एक्स्प्लोर

Kolhapur Water News: मोसमी पाऊस लांबल्यास कोल्हापुरात 'पाणीबाणी' अटळ; पाणीप्रश्नी जिल्हाधिकारी दोन दिवसात बैठक घेणार

Kolhapur Water News: राधानगरी धरणाची पाणीपातळी कमालीची घसरली आहे. त्यामुळे अजून आठवडाभर पाऊस लांबला गेल्यास कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पाणी कपातीचे संकट अटळ आहे. 

Kolhapur Water News: रोहिणी नक्षत्रानंतर मृग नक्षत्रातील चार दिवस होऊनही पावसाने दडी मारली असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील (Kolhapur News) पाणी संकट गंभीर होत चालले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा आणि भोगावती या दोन नद्यांसह जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी तळ गाठला आहे. राधानगरी धरणाची पाणीपातळी कमालीची घसरली आहे. त्यामुळे अजून आठवडाभर पाऊस लांबला गेल्यास कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पाणी कपातीचे संकट अटळ आहे. 

भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणीपातळी खालावल्याने कोल्हापूर शहरासाठी पाणी उपसा करणाऱ्या पंपांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर थेट परिणाम झाला आहे. कोल्हापूर शहरात टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण सुरु आहे. नदीतील पाणी कमी झाल्यानंतर राधानगरी धरणातून पाणी सोडले जाते. मात्र, यंदा राधानगरी धरणाने तळ गाठल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे. एकंदरीत नद्यांनी आणि धरणांनी सुद्धा तळ गाठल्याने आता शेतीऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य प्राधान्य दिले जाईल अशी शक्यता आहे.  

जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक 

दुसरीकडे, पाणीप्रश्न गंभीर होत चालल्याने मनपा प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूरच्या पाणी प्रश्नासाठी दोन दिवसांत बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. रेखावार म्हणाले की, पाऊस लांबल्याने धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. सध्याची स्थिती चिंताजनक नाही, उपसाबंदी पूर्ण क्षमतेनं सुरु आहे. पाऊस लांबल्यास गंभीर स्थिती होण्याची शक्यता आहे. यासाठी बुधवारी बैठक घेतली जाणार आहे. 

राधानगरी धरणात 20 दिवस पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा

राधानगरी धरणामध्ये फक्त 20 दिवस पाणी पुरवठा पाणीपुरवठा होईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा आणि उपसाबंदीचा पर्याय आहे. राधानगरी धरणातील पाणी कमी होण्याची सात वर्षांनी  उद्भवली आहे. 2015 मध्ये राधानगरी धरणाने तळ गाठला होता. त्यावेळी फक्त अर्धा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता, त्यानंतर प्रथमच पाणी पाण्याची पातळी खाली गेली आहे. आज घडीला राधानगरी धरणातून 421 तुळशी धरणातून 300 आणि कुंभी धरणातून 250 क्युसेक पाणी सोडले जात आहे. मात्र, शेतीसाठी मोठा उपसा होत आहे. दरम्यान, कोल्हापूर शहराची पाणी गरज लक्षात घेऊन काळम्मावाडी धरणातील पाणी बोगद्यातून घेण्याचे नियोजन सुरु आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
Santosh Deshmukh Case : अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
Anjali Damania on Dhananjay Munde : सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
Santosh Deshmukh Murder Case : अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 01 March 2025Anjali Damania on Walmik Karad | आरोपींना फाशीची शिक्षा द्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा-दमानियाBeed Walmik Karad Case | 'खंडणीत आड येणाऱ्याला आडवा करा, संतोषलाही धडा शिकवा', आरोपपत्रात नेमकं काय?ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 01 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
Santosh Deshmukh Case : अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
Anjali Damania on Dhananjay Munde : सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
Santosh Deshmukh Murder Case : अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची धाकधूक वाढली? शिक्षेच्या स्थगितीची सुनावणी लांबणीवर, कोर्टात नेमकं काय घडलं?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची धाकधूक वाढली? शिक्षेच्या स्थगितीची सुनावणी लांबणीवर, कोर्टात नेमकं काय घडलं?
सोशल मीडियातून धमकी, कोरटकरांच्या पत्नीची तक्रार; इंद्रजित सावंतांचे आवाहन, म्हणाले परस्त्रीचा सन्मान शिवरायांची शिकवण.. 
सोशल मीडियातून धमकी, कोरटकरांच्या पत्नीची तक्रार; इंद्रजित सावंतांचे आवाहन, म्हणाले परस्त्रीचा सन्मान शिवरायांची शिकवण.. 
Santosh Deshmukh Murder Case : रात्री झोप येत नाही, आईकडे, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
रात्री झोप येत नाही, आई, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...
वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...
Embed widget