एक्स्प्लोर

Latur News : 33 महिन्यांपासून पगार थकला...मुंडेंच्या साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांकडून जीवन संपवण्याचा प्रयत्न...

Latur News : थकीत पगारासाठी कर्मचाऱ्यांनी अंगावर पेट्रोल, डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

रेणापूर, लातूर:  मागील 33 महिन्यांपासून थकलेला पगार मिळावा यासाठी पन्नगेश्वर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. थकीत पगारासाठी कर्मचाऱ्यांनी अंगावर पेट्रोल, डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कारखान्याच्या 24  कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मार्गदर्शनात हा साखर कारखाना सुरू आहे. 

लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखान्यातील सुरक्षा विभागातील आणि इलेक्ट्रीशियन वायरमन यांचा 33 महिन्यांपासून पगार थकीत आहे. याबाबत कारखाना प्रशासनाला वेळोवेळी कळवून ही पगार मिळू शकला नाही. थकीत पगार मिळावा आणि भविष्य निर्वाह निधी जमा व्हावा यासाठी कर्मचाऱ्यांकडून पाठपुरावा सुरू होता. पगार आणि ईपीएफ जमा व्हावा अन्यथा  कारखान्याच्या गेट समोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदारांसह कारखाना प्रशासनास 21 दिवसांपूर्वी एका निवेदना द्वारे दिला होता. 

थकीत वेतनासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतरही कारखाना प्रशासनाने किंवा साखर संघाकडून कसल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आज अनेक कर्मचाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. आत्मदहन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी आधीच दिला होता. त्यामुळे घटनास्थळी पोलीस हजर होते.  त्यांनी या कर्मचाऱ्यांना आत्मदहन करण्यापासून रोखले. यावेळी रेणापूर पोलिसांनी 24 अंदोलक कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत स्वतःचा रोष व्यक्त केला आहे. या कारखानाच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालक  प्रजा गोपीनाथराव मुंडे  आहेत. तर मार्गदर्शक पंकजा मुंडे आहेत.

वैद्यनाथ साखर कारखाना पुन्हा सुरु करणारच, पंकजा मुंडे समर्थकांनी जमवले 5 कोटी

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) जीएसटी विभागाने केलेल्या कारवाईनंतर 19 कोटींची थकबाकी प्रकरणी लिलाव केला जाणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर, आपण आर्थिक अडचणीत सापडल्याचे पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, असे असतांना आता पंकजा मुंडे यांच्या मदतीला मुंडे समर्थक धावून आले आहेत. पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि उसतोड कामगारांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी लोकवर्गणी जमा केली. मात्र, पंकजा मुंडे यांनी ही लोक वर्गणी  न स्वीकारत लोकांच्या पाठिंब्यावर कारखाना पुन्हा सुरू करू असे म्हटले. होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget