुटला आहे. बुलढाणा तालुक्यातील अनेक नदी आणि ओढ्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली.

नाशिकच्या पिंपळगाव परिसरातील ढगफटी सदृश पाऊस

नाशिकच्या पिंपळगाव परिसरात सायंकाळच्या (16 मे) सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदार तडाखा दिल्याने नदी नाल्यांना पूर आलाय. तर अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. अचानक आलेल्या जोरदार पावसाने कांदा व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर शंकर ठक्कर या कांदा व्यापाऱ्यांचा शेकडो क्विंटल कांदा अक्षरक्ष: पाण्यावर तरंगत वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कांदाही मोठ्या प्रमाणावर भिजल्याने कांदा व्यापारी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

 इतिहासात प्रथमच विक्रमी  वळवाचा पाऊस

- नाशिकच्या द्राक्ष नगरी , पिंपळगाव बसवंत व वडनेर भैरव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. इतिहासात प्रथमच विक्रमी पाऊस बरसल्याचे स्थानिकांचे मत आहे. मात्र या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. द्राक्ष बागेच्या सूक्ष्म घड निर्मिती प्रक्रियेवर ही या पावसामुळे परिणाम होणार असून याचा द्राक्ष हंगामाला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच काढणीला आलेल्या कांदा ही पावसात भिजला आहे. तिकडे वडनेरच्या नेत्रावती नदीला पूर आल्याने पिंपळगावलाही पूरस्थिती निर्णम झाली आहे. तर या परिसरातील काही भागात पुरामुळे शेतातील माती वाहून जाण्याची भीती आता व्यक्त केली जात असून एकूणच या पावसामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

वीज पडून जागीच मृत्यू

नायगाव तालुक्यात सायंकाळी  (16 मे) साडेसहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. कुंटूर परिसरामध्ये काही ठिकाणी पाऊस व काही ठिकाणी जोरदार वारा सुटला होता. त्या वाऱ्यांमध्ये सांगवी येथील तरुण चंद्रकांत सुभाष महागावे हे शेताकडून घराकडे येत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतदेह नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमार्टमसाठी देण्यात आले आहेत. सुभाष पाटील महागाव हे त्यांचे वडील होते. त्यांचाही कोरोनामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. आधीच वडिलांचे छत्र हरवलेल्या चंद्रकांत महागावे यांच्यावरही निसर्गाने नैसर्गिक परिस्थिती कोपल्यामुळेच विज पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा 

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले

व्हिडीओ

Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
Embed widget