एक्स्प्लोर

Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाचा कहर, पाच वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद, राज्यात सहा जणांचा बळी, आजही मुसळधार सरी बरसरणार

Maharashtra Rain Alert: राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबईत एका दिवसात पाच वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर राज्यात पावसाचे 6 बळी गेली असून आजही धुव्वाधार पाऊस बरसणार आहे.

Maharashtra Rain Weather Alert मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत (Mumbai Rain) मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. शहर, तसेच उपनगरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. त्यानंतर शनिवारीही पावसाचा जोर (Weather Update) कायम होता. अशातच सांताक्रूझ येथे शुक्रवारी सकाळी 8.30 ते शनिवारी सकाळी 8.30 दरम्यानच्या 24 तासांत 244.7 मिमी पावसाची नोंद झाली. याआधी ऑगस्ट 2020 मध्ये 268.6 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी शनिवारी 24 तासांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर राज्याभारत कोसळणाऱ्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (17 ऑगस्ट) कोकणासह काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. विशेषतः मुंबई, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडामध्ये काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सोबतच सुमारे 40 ते 50 किमी ताशीचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.

पुढील 3-4 तासांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्य

तर कोकण किनारपट्टीवर 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान 50-60 किमी/ताशी वा-यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आलं आहे. अशातच पुढील 3-4 तासांत पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात पावसामुळे चार जणांचा बळी, दोन बेपत्ता

मुंबईसह मुंबई उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा राज्यातील सर्वच विभागांना फटका बसला. विदर्भात विविध घटनांत चौघांचा बळी गेला, तर मराठवाड्यात भिंत पडून दोघांचा मृत्यू झाला. विदर्भात अनेक जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. जळगाव जिल्ह्यातील आठही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली, तर शेतात पाणी गेल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले. कोकणातील रायगड व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांत पावसाचा जोर होता. अनेक नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला.

विदर्भात पावसामुळे चार जणांचा बळी गेला, दोन बेपत्ता आहेत तर तीन जण जखमी आहेत. शनिवारी अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, भंडारा आदी जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात मांजरा नदीला आलेल्या पुरामध्ये सुबराव लांडगे नावाचा शेतकरी वाहून गेला. पावसामुळे भित पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. शेख नासेर आमीन व हसिना बेगम शेख अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर कायम

मुंबई आणि उपनगर या दोन्ही भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. कालपासून सुरू झालेला पाऊस आजदेखील सुरूच आहे. सततच्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मात्र या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे अलर्टवर आहेत. नागरिकांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत की, अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये.

राज्याभारत इतर भागातील स्थिती

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Pune Land Scam:  'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
Pune Land Scam: 300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
Palak Muchhal Reaction On Smriti Palash Wedding: स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
Gold price hike dollar rate: अबब! सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
Embed widget